शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

नारायणगावला कडकडीत बंद

By admin | Updated: April 10, 2017 01:58 IST

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी़, डॉ़ स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी

नारायणगाव : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी़, डॉ़ स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी किसान क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला नारायणगाव, वारुळवाडी, खोडद या गावांमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळून सर्व व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला़ संघटनेच्या माध्यमातून नारायणगाव येथे कामबंद आंदोलन, मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी विविध मागण्या सादर केल्या़ दरम्यान, रास्ता रोको व मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून निषेध व्यक्त केला. तसेच, ट्रॅक्टर व औजारे घेऊन नारायणगाव शहरातून रॅलीद्वारे आंदोलन केले़कुरेशी मार्केट येथे झालेल्या निषेध व संपाच्या सभेत बोलताना अतुल बेनके म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी रक्कम नाही; परंतु पक्षाच्या जाहिराती करण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत़ शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही़ शेतकरी जगला काय, मेला काय, या शासनाला त्याचे घेणेदेणे नाही. जर कर्जमाफी झाली नाही, तर पुढील आंदोलन हे तीव्र असेल याची नोंद शासनाने घ्यावी़ शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे़ आशाताई बुचके म्हणाल्या की, शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, सर्वच पक्षाने कर्जमाफीचा जोर लावत असताना शासन बघ्याची भूमिका घेत आहे़ उत्तर प्रदेशामध्ये भाजपा सरकार कर्जमाफी देते, परंतु महाराष्ट्रात कर्जमाफी देत नाही, असा दुजाभाव करणाऱ्या भाजपा सरकारला शेतकरी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही़ माऊली खंडागळे यांनी शेतकऱ्यांची व्यथा कवितेद्वारे सादर केली़. याला उपस्थितांनी दाद दिली.़ याप्रसंगी विनायक मोरे, रोहिदास भोर, सोमनाथ शिंदे, सतीश पाटे, सोपान खैरे, राजू गावडे, जितेंद्र बिडवई, श्रीकांत वायकर, गणेश भोर, योगेश पाटे आदी शेतकऱ्यांनी आपले विचार व्यक्त करून विविध मागण्या सादर केल्या़ उपस्थित शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले़ या वेळी शेतकऱ्यांच्या व्यथा असलेले निवेदन तहसीलदार आशा होळकर यांना सादर केले़ या वेळी मंडलाधिकारी योगेश पाडळे, तलाठी नितीन चौरे उपस्थित होते.नारायणगाव शहरात पुकारण्यात आलेल्या बंदला तीनही गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, सर्व व्यापाऱ्यांसह हॉटेलचालक, भाजी व्यावसायिक यांनी कडकडीत असा बंद पाळला़ दिवसभर दुकाने बंद होती. किसान क्रांती मोर्चा जुन्नर तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांनी आपली शेती उपयोगी औजारे व टॅ्रक्टर घेऊन रॅली काढून आपल्या मागण्या सादर केल्या़ या रॅलीमध्ये शंभर टॅ्रक्टर सहभागी झाले होते़ शेतकऱ्यांनी बैलगाडीतून रॅलीद्वारे काढलेल्या मोर्चात शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून शासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.