शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी निर्णयांची गरज

By admin | Updated: February 1, 2016 03:00 IST

शासनाने पर्यावरणपूरक निर्णय घेण्यासाठी जनतेनेच दबाव आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी अप्रिय निर्णय घ्यावेच लागतील

पुणे : शासनाने पर्यावरणपूरक निर्णय घेण्यासाठी जनतेनेच दबाव आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी अप्रिय निर्णय घ्यावेच लागतील, असे माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी येथे सांगितले. सध्याच्या सरसकट परवानग्या देण्याच्या पर्यावरण मंत्रालयाच्या धोरणावरही त्यांनी टीका केली.काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे काकासाहेबांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रमेश यांनी ‘भारतापुढील पर्यावरणाची आव्हाने’ या विषयावर विचार मांडले. रमेश म्हणाले, आर्थिक विकास आणि पर्यावरणात नेहमी संघर्ष होत असतो. सरकार हे आर्थिक विकासालाच प्राधान्य देत असते, त्यांनी पर्यावरणाकडे लक्ष द्यावे. त्यासाठी जनतेमधून दबाव निर्माण झाला पाहिजे. देशात दरवर्षी ८० लाख तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. हे रोजगार आर्थिक विकासातूनच निर्माण होणार आहेत. मात्र हा विकास करताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. विकास आणि पर्यावरण एकत्र घेऊन जाण्याचे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. आपला देश चीन, अमेरिकेच्या मार्गाने जाऊ शकणार नाही. त्यांनी ज्या चुका केल्या, त्या आपल्याला परवडू शकणार नाहीत. आम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळा शाश्वत मार्ग निवडावा लागेल.लोकसंख्या १२५ कोटींवर जाऊन पोहचली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न उभा राहिला आहे. दूषित पर्यावरणाचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. पर्यावरण हा जीवनशैलीशी निगडीत विषय बनला आहे. एकंदरीत लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य व जीवनशैलीचा प्रश्न यामुळे पर्यावरणाचे रक्षण करावेच लागेल. भाजपाप्रणीत सरकारकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. ताडोबामध्ये कोळसा खाणीस परवानगी दिली आहे, असे रमेश यांनी सांगितले. (प्रतिनिधी)