शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वेध विलिनीकरणाचे नांदोशी सणसनगर भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

डंपरच्या अनिर्बंध वाहतुकीचा दुष्परीणाम; विद्यार्थ्यांचेही नुकसान दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दगडखाणीतून होणाऱ्या वाहतुकीमुळे पीएमआरडीएने तयार केलेला ...

डंपरच्या अनिर्बंध वाहतुकीचा दुष्परीणाम; विद्यार्थ्यांचेही नुकसान

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दगडखाणीतून होणाऱ्या वाहतुकीमुळे पीएमआरडीएने तयार केलेला मुख्य रस्ता चांगलाच खचला असून तो धोकादायक ठरत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहे.

गावातून मुख्य रस्त्याचे काम पीएमआरडीएकडून जलदगतीने नुकतेच केले. मात्र दररोज हजारोंच्या संख्येने ओव्हरलोड अवजड वाहने या रस्त्यावरुन वेगाने जातात. त्यामुळे रस्त्याशेजारील नागरिकांना दररोज धुळीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत असून हा रस्ता पुर्णतः खचला असुन तो असुरक्षित झाला आहे.

गावात शाळा सध्या कोरोनामुळे बंद आहे मात्र जेव्हा शाळा सुरु होत्या तेव्हा खाणीच्या कर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांना शाळेत शिकवलेलं कळत नाही, अशी तक्रार शाळकरी विद्यार्थी करतात. गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नही गंभीर असून ड्रेनेजची सुविधा नसल्याने सांडपाणी उघड्यावर सोडले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून याबद्दल गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गावात कचरा उचलण्यासाठी यंत्रणा नसल्याने सणसवाडी परिसरात हा कचरा उघड्यावर टाकला जातो. त्याची योग्य विल्हेवाट न लावता त्याच ठिकाणी जाळला जात असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण होते. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा असते मात्र हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. मिळणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे आधी वीज, पाणी, ड्रेनेजची सुविधा द्या अशी गावकऱ्यांची मागणी आहे. गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी असून त्यांना जमिनीवर आरक्षण पडण्याची भीती आहे. महापालिका विलीनीकरणानंतर शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून गावाचा विकास व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

कोट

खाणकामामुळे घरांची पडझड झाली. आता तर बांधकामाचे आयुष्य कमी होत असून खाणकाम करणारे शासकीय नियमांची पायमल्ली करत आहेत.

-भरत कोंढाळकर,नागरिक

कोट

प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे गावात मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करायला हवे. अवजड वाहनांची वाहतूक बंद व्हावी.

-यशवंत कोंढाळकर, नागरिक

फोटो ओळ

नांदोशी गावातील खाणकामामुळे अशा पद्धतीने डोंगर कोरल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.