शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीसी जावे ऐसे माझे मनी । विठाई जननी भेटे केव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:11 IST

महर्षी वाल्मीकींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हेनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत हद्दीतील असणारा पहिला मुक्काम ...

महर्षी वाल्मीकींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हेनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत हद्दीतील असणारा पहिला मुक्काम वाल्हे येथे असतो. यंदा आषाढी वारी दोन जुलै रोजी सुरू होत आहे.

गेल्या वर्षी कोरोना महामारामारीच्या संकटामुळे वारी प्रातिनिधिक स्वरूपात झाली होती. त्यामुळे वारकऱ्यांना पायी वारी करता आली नाही. त्यामुळे वारीची परंपरा खंडित झाली असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये मोठी नाराजी आहे. यंदा तरी हा सोहळा व्हावा व शासनाने त्यासाठी दक्षतेचे सर्व उपाय घेऊन परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी हभप बबन महाराज भुजबळ यांनी व्यक्त केली.

कोरोनाचे हे संकट अजून कमी झालेले नाही, परंतु वारीसाठी तब्बल महिनाभर अवकाश आहे. त्यामुळे योग्य ते नियोजन करून शासनाने पायी वारी कशी करता येईल याचा सकारात्मक विचार केला केला पाहिजे. वारकऱ्यांची संख्या आणि ज्या गावातून सोहळा जाणार आहे तेथली परिस्थिती पाहून गावापासून दोन तीन किलो मीटरवर मुक्काम करून हा सोहळा मर्यादित स्वरूपात का होईना पण पायी वारी व्हायला हवी. महामारीचा नेमका किती त्रास होईल याचाही शोध घ्यायला हवा, असे मत महर्षी वाल्मीकी पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. अशोकमहाराज पवार यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्कामाचे वाल्हे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींचे संजीवनी समाधी मंदिर वाल्हे गावात असल्याने, आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी संप्रदायातील अनेक लहान-थोर वाल्हे येथील वाल्मीकी मंदिरात येऊन नतमस्तक होत असतात. वाल्हे गावातून मागील काही वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची पूर्वपरंपरा असलेली ग्राम प्रदर्शन खंडित झाली असल्याने, ग्रामस्थांच्यामधून नाराजी आहेच. त्यातच मागील वर्षांपासून कोरोना संकटामुळे पायी पालखी सोहळा शासनाने रद्द केले होते. समाजहितासाठी शासन योग्य तो निर्णय घेईल. तो आम्हास मान्य असेल; परंतु शासनाने कमी वारकऱ्यांच्या उपस्थित का होईना, पण पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे घेऊन जावा. पायी पालखी सोहळ्याची पूर्वापर परंपरा खंडित होऊ नये हीच पांडुरंगचरणी प्रार्थना आहे.

- महावीर भुजबळ,

पायी पालखी सोहळ्यातील वारकरी भक्त.