शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन अयशस्वी

By admin | Updated: November 16, 2015 01:55 IST

माळेगाव कारखान्याच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. १५) आंदोलन करण्यात आले.

माळेगाव : माळेगाव कारखान्याच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. १५) आंदोलन करण्यात आले. मात्र, सभासदांच्या अल्प प्रतिसादामुळे हे आंदोलन अपयशी ठरले. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राष्ट्रवादीने माळेगाव कारखाना बचाव शेतकरी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून कारखाना परिसरातील कामगार पुतळा चौकात सभा घेण्यात आली. या सभेमध्ये विद्यमान संचालकांवर आरोप करण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन केले जाणार असल्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. कारखाना प्रशासनाच्या कारभाराचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. शासन नियमाप्रमाणे एफआरपीची किंंमत एकरकमी मिळावी, कांडे वेचणी बिल त्वरित मिळावे, सभासदांना दिलेल्या एकरी ३००० रुपयांचे अ‍ॅडव्हान्स बिलाचे रूपांतर अनुदानात करावे आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, माजी उपाध्यक्ष मदनराव देवकाते, अनिल जगताप, विश्वासराव देवकाते, योगेश जगताप, करण खलाटे, संभाजी होळकर, लक्ष्मण मोरे, दिलीपराव ढवाण पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, या आंदोलनाबाबत अध्यक्ष रंजन तावरे यांनी सांगितले, की हे आंदोलन केवळ सभासदांच्या डोळ्यांत धूळफेक आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पोटशूळ आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केली नाही. आम्ही सभासदांना एकरी ३००० रुपयांचे अ‍ॅडव्हान्स बिल देऊन त्यांची दिवाळी गोड केली आहे. विरोधकांनी प्रथम आपल्या कारखान्यांवर आंदोलने करावीत. कांडे बिल रोखण्याची परंपरा त्यांच्याच काळातील आहे. सन २००३, ४ व ७ च्या हंगामातही कांडे बिल देण्यात आले नव्हते. पूर्वीच्या संचालक मंडळाने वेळेत साखर विक्री केली असती तर २५ ते ३० कोटींचा फायदा झाला असता. दर असताना साखर विक्री केली गेली नसल्याने आमच्यावर अधिकची साखर विक्रीची वेळ आली. सोमेश्वर, छत्रपती व अजित पवार यांच्या खासगी कारखान्यानेही याच वेळी साखर विक्री केली आहे. आम्ही वेगळे काहीही केलेले नाही. साखर विक्री करताना राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना विश्वासात घेतले होते. (वार्ताहर)