शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

गुंठेवारीचा निर्णय येत्या चार दिवसांत : मुख्यमंत्री

By admin | Updated: July 18, 2014 03:47 IST

गुंठेवारीच्या प्रश्र्नावर येत्या चार दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे

उरुळी कांचन : गुंठेवारीच्या प्रश्र्नावर येत्या चार दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष व थेऊरगावचे सरपंच नवनाथ काकडे यांनी ही माहिती दिली. राज्यातील विविध गावांच्या सरपंचांची परिषद नुकतीच थेऊर येथे झाली. या परिषदेत ठरल्याप्रमाणे विविध प्रश्र्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गुंठेवारीबाबत लवकर निर्णय घेणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. बैठकीस विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, महसूल विभागाचे अति. सचिव, स्वाधीन क्षत्रिय सहसचिव एस. के. पाटणकर, नगर विकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास अति. सचिव एस. एस. संधू, तसेच इतर संबंधित अधिकारी आणि सरपंच परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ग्रामपंचायतीस बांधकाम परवानगी व नोंदीचे अधिकार मिळणे, गावठाण हद्दवाढ, निवासी क्षेत्रवाढ, जुनी व नवी बांधकामे नियमित करणे, तुकडे बंदी कायदा रद्द करून ७/१२ नोंदी होणे, २०११ ची जनगणना निकष लागू करणे, स्वाधीन क्षत्रिय समितीच्या अहवालात दुरुस्ती वटहुकूम जारी करणे आदी विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी गावठाण हद्द १५०० मीटरने वाढविणे व २०११ ची जणगणना निकष लागू करण्याचे आदेश तत्काळ संबंधित सचिवांना दिले. तथापि, इतर प्रश्र्नांसंबंधी ताबडतोब अहवाल मंत्रिमंडळांच्या बैठकीपुढे सादर करण्याच्या सूचना दिल्याचे काकडे यांनी सांगितले.शिष्टमंडळामध्ये पुणे विकास मंचचे अध्यक्ष सदाअण्णा पवार, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र नेवसे, सहसचिव सचिन सातव, कोषाध्यक्ष चंद्रहार चव्हाण, आव्हाळ वाडीचे सरपंच प्रवीण आव्हाळे, बगेरेचे सरपंच भाऊसाहेब मरगळे, जातेगावचे सरपंच समाधान डोके, पुणे विकासमंचचे गीताराम कदम, राजेंद्र दणके, अ‍ॅड. राजू राजूरकर, बाबासाहेब गलांडे, अ‍ॅड. पंडित कापरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)