सुपे : शेतकर्यांनी पाण्याचा उपलब्ध साठा पाहून पीक पद्धत स्वीकारण्याची काळाची गरज असल्याचे मत कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. काळखैरेवाडी (ता.बारामती) अंतर्गत पठारवस्ती नजीकच्या ओढा खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती भाऊसाहेब करे, पंचायत समितीच्या सभापती अमृता गार्डी, उद्योजक शंकरराव चांदगुडे, काका कुतवळ, संजय दरेकर, शौकत कोतवाल, वामन शेंडगे, सरपंच स्वाती कुतवळ, उपसरपंच धनाजी भोंडवे, सदस्या ऊर्मिला चांदगुडे, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, मंडल कृषी अधिकारी के. आर. गावडे, उपविभागीय अभियंता लक्ष्मीकांत जगदाळे, स्वीय सहाय्यक सुनील मुसळे, जालिंदर पवार, नितीन खैरे, गणेश खैरे, प्रकाश काकडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
पाणीसाठा पाहून पीक पद्धत स्वीकारण्याची गरज
By admin | Updated: May 19, 2014 00:08 IST