शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

ग्रामीण भागात ब्रॉडबँंड पोहोचविण्याची गरज

By admin | Updated: May 19, 2014 01:00 IST

गेल्या काही वर्षांत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत, त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरच दळणवळण हा मूलभूत हक्क झाला पाहिजे.

पुणे : ‘गेल्या काही वर्षांत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत, त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबरच दळणवळण हा मूलभूत हक्क झाला पाहिजे. मात्र, सध्या ब्रॉडबँड सेवांचे जाळे शहरी भागापुरते मर्यादित झाले असून शाश्वत विकासासाठी ही सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याची गरज आहे,’ असे मत भारत संचार निगम लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक के. के. सक्सेना यांनी व्यक्त केले. इन्स्टिट्यूूट आॅफ इंजिनिअर्सतर्फे जागतिक दूरसंचार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते ‘शाश्वत विकासात ब्रॉडबँडचे महत्त्व’ या विषयावर बोलत होते. ‘अवया’ संशोधन प्रयोगशाळेचे संशोधक संचालक रामानुजन काशी, संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. के. शिंदे, गोरखनाथ घाडगे, सचिव विजय घोगरे, डॉ. एस. आर. जोग, डॉ. आर. बी. इंगळे, जी. के. डावरा, के. के. घोष या वेळी उपस्थित होते. सक्सेना म्हणाले, ‘मोबाईल, इंटरनेट यांमुळे प्रत्येकाला दळणवळणाचा सोपा पर्याय मिळाला आहे. मात्र, ही सेवा स्वस्तात आणि अधिक गतीने पोहोचण्यासाठी ब्रॉडबँडमध्ये संशोधनाची गरज आहे, त्यामुळे शिक्षण, पर्यटन, अॉटोमोबाईल, वैद्यकीय, गृहिणींसाठी विविध सेवा मिळू शकतील. या क्षेत्रामध्ये स्पेक्ट्रम विकण्यासंदर्भात आणि त्यातील किमतींच्या चढ-उतारासंबंधात अनेक प्रश्न आहेत. मात्र, हे प्रश्न पायाभूत सुविधा वाढले तर त्वरित सुटण्यासारखे आहेत.’ ब्रॉडबँडची सेवा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने सुविधा दिल्या पाहिजेत. इंटरनेटची सेवा शहरी भागात मर्यादित न राहता ग्रामीण भागात पोहोचल्यास विकासाला गती मिळेल, त्यामुळे केंद्र सरकारने देशातील दोन लाख ५० हजार ग्रामपंचायतींना जोडण्याचे धोरण जाहीर केले आहे. काशी म्हणाले, ‘काही प्रगत देशांमध्ये ब्रॉडबँड सेवेची गती चांगली असल्यामुळे रोजगार वाढले आहेत. भारतातही अशाप्रकारे स्पिड वाढल्यास रोजगारास गती मिळेल, त्यासाठी या सेवांचा विस्तार करून नंतर त्याची गती वाढविली पाहिजे.’