शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालिका खाईना भूखंडाचे श्रीखंड !

By admin | Updated: November 4, 2015 04:19 IST

मालकी महापालिकेची; मात्र त्याची कायदेशीर नोंदच नाही, असे शेकडो भूखंड शहराच्या मध्य भागापासून ते उपनगरांतही पडून आहेत. त्याचा बेकायदा वापर होत असूनही पालिका प्रशासन

पुणे : मालकी महापालिकेची; मात्र त्याची कायदेशीर नोंदच नाही, असे शेकडो भूखंड शहराच्या मध्य भागापासून ते उपनगरांतही पडून आहेत. त्याचा बेकायदा वापर होत असूनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यातील काही जागांचे परस्पर व्यवहारही होत आहेत.जागांसाठी एकीकडे प्रत्येक चौरस फुटाला काही हजार रुपयांचा दर सध्या सुरू असताना, महापालिकेने मात्र आपली अब्जावधी रुपये किमतीची करोडो चौरस फूट जमीन वाऱ्यावर सोडून दिली आहे. या पडून असलेल्या भूखंडांमध्ये उद्यान, रुग्णालय, सांस्कृतिक सभागृह अशा सार्वजनिक वापरांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांचाही समावेश आहे. असे अनेक भूखंड महापालिकेच्या ताब्यात आहेत; मात्र त्यांच्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावर मालक म्हणून पालिकेची नोंदच नाही. काही भूखंड कसे आले, कोणाकडून आले, याची माहिती नाही.अशा मालमत्ताची व्यवस्था पाहण्यासाठी पालिकेत ‘मालमत्ता व्यवस्थापन’ असा स्वतंत्र विभाग आहे. महापालिकेच्या मिळकतींची नोंद ठेवणे, त्याची कायदेशीर बाजू तपासून पाहणे, सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून महापालिकेची नोंद करून घेणे, ताब्यात आलेल्या मिळकतींच्या संरक्षणाची व्यवस्था करणे, रिकामा भूखंड असेल, तर त्यावर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे, आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करणे, त्याचा पाठपुरावा करणे, ही सर्व कामे मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडेच आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे उपायुक्त दर्जाचे पद व स्वतंत्र कर्मचारीही आहेत.असे असतानाही महापालिकेच्या अनेक भूखंडांवर अतिक्रमणे झालेली आहेत. पद्मावती येथे एका मोठ्या भूखंडावर खासगी प्रवासी वाहतूक कंपनीच्या गाड्या लावल्या जातात. त्या लावण्याचे पैसे त्या कंपनीकडून परस्पर एक जण वसूल करीत असतो. या भूखंडाचा एक मोठा भाग महापालिकेने उद्यानासाठी आरक्षित केला आहे. तो महापालिकेकडे हस्तांतरित केला गेला असला, तरी महापालिकेकडे नक्की किती व कोणते क्षेत्र हस्तांतरित झाले, याच्या नोंदीच नाहीत. त्यामुळे संबंधिताकडून सगळाच भूखंड वापरला जात आहे. घोरपडी पेठ येथेही एका मोठ्या भूखंडाचा असाच गैरवापर सुरू आहे. काही भूखंडावर झोपड्यांची अतिक्रमणे, तर काहींवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत.माहिती जमा करण्यात येत आहेनेमके किती भूखंड असे विनावापर किंवा कायदेशीर नाव नसलेले आहेत, त्याची माहिती जमा करण्यात येत आहे. फार पूर्वी झालेली काही प्रकरणे आहेत. आता सातबाऱ्यावर नाव लागल्याशिवाय जागा ताब्यात घेतलीच जात नाही; तसेच जागा ताब्यात घेतल्यानंतर, ती ज्यासाठी आरक्षित आहे त्या विभागाकडे हस्तांतरित केली जाते. - सतीश कुलकर्णीउपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापनसविस्तर माहितीही नाहीमहापालिकेचे किती भूखंड असे विनावापर पडून आहेत, याची सविस्तर माहितीही महापालिकेत नाही. मनुष्यबळ नाही, प्रकरण जुने आहे, कागदपत्रे पाहायला लागतील, नाव लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगितले जाते. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे अंदाज काढला, तर अब्जावधी रुपयांची मालमत्ता महापालिकने अशीच वाऱ्यावर सोडून दिली आहे. पालिका प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे. तो बऱ्याच वर्षांपासून असाच आहे. प्रत्येक अधिकारी प्रकरण जुने आहे, असेच सांगत असतो. ते मार्गी कधी लागणार, हे मात्र कोणीच सांगत नाही. हे सगळे भूखंड हातातून गेल्यानंतरच पालिकेला जाग येईल, असे दिसते.- आबा बागुलउपमहापौर