शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
4
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
5
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
6
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
7
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
8
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
9
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
10
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
11
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
12
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
13
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
14
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
15
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
16
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
17
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
18
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
19
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी निर्णयांची गरज

By admin | Updated: February 1, 2016 03:00 IST

शासनाने पर्यावरणपूरक निर्णय घेण्यासाठी जनतेनेच दबाव आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी अप्रिय निर्णय घ्यावेच लागतील

पुणे : शासनाने पर्यावरणपूरक निर्णय घेण्यासाठी जनतेनेच दबाव आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी धाडसी अप्रिय निर्णय घ्यावेच लागतील, असे माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी येथे सांगितले. सध्याच्या सरसकट परवानग्या देण्याच्या पर्यावरण मंत्रालयाच्या धोरणावरही त्यांनी टीका केली.काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे काकासाहेबांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रमेश यांनी ‘भारतापुढील पर्यावरणाची आव्हाने’ या विषयावर विचार मांडले. रमेश म्हणाले, आर्थिक विकास आणि पर्यावरणात नेहमी संघर्ष होत असतो. सरकार हे आर्थिक विकासालाच प्राधान्य देत असते, त्यांनी पर्यावरणाकडे लक्ष द्यावे. त्यासाठी जनतेमधून दबाव निर्माण झाला पाहिजे. देशात दरवर्षी ८० लाख तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. हे रोजगार आर्थिक विकासातूनच निर्माण होणार आहेत. मात्र हा विकास करताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. विकास आणि पर्यावरण एकत्र घेऊन जाण्याचे आव्हान आपल्यासमोर असणार आहे. आपला देश चीन, अमेरिकेच्या मार्गाने जाऊ शकणार नाही. त्यांनी ज्या चुका केल्या, त्या आपल्याला परवडू शकणार नाहीत. आम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळा शाश्वत मार्ग निवडावा लागेल.लोकसंख्या १२५ कोटींवर जाऊन पोहचली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न उभा राहिला आहे. दूषित पर्यावरणाचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. पर्यावरण हा जीवनशैलीशी निगडीत विषय बनला आहे. एकंदरीत लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य व जीवनशैलीचा प्रश्न यामुळे पर्यावरणाचे रक्षण करावेच लागेल. भाजपाप्रणीत सरकारकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. ताडोबामध्ये कोळसा खाणीस परवानगी दिली आहे, असे रमेश यांनी सांगितले. (प्रतिनिधी)