शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

निवडणुकीनंतर नवा विद्यापीठ कायदा येणार?

By admin | Updated: February 20, 2017 03:10 IST

राज्यातील सर्व विद्यापीठांतील कामकाजात सुसूत्रता यावी, या उद्देशाने राज्य शासनातर्फे नवीन विद्यापीठ कायदा मंजूर करण्यात

पुणे : राज्यातील सर्व विद्यापीठांतील कामकाजात सुसूत्रता यावी, या उद्देशाने राज्य शासनातर्फे नवीन विद्यापीठ कायदा मंजूर करण्यात आला. कायद्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली आहे. मात्र, राज्यात जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे निवडणुकानंतर नवीन विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्याच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत विद्यापीठ कायदा एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कामकाजात सुसूत्रता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठात व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या निवडणुका पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. यामुळे केवळ विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, प्राचार्यच नाहीत, तर विद्यार्थीही नवीन कायद्याच्या अंमलबजवणीची वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी) विद्यापीठ कायदा मंजूर झाला असला तरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक असलेले स्टॅट्युट तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. राज्यपाल कार्यालय आणि राज्य शासनातर्फे कायद्याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढून कायदा लागू करण्याबाबतचे केवळ औपचारिक काम राहिले आहे. त्यामुळे निवडणुकींच्या धामधुमीनंतर विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.