शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

नऊ शाळांच्या शिक्षकांचा पगार अडकला

By admin | Updated: June 15, 2015 06:00 IST

सन २०१५-१६ या नवीन शैक्षणिक वर्षाला उद्या दि. १५ पासून सुरुवात होत आहे. उद्यापासून सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस गोड होणार असला,

जेजुरी : सन २०१५-१६ या नवीन शैक्षणिक वर्षाला उद्या दि. १५ पासून सुरुवात होत आहे. उद्यापासून सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस गोड होणार असला, तरीही तालुक्यातील नऊ शाळांतील शिक्षकांचे नवे वर्ष पगाराविनाच सुरू होणार असल्याची चर्चा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात होत आहे.तालुक्यातील वाळुंज केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या १३ शाळांपैकी ९ शाळांतील शिक्षकांचा एप्रिलचा पगारच झाला नाही. मे महिन्याचा पगारही होणार की नाही, अशीच चर्चा आहे. तालुक्यातील २२२ प्राथमिक शाळांचे पगार झाल्यानंतर त्यातील खळद, शिवरी, गोटेमाळ, रासकरमळा, कदमवस्ती, बेलसर, मठवाडी, भोंगळेमळा, तक्रारवाडी या नऊ शाळांचे पगार का झाले नाहीत, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पुरंदरच्या तत्कालीन प्रभारी गटशिक्षण अधिकारी नीलिमा बधे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित शाळांकडून पगारबिले वेळेत न आल्याने असे घडल्याचे सांगण्यात आले. मुख्याध्यापकाकडून मात्र आम्ही पगारबिले वेळेतच पगारबिलाचे काम करणाऱ्या एका शिक्षकाकडे दिलेली होती; तरीही पगार का मिळाला नाही, याचेच आम्हालाही आश्चर्य वाटते, असे सांगण्यात येते. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वेगळेच सत्य समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून पगारबिले आॅनलाइन पद्धतीने काढण्यात येत आहे. मात्र, ही आॅनलाइन पद्धत अद्यापही तालुक्यातील सर्वच मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देऊनही समजलेली नाही. त्याचबरोबर अनेक शाळांतून आॅनलाइनसाठी नेटची रेंज नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.विशेष म्हणजे याच वाळूंज केंद्राच्या केंद्रप्रमुखांचा पगारही झालेला नसल्याचे समजले. केंद्र्रप्रमुख दिलीप राजगुरू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर मोबदल्यावर काम करणाऱ्याने माझा पगारच चुकीचा काढल्याची तक्रार केली आहे. एकीकडे, शासन आॅनलाइन पद्धतीने शिक्षकांचा पगार देण्याचा प्रयत्न करते आहे. तर तीच आॅनलाइन पद्धत प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अवगत नाही. यासाठी मोबदल्यावर माहीतगाराची अनधिकृत नेमणूक केली जाते. हीच शैक्षणिक क्षेत्राची शोकांतिका आहे. (वार्ताहर)