शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नानांनी फटकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “दिल्ली-मुंबई वाऱ्या बंद करा आणि शहराकडे लक्ष द्या. पक्षाचे इतके नुकसान झाल्यावरही जाग येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “दिल्ली-मुंबई वाऱ्या बंद करा आणि शहराकडे लक्ष द्या. पक्षाचे इतके नुकसान झाल्यावरही जाग येणार नसेल तर कारवाई करावी लागेल,” या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (दि. १६) पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना फटकावले.

मुंबईत गांधीभवनमध्ये पटोले यांनी मंगळवारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. पुण्यातील पक्षाच्या राजकीय स्थितीबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “तुमचे वागणेच याला कारणीभूत आहे,” असे खडसावले. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार अनंत गाडगीळ, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर यांच्यासह पालिकेतील गटनेते आबा बागूल, सर्व कॉंग्रेस नगरसेवक तसेच प्रदेश कार्यकारिणीचे पुण्यातील सर्व पदाधिकारी असे शंभरपेक्षा जास्त काँग्रेसजन या बैठकीला उपस्थित होते.

“लोकसभेपासून ते महापालिकेपर्यंत कुठेही पक्षाला गेल्या दहा वर्षांत यश मिळालेले नाही. पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो सगळा ढासळला आहे. महापालिकेतील अठ्ठावीस नगरसेवकांची संख्या नऊवर आली. लोकसभा, विधानसभा सगळीकडे दारूण पराभव झाला. इतके होऊनही बेदिली माजलेलीच आहे. कोणीही सरळपणे पक्षाचे काम करत नाही. पायात पाय तरी किती घालणार,” असा प्रश्न पटोले यांनी केल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या निडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना प्रभाग नेमून दिले जातील. आतापासूनच काम सुरू करा. त्या प्रभागातील पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावीच लागेल. ती जबाबदारी पार पाडत नाही असे लक्षात आले तर तत्काळ कारवाई केली जाईल असा इशाराही पटोले यांनी दिला.

शहराध्यक्ष बागवे यांनी त्यांना शहरातील सध्य राजकीय स्थितीची माहिती पटोलेंना दिली. प्रभाग रचना तसेच महापालिकेशी संबधित अन्य गोष्टींमध्ये पक्षाची मुंबईतून मदत लागेल, असे बागवे यांनी स्पष्ट केले. आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन पटोले यांनी दिले.

चौकट

शहराध्यक्ष बदलावर चर्चा नाही

शहराध्यक्ष बदलण्याच्या महत्वाच्या विषयावर पटोलेंच्या बैठकीत काही चर्चा झाली नाही. विद्यमान शहराध्यक्ष रमेश बागवे यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेतल्याने दोन पदे त्यांच्याकडे ठेवली जाणार नाही, असा कयास बांधून शहराध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली. मात्र पटोले यांनी हा विषयच चर्चेला न घेतल्याने त्यांची निराशा झाली.