शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

हिरव्या शालूंनी नटल्या डोंगररांगा

By admin | Updated: July 29, 2014 23:05 IST

पुणो जिल्ह्याच्या उत्तर आदिवासी भागात संततधार पाऊस सुरू आहे. या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. मात्र, या पावसाने पूर्ण कसर भरून काढली.

भीमाशंकर :  पुणो जिल्ह्याच्या उत्तर आदिवासी भागात संततधार पाऊस सुरू आहे. या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. मात्र, या पावसाने पूर्ण कसर भरून काढली. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे डोंगर हिरवेगार झाले आहेत. डोंगरामधून पाण्याचे धबधबे वाहत आहेत. 
 पावसाने दडी मारल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पेरण्या रखडल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने आदिवासी भागात भात पेरण्यांना सुरवात झाली आहे.  आदिवासी शेतकरी घोंगडय़ा पांघरून भात खाचरांत बैलांच्या साह्याने गाळ करताना दिसत आहेत. तर, महिला भात आवण्या करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंभीर झालेल्या पाण्याचा प्रश्न या पावसामुळे  काही अंशी मिटला आहे. काही वाडय़ा वस्त्यांवर अजुनही टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. 
   शेतकरी हिरवळीवर आपली जनावरे चारत आहेत, असे सुंदर दृश्य सध्या पाहावयास मिळत आहे.  हा सुंदर निसर्ग आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, भोर, वेल्हा या तालुक्यांत निसर्ग बहरला आहे. येथील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक या भागात मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत.  (वार्ताहर)
 
पुणो : दुतर्फा झाडी, त्यातून जाणारी इवलिशी पाऊलवाट, पठार लागले, की नजर जाईल तेथवर हिरवा शालू पांघरून नटलेली भूमाता, मध्येच त्या हिरावाईला चिरत मनसोक्त बरसणारा धबधबा, उंचच उंच डोंगर रांगा, धस्स करणा:या कडा, धुक्याची झालर.. अशा विविध अंगाने बहरलेला निसर्ग पावसाळ्यात सगळ्यांनाच आकर्षित करत असला तरी गिर्यारोहकांना विशेष खुणावतो. त्यामुळेच गिर्यारोहकांची पावले अभेद्य गडांकडे वळू लागली आहेत. 
साचेबद्ध पर्यटनस्थळांपेक्षा द:याखो:यात विराजमान असलेल्या गडांकडे किंवा त्या भोवतालच्या निसर्गसौंदर्यात वसलेल्या ठिकाणांना नेहमी गिर्यारोहकांकडून पसंती दिली जाते. त्यातही पावसाळा म्हटला, की उत्साह द्विगुणीत झालेला असतो. 
थोडय़ा उशिराने का होईना वरुणराजाने आपली कृपादृष्टी केल्याने गिर्यारोहकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. पावसाळा आला की साधारणपणो तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची, कर्नाळा, रायरेश्वर-केंजळगड, पेब, पेठ, पुरंदर, तिकोना, हरिश्चंद्रगड यांसह कार्ला केव्हज, तुंगर्ली लेक, वेल्हा परिसरातील वांगणी डोंगर अथवा कात्रज-सिंहगड अशा ठिकाणी गिर्यारोहणाचे नियोजन केले जाते. यंदाही याच ठिकाणांवर मोठय़ा प्रमाणावर गिर्यारोहकांचा ओढा पाहायला मिळत आहे.   मात्र गेल्या काही वर्षामध्ये कोणतीही माहिती नसताना गाईडविना धोकादायक ठिकाणी जाण्याचे ‘फॅड’ तरुणांमध्ये वाढत आहे, त्यामुळे काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे, या गोष्टी टाळण्यासाठी पावसाळ्यात गाईडशिवाय किंवा त्या ठिकाणची संपूर्ण माहिती असल्याशिवाय भटकंती करणो हे  धोकादायक असल्याचे  सतीश केळकर यांनी स्पष्ट केले आहे.