शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या विचारांचा आदर्श देणारे संग्रहालय उभारणार

By admin | Updated: January 20, 2015 00:58 IST

राज्याभिषेक सोहळ्याला देशातील सात प्रमुख नद्यांचे पूजन करून छत्रपती शिवाजीमहाराज यांनी देशाच्या एकतेचा विचार पहिल्यांदा मांडला.

पुणे : राज्याभिषेक सोहळ्याला देशातील सात प्रमुख नद्यांचे पूजन करून छत्रपती शिवाजीमहाराज यांनी देशाच्या एकतेचा विचार पहिल्यांदा मांडला. त्यांचे मातृप्रेम, मातृभूमीप्रेम या सगळ्यांचा तरुणांनी आदर्श घ्यायला हवा. यासाठी शिवरायांच्या विचारांचा आदर्श देणारे भव्य संग्रहालय उभारण्याचा मानस असल्याचे ‘एशियन हेरिटेज फाउंडेशन’चे संस्थापक-अध्यक्ष पद्मभूषण राजीव सेठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भारतीय उपखंडातीतील सांस्कृतिक वारशांच्या जतनासाठी काम करत असलेले सेठी सध्या शिवरायांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातील विविध भागांना भेट देत आहेत. पुण्यात भरलेल्या पूर्वा दर्डा-कोठारी आणि हर्निश सेठ यांच्या इंट्रिया प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’चे चेअरमन, खासदार विजय दर्डा यांच्याशीही याबाबत त्यांची सविस्तर चर्चा झाली. शिवरायांच्या अनोख्या स्मारकाची अभिनव कल्पना घेऊन काम करीत असलेल्या सेठी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. सेठी म्हणाले, ‘‘ शिवकालाची आठवण करून देणारे पुतळे, वस्तू या स्मारकात असतीलच; पण त्यापेक्षाही आजच्या पिढीला शिवरायांचे क्रांतिकारी विचार जे आजच्या काळाशीही सुसंगत आहेत, त्यांची माहिती या संग्रहालयातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज शिवरायांचे नाव मतांसाठी वापरले जाते. परंतु, त्यांच्या विचारांची फारशी माहिती तरुणांना नाही. त्यांनी आयुष्यभर पाळलेली मूल्ये, अंगीकारलेली तत्त्वे नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजेत. त्यामुळेच हे स्मारक केवळ राज्य किंवा देशपातळीवर नसेल, तर त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर करणार आहे. शिवरायांनी दिलेला एकतेचा संदेश चिरंतन ठेवण्यासाठी देशातील वेगवेगळ्या नद्यांमधील पाणी एकत्र करून कारंजाची उभारणी केली जाणार आहे. आर्थिक, सामाजिक विकास साधताना आपली अस्मिताही जपली पाहिजे सांगताना सेठी म्हणाले, ‘‘भूतकाळाचे भविष्याशी काय नाते आहे हे समजून घेतले पाहिजे. देशाच्या विकासात सांस्कृतिक वारशाचाही विसर पडता कामा नये. त्यामुळे आजच्या काळात शिवरायांचा विसर पडला तर आपण आपलेच फार मोठे नुकसान करण्यासारखे आहे. सेठी म्हणाले, ‘‘भारतात सध्या ज्ञानाधिष्ठित उद्योग (नॉलेज इंडस्ट्री) वाढत आहेत. परकीय ज्ञान आत्मसात करून आपण त्याद्वारे विकास साधू पाहत आहोत. आयटी, बीपीओ वाढत आहेत. परंतु, उद्या चीन, आफ्रिकेतील देशही हे क्षेत्र पादाक्रांत करू शकतात. त्यामुळे आपले पारंपरिक ज्ञान, कलांची शक्ती आपण ओळखायला हवी. यासाठी विद्यापीठातील अभ्यासक्रमांत लोककला आणि लोककारागिरीचा समावेश करायला हवा. कारागीर कदाचित रुढार्थाने शिक्षण घेतलेले नसतील, तरीही त्यांना शिक्षक म्हणून नेमायला हवे. तरच ही कला आपण जिवंत ठेवू शकतो. देशाच्या मातीचा सुगंध असलेले उद्योगच आपली खरी शक्ती असतील.’’ (प्रतिनिधी)४देशातील लोककलावंत आणि कारागिरांसाठी विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सेठी यांनी यााबाबतच्या शासकीय धोरणावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘देशातील लोककलावंतांची संख्या आणि स्थिती याबाबतची कोणतीही आकडेवारी आजपर्यंत शासनाने तयार केलेली नाही. त्यामुळे देशाचे वैभव आणि शक्ती असलेली कारागिरी नामशेष होण्याची भीती आहे. कलेच्या माध्यमातून आपली उपजीविका करणाऱ्या डोंबाऱ्यासारख्या कलाकारांना कायद्याने थेट भिकारी म्हटले आहे. ४याच डोंबाऱ्यासारख्या कलाकारांना जिम्नॅशियमचे शिक्षण दिले तर ते भारतासाठी सुवर्णपदकही आणू शकतील. विविध कला जोपासणारे असे अनेक कलाकार गावागावांत आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय केले जाईल, याचा विचार होणे आवश्यक आहे.’’