शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नानांनी फटकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “दिल्ली-मुंबई वाऱ्या बंद करा आणि शहराकडे लक्ष द्या. पक्षाचे इतके नुकसान झाल्यावरही जाग येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “दिल्ली-मुंबई वाऱ्या बंद करा आणि शहराकडे लक्ष द्या. पक्षाचे इतके नुकसान झाल्यावरही जाग येणार नसेल तर कारवाई करावी लागेल,” या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (दि. १६) पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना फटकावले.

मुंबईत गांधीभवनमध्ये पटोले यांनी मंगळवारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. पुण्यातील पक्षाच्या राजकीय स्थितीबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “तुमचे वागणेच याला कारणीभूत आहे,” असे खडसावले. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार अनंत गाडगीळ, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर यांच्यासह पालिकेतील गटनेते आबा बागूल, सर्व कॉंग्रेस नगरसेवक तसेच प्रदेश कार्यकारिणीचे पुण्यातील सर्व पदाधिकारी असे शंभरपेक्षा जास्त काँग्रेसजन या बैठकीला उपस्थित होते.

“लोकसभेपासून ते महापालिकेपर्यंत कुठेही पक्षाला गेल्या दहा वर्षांत यश मिळालेले नाही. पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो सगळा ढासळला आहे. महापालिकेतील अठ्ठावीस नगरसेवकांची संख्या नऊवर आली. लोकसभा, विधानसभा सगळीकडे दारूण पराभव झाला. इतके होऊनही बेदिली माजलेलीच आहे. कोणीही सरळपणे पक्षाचे काम करत नाही. पायात पाय तरी किती घालणार,” असा प्रश्न पटोले यांनी केल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या निडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना प्रभाग नेमून दिले जातील. आतापासूनच काम सुरू करा. त्या प्रभागातील पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावीच लागेल. ती जबाबदारी पार पाडत नाही असे लक्षात आले तर तत्काळ कारवाई केली जाईल असा इशाराही पटोले यांनी दिला.

शहराध्यक्ष बागवे यांनी त्यांना शहरातील सध्य राजकीय स्थितीची माहिती पटोलेंना दिली. प्रभाग रचना तसेच महापालिकेशी संबधित अन्य गोष्टींमध्ये पक्षाची मुंबईतून मदत लागेल, असे बागवे यांनी स्पष्ट केले. आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन पटोले यांनी दिले.

चौकट

शहराध्यक्ष बदलावर चर्चा नाही

शहराध्यक्ष बदलण्याच्या महत्वाच्या विषयावर पटोलेंच्या बैठकीत काही चर्चा झाली नाही. विद्यमान शहराध्यक्ष रमेश बागवे यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेतल्याने दोन पदे त्यांच्याकडे ठेवली जाणार नाही, असा कयास बांधून शहराध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली. मात्र पटोले यांनी हा विषयच चर्चेला न घेतल्याने त्यांची निराशा झाली.