शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

शहरी भागात ५८ मोठ्या रुग्णालयांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत १७ हजार पदे रिक्त आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत १७ हजार पदे रिक्त आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नवीन ३ हजार ४४४ उपकेंद्रे, ४७१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २१० ग्रामीण रुग्णालये या आरोग्य संस्थांची गरज आहे. शहरी भागासाठी नवीन ६२७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि किमान ५८ मोठी रुग्णालये उभारण्याची गरज आहे. जनआरोग्य अभियानामार्फत १७ जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली आहे.

जनआरोग्य अभियानामार्फत जुलै २०२१ मध्ये पुणे, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, नंदुरबार, परभणी, पालघर, बीड, यवतमाळ, सोलापूर, हिंगोली अशा एकूण १७ जिल्ह्यांतील १२२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २४ ग्रामीण रुग्णालये व १४ उपजिल्हा रुग्णालयांमधून कोविड काळात ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सेवा व सुविधांच्या परिस्थितीचे सर्वेक्षण केले.

एकूण ३८ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांपैकी तब्बल २२ रुग्णालयांमध्ये कोविड काळात सिझेरिअन होत नाहीत, असे धक्कादायक चित्र दिसून आले. ही ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये अकोला, अमरावती, उस्मानाबाद, ठाणे, नंदुरबार, पालघर, पुणे, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यांमधील असल्याचे दिसून आले. ११ रुग्णालयांत कोविड काळात अपघाताच्या केसेसवर उपचार मिळत नव्हते. ८ ग्रामीण रुग्णालये व ४ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कोविड काळात रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या नाहीत. याव्यतिरिक्त ६० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही कोविड काळात मोतीबिंदू, लहान शस्त्रक्रिया, तसेच कुटुंब नियोजन अशा सर्व शस्त्रक्रिया अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या. ११ रुग्णालयांत कोविड काळात अपघाताच्या केसेसवर उपचार मिळत नव्हते.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अत्यावश्यक असूनही ‘नीती आयोग’ देशभर खासगीकरणाचे धोरण जोरात रेटत आहे. महाराष्ट्र सरकारही धोकादायक ‘अदानी मॉडेल’ लागू करण्याच्या विचारात आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण होईल, याचे दुष्परिणाम सामान्य लोक आणि आरोग्य कर्मचारी दोघांवर होणार आहेत. महाराष्ट्रात आरोग्य सेवा हक्क कायदा लागू झाला पाहिजे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी आरोग्यवरील राज्य सरकारचा खर्च दुप्पटीने वाढवायला हवा, अशी मागणी जनआरोग्य अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.

------------------

चौकट :

लोकसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याचे या सर्वेक्षणातून पुन्हा एकदा दिसून आले. कंत्राटी स्वरूपात भरलेल्या व रिक्त पदांमुळे रुग्णालय व्यवस्थेवर खूप ताण आला. दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद २५ टक्के ठिकाणी पदे रिक्त असल्याचे दिसून आले. ग्रामीण रुग्णालयात सर्वात जास्त तज्ज्ञ डॉक्टर्सची ४६ टक्के पदे रिक्त तर १९ टक्के तज्ज्ञांच्या कंत्राटी नियुक्त्या असल्याचे दिसून आले. २४ पैकी १९ ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशिन उपलब्ध नाही, व त्यापैकी ८ ग्रामीण रुग्णालयातून मोफत सोनोग्राफी करण्यासाठी बाहेरसुद्धा पाठविण्याची सुविधा नाही. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांपैकी ५५ टक्के ठिकाणी अत्यावश्यक रक्त साठविण्यासाठी सुविधा नाही. मोतीबिंदू, कुटुंब नियोजन यांसारखी तपासणी शिबिरे व शस्त्रक्रिया अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत.