शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रेशनिंग व्यवस्था नष्ट करण्यासाठीच नवे कृषी कायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लोकशाहीची हत्या करून मोदी सरकारने तीन नव्या कृषी कायद्यांना मंजुरी दिली. ह्यांमुळे शेतकऱ्यांचे नव्हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लोकशाहीची हत्या करून मोदी सरकारने तीन नव्या कृषी कायद्यांना मंजुरी दिली. ह्यांमुळे शेतकऱ्यांचे नव्हे तर भांडवलदाराचे हित साधले जाणार आहे. आतापर्यंत कृषी अर्थव्यवस्थेत भांडवलदार नव्हते. मात्र नव्या तीन कृषी कायदयामुळे कृषी अर्थव्यवस्थेत भांडवलदाराचे स्थान निर्माण होईल. त्याचा परिणाम देशातील रेशनिंग व्यवस्थेवर होईल. एफसीआय रद्द करून देशातील रेशनिंग व्यवस्था संपुष्टात आणन्यासाठीच या तीन कृषी कायद्याना मंजुरी देण्यात आला असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिबा फुले लिखित

'' शेतकऱ्यांचा असूड '' गौरव दिनानिमित्त शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी शेतकऱ्यांवर असूड फटका आणि परिणाम या विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले

वाड्याजवळील बापूसाहेब पाटोळे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ नीरज जैन यांची उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले , मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भांडवलदाराच्या हिताचा विचार करीत आहे. त्यांना मुक्त अर्थव्यवस्था हवी आहे. मात्र भांडवलशाही प्रवृत्तीची हाव एक दिवस अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली. कोविडच्या काळात साडेबारा कोटी लोकांचे रोजगार गेले. तर दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या नागरिकांमध्ये २३ कोटींची भर पडली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

नीरज जैन म्हणाले, गेल्या ८ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन हे केवळ शेतकऱ्यांचे नाही तर देशातील नागरिकाचे आहे. कृषी कायद्याच्या आडून देशातील जवळपास ८६ टक्के छोट्या शेतकऱ्यांची जमीन मोठ्या उद्योजकांना दिली जाणार आहे. मोठ्या ई कॉमर्स कंपन्या भारतातील जमिनी ताब्यात घेऊ पाहत आहे. त्यासाठी तर हा डाव आखला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करणे, एफसीआय संपुष्टात आणून देश खाद्यान्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर राहू नये म्हणून हा डाव आखला जात असल्याचे जैन यांनी सांगितले.

या वेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गोपाल तिवारी, अभय छाजेड, विठ्ठल सातव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक नितीन पवार यांनी केले.