शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कितीही गंभीर गुन्हा करा, शिक्षेची खात्री नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:15 IST

साडेसहा लाख खटले प्रलंबित : कायद्याच्या धाकावरच प्रश्नचिन्ह नम्रता फडणीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एखाद्या टोळीप्रमुखावर अथवा गुन्हेगारावर ...

साडेसहा लाख खटले प्रलंबित : कायद्याच्या धाकावरच प्रश्नचिन्ह

नम्रता फडणीस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एखाद्या टोळीप्रमुखावर अथवा गुन्हेगारावर खून, बलात्कार किंवा तत्सम गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन ते चार वर्षांतच त्याची निर्दोष मुक्तता होते. इतका गंभीर गुन्हा केला असूनही आरोपी सुटतो कसा? असा प्रश्न अनेकांना पडतो. सक्षम पुराव्यांअभावी गंभीर गुन्ह्यातील आरोपींची मुक्तता होण्याचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे.

तपासयंत्रणेचा अभाव, साक्षीदारांना न्यायालयासमोर हजर करण्यात पोलिसांना येणारे अपयश, आरोपींकडून साक्षीदारांवर टाकण्यात येणारा दबाव या गोष्टी यास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. यामुळे कायदा-सुव्यस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षात न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने एकीकडे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढते आहे. जिल्हा न्यायालयात आजमितीला साडेसहा लाखांपेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत.

पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय दंडविधान कलम २७९ अंतर्गत दाखल खटल्यांमुळे दोषी ठरण्याचे प्रमाण वाढले आहे. वस्तुस्थिती वेगळी असल्याचे सांगण्यात येते. बहुतांश खटल्यांमध्ये पोलिसांकडून तपास व्यवस्थित केला जात नाही. दोषारोपपत्र दाखल करण्यास देखील विलंब केला जातो. तारखेच्या दिवशी न्यायालयात साक्षीदार उभे केले जात नाही. सरकारी वकील देखील न्यायालयात सक्षम पुरावे सादर करू शकत नसल्याने सराईत गुन्हेगारांची निर्दोष मुक्तता होत असल्याचे विधी क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षापासून न्यायालयात महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी होत नाही. न्यायालयाचे कामकाज एका शिफ्टमध्ये सुरू आहे. त्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत आहे. दिवाणी आणि फौजदारी खटल्यांची प्रलंबित संख्या साडेसहा लाखांच्या आसपास आहे. एकीकडे न्यायाधीशांची कमी संख्या आणि सरकारी वकिलांच्या बदल्या या गोष्टी त्याला कारणीभूत असल्याचे वकिलांनी सांगितले.

चौकट

दोन खुनांच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी झालेल्या पप्पू गावडे खून प्रकरणात पौड येथे गजानन मारणे व अन्य काही जणांवर गुन्हा दाखल होता. पुण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाने याप्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अमोल बधे खून प्रकरणातूनही मारणे निर्दोष सुटला.