शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी निर्णयांची गरज

By admin | Updated: February 1, 2016 03:00 IST

शासनाने पर्यावरणपूरक निर्णय घेण्यासाठी जनतेनेच दबाव आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी अप्रिय निर्णय घ्यावेच लागतील

पुणे : शासनाने पर्यावरणपूरक निर्णय घेण्यासाठी जनतेनेच दबाव आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी अप्रिय निर्णय घ्यावेच लागतील, असे माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी येथे सांगितले. सध्याच्या सरसकट परवानग्या देण्याच्या पर्यावरण मंत्रालयाच्या धोरणावरही त्यांनी टीका केली.काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे काकासाहेबांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रमेश यांनी ‘भारतापुढील पर्यावरणाची आव्हाने’ या विषयावर विचार मांडले. रमेश म्हणाले, आर्थिक विकास आणि पर्यावरणात नेहमी संघर्ष होत असतो. सरकार हे आर्थिक विकासालाच प्राधान्य देत असते, त्यांनी पर्यावरणाकडे लक्ष द्यावे. त्यासाठी जनतेमधून दबाव निर्माण झाला पाहिजे. देशात दरवर्षी ८० लाख तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. हे रोजगार आर्थिक विकासातूनच निर्माण होणार आहेत. मात्र हा विकास करताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. विकास आणि पर्यावरण एकत्र घेऊन जाण्याचे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. आपला देश चीन, अमेरिकेच्या मार्गाने जाऊ शकणार नाही. त्यांनी ज्या चुका केल्या, त्या आपल्याला परवडू शकणार नाहीत. आम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळा शाश्वत मार्ग निवडावा लागेल.लोकसंख्या १२५ कोटींवर जाऊन पोहचली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न उभा राहिला आहे. दूषित पर्यावरणाचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. पर्यावरण हा जीवनशैलीशी निगडीत विषय बनला आहे. एकंदरीत लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य व जीवनशैलीचा प्रश्न यामुळे पर्यावरणाचे रक्षण करावेच लागेल. भाजपाप्रणीत सरकारकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. ताडोबामध्ये कोळसा खाणीस परवानगी दिली आहे, असे रमेश यांनी सांगितले. (प्रतिनिधी)