शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

झोपडपट्टी निर्मूलनामध्ये पुण्याचा नवा आदर्श

By admin | Updated: February 17, 2015 23:46 IST

येरवडा येथील महात्मा गांधीनगर आणि जयप्रकाशनगर येथील झोपडपट्टीधारकांचे बीएसयूपी मधील इन्स्टिट्यूटमधून पुनर्वसन करण्यात आले आहे.

पुणे : येरवडा येथील महात्मा गांधीनगर आणि जयप्रकाशनगर येथील झोपडपट्टीधारकांचे बीएसयूपी मधील इन्स्टिट्यूटमधून पुनर्वसन करण्यात आले आहे. हे पुनर्वसन पूर्ण झाल्याने या जागेचा सातबारा नागरिकांच्या नावावर करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय महापालिकेने दिला आहे. त्यामुळे या ठिकाणची झोपडपट्टी विघोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या दोन्ही झोपडपट्टया राज्यातील पहिल्या विघोषित झोपडपट्टया ठरणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णेगुरूजी यांनी सोमवारी दिली. येरवडा येथील सर्व्हे क्रमांक १०३ मध्ये असलेल्या सरकारी जमिनीवर जयप्रकाशनगर व महात्मा गांधीनगर झोपडपट्टी आहे. १९८३ ते ८६ या वर्षामध्ये या भागात गलिच्छ वस्ती निर्मूलन (गवनी) योजना वेळोवेळी घोषित झाली. त्यामुळे महापालिकेकडून गवनी, वाल्मीकी योजना आणि बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर (बीएसयूपी) योजनेअंतर्गत या भागातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुणे महापालिका तसेच राज्य सरकारच्या मागासवर्गीय कल्याण निधीतून या भागात भूमिगत गटारे, भूमिगत विद्युत पुरवठा, प्रत्येक झोपडपट्टीला स्वतंत्र नळ कनेक्शन, गल्लीबोळात सिमेंट क्राँक्रिटचे रस्ते सार्वजनिक शौचालये, महापालिकेची मराठी, इंग्रजी माध्यमाची शाळा, महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, समाजमंदिरे, व्यायामशाळा यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहेत. या भागात मोठया प्रमाणात पक्क्या स्वरुपाचे बांधकाम झाले आहे. बहुतेक नागरिकांनी आरसीसी बांधकामही पूर्ण केले आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या दोन्ही झोपडपट्टया विकसित झाल्याने येथे सध्या असलेल्या सोयी-सुविधांचा विचार करता भविष्यकाळात येथे देखभाल व दुरुस्तीसाठी मोठा निधी महापालिकेला द्यावा लागणार आहे. या भागात विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी झोपडपट्टीवासीयांकडून घेण्यात येणारे सेवा शुल्क रद्द करून बांधण्यात आलेल्या इमारतींकडून मिळकतकर वसूल करणे गरजेचे आहे. यासाठी ही झोपडपट्टी विघोषित करून येथे गावठाण जाहीर करणे क्रमप्राप्त आहे. या झोपडपट्टीची जागा स्थानिक रहिवाशांच्या नावावर करावी, असा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी पालिकेला दिला होता. त्यावर प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला होता. प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय देत झोपडपट्टी विघोषित करण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय दिला.