शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नानांनी फटकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “दिल्ली-मुंबई वाऱ्या बंद करा आणि शहराकडे लक्ष द्या. पक्षाचे इतके नुकसान झाल्यावरही जाग येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “दिल्ली-मुंबई वाऱ्या बंद करा आणि शहराकडे लक्ष द्या. पक्षाचे इतके नुकसान झाल्यावरही जाग येणार नसेल तर कारवाई करावी लागेल,” या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (दि. १६) पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना फटकावले.

मुंबईत गांधीभवनमध्ये पटोले यांनी मंगळवारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. पुण्यातील पक्षाच्या राजकीय स्थितीबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “तुमचे वागणेच याला कारणीभूत आहे,” असे खडसावले. शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार अनंत गाडगीळ, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर यांच्यासह पालिकेतील गटनेते आबा बागूल, सर्व कॉंग्रेस नगरसेवक तसेच प्रदेश कार्यकारिणीचे पुण्यातील सर्व पदाधिकारी असे शंभरपेक्षा जास्त काँग्रेसजन या बैठकीला उपस्थित होते.

“लोकसभेपासून ते महापालिकेपर्यंत कुठेही पक्षाला गेल्या दहा वर्षांत यश मिळालेले नाही. पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो सगळा ढासळला आहे. महापालिकेतील अठ्ठावीस नगरसेवकांची संख्या नऊवर आली. लोकसभा, विधानसभा सगळीकडे दारूण पराभव झाला. इतके होऊनही बेदिली माजलेलीच आहे. कोणीही सरळपणे पक्षाचे काम करत नाही. पायात पाय तरी किती घालणार,” असा प्रश्न पटोले यांनी केल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या निडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना प्रभाग नेमून दिले जातील. आतापासूनच काम सुरू करा. त्या प्रभागातील पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावीच लागेल. ती जबाबदारी पार पाडत नाही असे लक्षात आले तर तत्काळ कारवाई केली जाईल असा इशाराही पटोले यांनी दिला.

शहराध्यक्ष बागवे यांनी त्यांना शहरातील सध्य राजकीय स्थितीची माहिती पटोलेंना दिली. प्रभाग रचना तसेच महापालिकेशी संबधित अन्य गोष्टींमध्ये पक्षाची मुंबईतून मदत लागेल, असे बागवे यांनी स्पष्ट केले. आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन पटोले यांनी दिले.

चौकट

शहराध्यक्ष बदलावर चर्चा नाही

शहराध्यक्ष बदलण्याच्या महत्वाच्या विषयावर पटोलेंच्या बैठकीत काही चर्चा झाली नाही. विद्यमान शहराध्यक्ष रमेश बागवे यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेतल्याने दोन पदे त्यांच्याकडे ठेवली जाणार नाही, असा कयास बांधून शहराध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली. मात्र पटोले यांनी हा विषयच चर्चेला न घेतल्याने त्यांची निराशा झाली.