शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पुण्यात पूर्ण लाॅकडाऊनची आवश्यकता नाही - केंद्रीय पथकाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:10 IST

पुणे - पुणे शहरात पूर्ण लाॅकडाऊनची आवश्यकता नसल्याचं मत केंद्रीय पथकाने व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी पुण्यातील ...

पुणे - पुणे शहरात पूर्ण लाॅकडाऊनची आवश्यकता नसल्याचं मत केंद्रीय पथकाने व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सादर केलेल्या रिपोर्टमध्ये हे मत व्यक्त केलं आहे. आताचे निर्बंध परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पुरेसे असल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबरोबरच इतर अनेक सूचनाही यामध्ये करण्यात आल्या आहेत.

वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पुण्यात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही सूचना केली आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या टीमपैकी पहिल्या टीमचा हा अहवाल आहे. डाॅ. जुगल किशोर आणि डाॅ. घनश्याम पांडे यांचा या टीममध्ये समावेश होता. या अहवालाची प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.

या अहवालामध्ये पहिल्याच मुद्द्यामध्ये पुण्यातल्या तीनही यंत्रणा म्हणजे पुणे महापालिका, पिंपरी महापालिका तसेच ग्रामीण यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे म्हणले आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकच केंद्रीय यंत्रणा किंवा कॅाल सेंटर असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पुणे जिल्ह्यासाठी एकच बुलेटिन काढले जावे, असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे. बेड उपलब्धतेचा गोंधळ लक्षात घेता ९५ च्या वर ॲाक्सिजन असणाऱ्या सर्वांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात यावे किंवा ते रुग्णालयात असतील तर त्यांना डिस्चार्ज द्यावा, अशीही सूचनाही केली. याबरोबरच दर दिवशीचे पॅाझिटिव्ह पेशंट पाहून त्यानुसार नवे बेड तयार ठेवावेत, असंही केंद्रीय पथकाने म्हणलं आहे.

सीटी स्कॅनचा वापर हा योग्य प्रमाणात केला जावा सरसकट स्कॅनची गरज नाही. तसेच आवश्यक्ता आहे तेवढीच लसीकरण केंद्र सुरु करावीत, असे सांगत केंद्रातून केल्या जाणाऱ्या लस पुरवठ्याचा प्रश्न सोडवला जावा, तसेच जर पुरेशा लस नसेल तर मोठ्या प्रमाणात लसीकरण करु नये, अशी सूचना देखील केली आहे.

-----------------

केंद्रीय वॉर रूमची गरज

सर्व रुग्णालयांच्या बाहेर माहिती देणाऱ्या बोर्डाचा अभाव असल्याची नोंद देखील या पथकाने केली आहे. प्रत्येक रुग्णालयाबाहेर दिल्ली प्रमाणे स्क्रीन उभारले जावेत, अशी सूचना पथकाकडून करण्यात आली आहे. केंद्रीय वॅार रूमची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय पथकाने आत्ताचे निर्बंध पुरेसे असून, पूर्ण लॅाकडाउनची आवश्यकता नसल्याचे म्हणले आहे.