शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वेध विलिनीकरणाचे नांदोशी सणसनगर भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

डंपरच्या अनिर्बंध वाहतुकीचा दुष्परीणाम; विद्यार्थ्यांचेही नुकसान दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दगडखाणीतून होणाऱ्या वाहतुकीमुळे पीएमआरडीएने तयार केलेला ...

डंपरच्या अनिर्बंध वाहतुकीचा दुष्परीणाम; विद्यार्थ्यांचेही नुकसान

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दगडखाणीतून होणाऱ्या वाहतुकीमुळे पीएमआरडीएने तयार केलेला मुख्य रस्ता चांगलाच खचला असून तो धोकादायक ठरत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहे.

गावातून मुख्य रस्त्याचे काम पीएमआरडीएकडून जलदगतीने नुकतेच केले. मात्र दररोज हजारोंच्या संख्येने ओव्हरलोड अवजड वाहने या रस्त्यावरुन वेगाने जातात. त्यामुळे रस्त्याशेजारील नागरिकांना दररोज धुळीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत असून हा रस्ता पुर्णतः खचला असुन तो असुरक्षित झाला आहे.

गावात शाळा सध्या कोरोनामुळे बंद आहे मात्र जेव्हा शाळा सुरु होत्या तेव्हा खाणीच्या कर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांना शाळेत शिकवलेलं कळत नाही, अशी तक्रार शाळकरी विद्यार्थी करतात. गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्नही गंभीर असून ड्रेनेजची सुविधा नसल्याने सांडपाणी उघड्यावर सोडले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून याबद्दल गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गावात कचरा उचलण्यासाठी यंत्रणा नसल्याने सणसवाडी परिसरात हा कचरा उघड्यावर टाकला जातो. त्याची योग्य विल्हेवाट न लावता त्याच ठिकाणी जाळला जात असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण होते. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा असते मात्र हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. मिळणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे आधी वीज, पाणी, ड्रेनेजची सुविधा द्या अशी गावकऱ्यांची मागणी आहे. गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी असून त्यांना जमिनीवर आरक्षण पडण्याची भीती आहे. महापालिका विलीनीकरणानंतर शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून गावाचा विकास व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

कोट

खाणकामामुळे घरांची पडझड झाली. आता तर बांधकामाचे आयुष्य कमी होत असून खाणकाम करणारे शासकीय नियमांची पायमल्ली करत आहेत.

-भरत कोंढाळकर,नागरिक

कोट

प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे गावात मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करायला हवे. अवजड वाहनांची वाहतूक बंद व्हावी.

-यशवंत कोंढाळकर, नागरिक

फोटो ओळ

नांदोशी गावातील खाणकामामुळे अशा पद्धतीने डोंगर कोरल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.