शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या शालूंनी नटल्या डोंगररांगा

By admin | Updated: July 29, 2014 23:05 IST

पुणो जिल्ह्याच्या उत्तर आदिवासी भागात संततधार पाऊस सुरू आहे. या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. मात्र, या पावसाने पूर्ण कसर भरून काढली.

भीमाशंकर :  पुणो जिल्ह्याच्या उत्तर आदिवासी भागात संततधार पाऊस सुरू आहे. या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाला. मात्र, या पावसाने पूर्ण कसर भरून काढली. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे डोंगर हिरवेगार झाले आहेत. डोंगरामधून पाण्याचे धबधबे वाहत आहेत. 
 पावसाने दडी मारल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पेरण्या रखडल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने आदिवासी भागात भात पेरण्यांना सुरवात झाली आहे.  आदिवासी शेतकरी घोंगडय़ा पांघरून भात खाचरांत बैलांच्या साह्याने गाळ करताना दिसत आहेत. तर, महिला भात आवण्या करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंभीर झालेल्या पाण्याचा प्रश्न या पावसामुळे  काही अंशी मिटला आहे. काही वाडय़ा वस्त्यांवर अजुनही टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. 
   शेतकरी हिरवळीवर आपली जनावरे चारत आहेत, असे सुंदर दृश्य सध्या पाहावयास मिळत आहे.  हा सुंदर निसर्ग आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, भोर, वेल्हा या तालुक्यांत निसर्ग बहरला आहे. येथील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक या भागात मोठय़ा प्रमाणात गर्दी करत आहेत.  (वार्ताहर)
 
पुणो : दुतर्फा झाडी, त्यातून जाणारी इवलिशी पाऊलवाट, पठार लागले, की नजर जाईल तेथवर हिरवा शालू पांघरून नटलेली भूमाता, मध्येच त्या हिरावाईला चिरत मनसोक्त बरसणारा धबधबा, उंचच उंच डोंगर रांगा, धस्स करणा:या कडा, धुक्याची झालर.. अशा विविध अंगाने बहरलेला निसर्ग पावसाळ्यात सगळ्यांनाच आकर्षित करत असला तरी गिर्यारोहकांना विशेष खुणावतो. त्यामुळेच गिर्यारोहकांची पावले अभेद्य गडांकडे वळू लागली आहेत. 
साचेबद्ध पर्यटनस्थळांपेक्षा द:याखो:यात विराजमान असलेल्या गडांकडे किंवा त्या भोवतालच्या निसर्गसौंदर्यात वसलेल्या ठिकाणांना नेहमी गिर्यारोहकांकडून पसंती दिली जाते. त्यातही पावसाळा म्हटला, की उत्साह द्विगुणीत झालेला असतो. 
थोडय़ा उशिराने का होईना वरुणराजाने आपली कृपादृष्टी केल्याने गिर्यारोहकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. पावसाळा आला की साधारणपणो तोरणा, लोहगड, विसापूर, राजमाची, कर्नाळा, रायरेश्वर-केंजळगड, पेब, पेठ, पुरंदर, तिकोना, हरिश्चंद्रगड यांसह कार्ला केव्हज, तुंगर्ली लेक, वेल्हा परिसरातील वांगणी डोंगर अथवा कात्रज-सिंहगड अशा ठिकाणी गिर्यारोहणाचे नियोजन केले जाते. यंदाही याच ठिकाणांवर मोठय़ा प्रमाणावर गिर्यारोहकांचा ओढा पाहायला मिळत आहे.   मात्र गेल्या काही वर्षामध्ये कोणतीही माहिती नसताना गाईडविना धोकादायक ठिकाणी जाण्याचे ‘फॅड’ तरुणांमध्ये वाढत आहे, त्यामुळे काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे, या गोष्टी टाळण्यासाठी पावसाळ्यात गाईडशिवाय किंवा त्या ठिकाणची संपूर्ण माहिती असल्याशिवाय भटकंती करणो हे  धोकादायक असल्याचे  सतीश केळकर यांनी स्पष्ट केले आहे.