शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

पुणेकरांना खुणावतोय निसर्ग

By admin | Updated: July 19, 2014 23:33 IST

हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे..

 पुणो : हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे..

4अशीच साद आज निसर्ग प्रत्येकाच्या मनाला घालत आहे. उशिरा का असेना पण पुणोकरांना दिलासा देत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे एवढय़ा दिवस शुष्क झालेला निसर्ग टवटवीत झाला आहे. नवीनच फुललेली हिरवळ आणि बरसणा:या पाऊसधारा अनुभवण्याचा धम्माल ‘विकेंड प्लॅन’ केला जात आहे. 
4पुण्यनगरी शिक्षण, संस्कृतीसाठी जशी प्रसिद्ध आहे तसेच या शहराच्या आजुबाजूला अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. जेथे एक किंवा दोन दिवसाची निसर्गसान्निध्याची सहल आयोजित करता येऊ शकते. अगदी जवळचे म्हणजे खडकवासला धरण, मुळशी धरण, सिंहगड ही ठिकाणो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. परंतु या पलीकडेही मस्त दुचाकीवर एक-दोन दिवसांची सहल आयोजित करण्यासारखी 15क्-2क्क् किलोमीटरच्या अंतरावर अनेक ठिकाणो आहेत.  
 
4वरंधा घाट - निसर्गरम्य, भरपूर धबधबे, वाफाळलेला चहा, गरमागरम भजी, कधी हलका तर कधी जोरदार सरी बरसणारा पाऊस, असा डोळ्यांद्वारे मनालाही गारवा देणारा वरंधा घाट आहे. हे ठिकाण पुण्यापासून 82 किलोमीटरवर आहे. भोरमार्गे गेल्यास अजून एक प्रेक्षणीय स्थळ अनुभवता येते. येथील राजवाडा अत्यंत सुदंर व नवा अनुभव देणारा आहे. मित्र-मैत्रिणींसोबत एका दिवसात जाऊन येण्याचे नियोजन करत असाल तर हा उत्तम पर्याय आहे.
 
4रायगड- छत्रपती शिवरायांच्या गौरवाने रायगडाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहेच; परंतु तेवढाच निसर्गसौंदर्याने भरलेला हा गड आहे. येथे ताम्हिणी घाटमार्गे महाडवरून जावे लागते. पुण्यापासून रायगड 125 किलोमीटर असून, ताम्हिणीपासून महाड 47 किलोमीटर व महाड पासून रायगड 25 किलोमीटर आहे. वाटेत महाड येथेदेखील बघण्यासारख्या बौद्धलेण्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेले चवदार तळे ही दोन ठिकाणो आहेत.
 
4राजगड - राजगड या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व तर आहेच सोबत अप्रतिम सौंदर्यस्थळांचे वरदानही आहे. येथील बालेकिल्ला, सुवेळा, संजीवनी व पद्मावती या तीन माच्या, पद्मावती तलाव, नेढे, सईबाई स्मारक ही बघण्यासारखी ठिकाणो आहेत. ट्रेक करण्यासाठी उत्तम जागा आहे. परंतु पावसाळ्यात निसरडा होणारा रस्ता आणि उंचच उंच कठडे असल्याने अपघात होण्याची शक्यताही असते. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन येथे जाणो आवश्यक आहे. पुण्यापासून राजगड 70 किलोमीटर अंतरावर आहे. 
 
4राजमाची - पावसाळ्यात ट्रेक करायचा विचार आला, की मनात पहिले नाव राजमाचीचे आठवावे असे हे ठिकाण आहे. लोणावळ्यावरून पायी वर राजमाचीच्या दिशेने जावे लागते. मस्त कणीस, भजी खात हा प्रवास रमतगमत केला जातो. लोणावळ्यार्पयत जाताना अलीकडील स्टेशन मळवली आहे. येथे सुंदर सात धबधबे वाटेत लागतात. तसेच पुढे लोहगडाकडे जाण्याचा हा रस्ता आहे. राजमाचीचा ट्रेक ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी लोहगड हादेखील उत्तम पर्याय होऊ शकतो. राजमाची पुण्यापासून 1क्6 किलोमीटर अंतरावर आहे. 
 
4नाणोघाट - अत्यंत रम्य व मनोवेधक असे हे ठिकाण आहे. जुन्नर मार्गे येथे जावे लागते. हिरवळीचा आणि पावसाचा मनसोक्त आनंद घेता येण्यासारखी जागा आहे. वाटेत जुन्नर येथील निसर्ग आणि हिरवळ अनुभवत असतानाच तेथील बिबटय़ा निवारण केंद्र हे देखील एक बघण्यासारखे ठिकाण आहे. परंतु येथे पूर्वपरवानगी घेणो आवश्यक असते.
 
4शिवथरघळ -  संत रामदास स्वामी यांनी साधना केलेले व दासबोध लिहिलेले हे ठिकाण आहे. याचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे मोठे आहे तेवढाच येथील निसर्ग डोळ्यांचे पारणो फेडणारा आहे. गड फार उंच नसला तरी ढग जणू येथे गालिचाप्रमाणो पसरलेले असतात. चहू बाजूंनी केवळ हिरवागार निसर्ग आणि मंजूळ आवाज करत कोसळणारे धबधबे, शांत आणि रम्य असे हे ठिकाण आहे. येथे वरंधा घाटमार्गे जावे लागते. हे अंतर पुण्यापासून 90 किलोमीटर आहे. 
 
4ताम्हिणी घाट - दुतर्फा उंच उंच वृक्षांच्या रांगा, समोर दिसणारा काळाभोर वळणावळणाचा रस्ता आणि वरून सुईप्रमाणो बोचणा:या पण त्यातही वेगळाच आनंद देणा:या पावसाचा थेंबांची बरसात अशी अनोखी अनुभूती घ्यायची असेल तर ताम्हिणी घाट उत्तम जागा आहे. चांदणी चौक, भूगावमार्गे गेलात तर 65 किलोमीटरचे अंतर आहे. वाटेत अनेक धबधबे लागतात. तेथे थांबून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता येतो. काही पठारी भागही आहेत. हे पठार फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण असल्यामुळे नकळत पाऊले येथे थांबतात. घाट दुतर्फा झाडीने वेढलेला असल्याने येथे अंधार लवकर पडतो. त्यामुळे सायंकाळी 5 नंतर घाटात जाऊ नये किंवा तोर्पयत घाटातून खाली उतरावे हा सावधगिरीचा संदेश दिला जातो.