शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कायद्याची आवश्यकता

By admin | Updated: December 9, 2014 23:32 IST

प्रत्येक व्यक्तीच्या मानवी हक्काचे संरक्षण व्हावे आणि या हक्कांची पायमल्ली झाल्यास त्याची दाद मागता यावी म्हणून मानवी हक्क संरक्षण कायदा अस्तित्वात आला

पुणो : प्रत्येक व्यक्तीच्या मानवी हक्काचे संरक्षण व्हावे आणि या हक्कांची पायमल्ली झाल्यास त्याची दाद मागता यावी म्हणून मानवी हक्क संरक्षण कायदा अस्तित्वात आला खरा, मात्र त्यात कायदेशीर बाबींपेक्षा तांत्रिकच मुद्यांचा अधिक ऊहापोह आहे. असा कायदा आणि राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग हे कुचकामी ठरत असून, ते रद्दच व्हावेत आणि मानवी हक्कांची प्रक्रिया विषद करणारा नवा कायदा अस्तित्वात यावा, अशी मागणी मानव अधिकार कार्यकर्ते करत आहेत. 
संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांची वैश्विक घोषणापत्रला 1क् डिसेंबर 1948मध्ये मान्यता दिली व त्या घोषणापत्रनुसार , आपल्या देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी त्या त्या देशांनी मानवी हक्काचे कायदे व यंत्रणा तयार करावी. त्यानुसार आपल्या देशातही  मानवी हक्क संरक्षण कायदा आला, मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात मानवी हक्काची नेमकी व्याख्याही नमूद नाही. यामध्ये केवळ मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असेल, किती कर्मचारी असतील, त्यांना कोणते भत्ते, किती पगार असेल, अशाच प्रकारच्या यांत्रिक-तांत्रिक बाबींची नोंद केलेली आहे. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी मानवी हक्काची नेमकी व्याख्याही त्यात नसल्याचे मानव अधिकार कार्यकत्र्यानी खंत व्यक्त केली. 
मानव अधिकार कार्यकर्ते अॅड असिम सरोदे म्हणाले, की मानवी हक्काची प्रक्रिया विशद करणा:या कायद्याची आज आवश्यकता आहे. मानवी हक्क आयोग हे 65 टक्के खटले आपल्या अखत्यारीतच येत नसल्याचे म्हणत निकाली काढतात. 
 
4महाराष्ट्र राज्याच्या विधी व न्याय विभागाने 2क्क्1 मध्ये परिपत्रक काढून  प्रत्येक जिल्ह्यात मानवी हक्क न्यायालय स्थापन करण्याची सूचना दिली होती मात्र आजतागायत असे न्यायालय स्थापन झालेली नाहीत. त्या परिपत्रकाकडे स्पेशल दुर्लक्ष करण्यात आले, तर काही ठिकाणी सत्र न्यायालयालाच मानवी हक्क न्यायालय असे म्हणून मध्य काढण्यात आला. मुळात न्यायाधीशांनाही या कायद्याबाबत साक्षर , प्रशिक्षित करणो आवश्यक आहे.