शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कितीही गंभीर गुन्हा करा, शिक्षेची खात्री नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:15 IST

साडेसहा लाख खटले प्रलंबित : कायद्याच्या धाकावरच प्रश्नचिन्ह नम्रता फडणीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एखाद्या टोळीप्रमुखावर अथवा गुन्हेगारावर ...

साडेसहा लाख खटले प्रलंबित : कायद्याच्या धाकावरच प्रश्नचिन्ह

नम्रता फडणीस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एखाद्या टोळीप्रमुखावर अथवा गुन्हेगारावर खून, बलात्कार किंवा तत्सम गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन ते चार वर्षांतच त्याची निर्दोष मुक्तता होते. इतका गंभीर गुन्हा केला असूनही आरोपी सुटतो कसा? असा प्रश्न अनेकांना पडतो. सक्षम पुराव्यांअभावी गंभीर गुन्ह्यातील आरोपींची मुक्तता होण्याचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे.

तपासयंत्रणेचा अभाव, साक्षीदारांना न्यायालयासमोर हजर करण्यात पोलिसांना येणारे अपयश, आरोपींकडून साक्षीदारांवर टाकण्यात येणारा दबाव या गोष्टी यास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. यामुळे कायदा-सुव्यस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षात न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने एकीकडे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढते आहे. जिल्हा न्यायालयात आजमितीला साडेसहा लाखांपेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत.

पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय दंडविधान कलम २७९ अंतर्गत दाखल खटल्यांमुळे दोषी ठरण्याचे प्रमाण वाढले आहे. वस्तुस्थिती वेगळी असल्याचे सांगण्यात येते. बहुतांश खटल्यांमध्ये पोलिसांकडून तपास व्यवस्थित केला जात नाही. दोषारोपपत्र दाखल करण्यास देखील विलंब केला जातो. तारखेच्या दिवशी न्यायालयात साक्षीदार उभे केले जात नाही. सरकारी वकील देखील न्यायालयात सक्षम पुरावे सादर करू शकत नसल्याने सराईत गुन्हेगारांची निर्दोष मुक्तता होत असल्याचे विधी क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षापासून न्यायालयात महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी होत नाही. न्यायालयाचे कामकाज एका शिफ्टमध्ये सुरू आहे. त्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत आहे. दिवाणी आणि फौजदारी खटल्यांची प्रलंबित संख्या साडेसहा लाखांच्या आसपास आहे. एकीकडे न्यायाधीशांची कमी संख्या आणि सरकारी वकिलांच्या बदल्या या गोष्टी त्याला कारणीभूत असल्याचे वकिलांनी सांगितले.

चौकट

दोन खुनांच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी झालेल्या पप्पू गावडे खून प्रकरणात पौड येथे गजानन मारणे व अन्य काही जणांवर गुन्हा दाखल होता. पुण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाने याप्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अमोल बधे खून प्रकरणातूनही मारणे निर्दोष सुटला.