शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पालिका खाईना भूखंडाचे श्रीखंड !

By admin | Updated: November 4, 2015 04:19 IST

मालकी महापालिकेची; मात्र त्याची कायदेशीर नोंदच नाही, असे शेकडो भूखंड शहराच्या मध्य भागापासून ते उपनगरांतही पडून आहेत. त्याचा बेकायदा वापर होत असूनही पालिका प्रशासन

पुणे : मालकी महापालिकेची; मात्र त्याची कायदेशीर नोंदच नाही, असे शेकडो भूखंड शहराच्या मध्य भागापासून ते उपनगरांतही पडून आहेत. त्याचा बेकायदा वापर होत असूनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यातील काही जागांचे परस्पर व्यवहारही होत आहेत.जागांसाठी एकीकडे प्रत्येक चौरस फुटाला काही हजार रुपयांचा दर सध्या सुरू असताना, महापालिकेने मात्र आपली अब्जावधी रुपये किमतीची करोडो चौरस फूट जमीन वाऱ्यावर सोडून दिली आहे. या पडून असलेल्या भूखंडांमध्ये उद्यान, रुग्णालय, सांस्कृतिक सभागृह अशा सार्वजनिक वापरांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांचाही समावेश आहे. असे अनेक भूखंड महापालिकेच्या ताब्यात आहेत; मात्र त्यांच्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावर मालक म्हणून पालिकेची नोंदच नाही. काही भूखंड कसे आले, कोणाकडून आले, याची माहिती नाही.अशा मालमत्ताची व्यवस्था पाहण्यासाठी पालिकेत ‘मालमत्ता व्यवस्थापन’ असा स्वतंत्र विभाग आहे. महापालिकेच्या मिळकतींची नोंद ठेवणे, त्याची कायदेशीर बाजू तपासून पाहणे, सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून महापालिकेची नोंद करून घेणे, ताब्यात आलेल्या मिळकतींच्या संरक्षणाची व्यवस्था करणे, रिकामा भूखंड असेल, तर त्यावर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेणे, आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करणे, त्याचा पाठपुरावा करणे, ही सर्व कामे मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडेच आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे उपायुक्त दर्जाचे पद व स्वतंत्र कर्मचारीही आहेत.असे असतानाही महापालिकेच्या अनेक भूखंडांवर अतिक्रमणे झालेली आहेत. पद्मावती येथे एका मोठ्या भूखंडावर खासगी प्रवासी वाहतूक कंपनीच्या गाड्या लावल्या जातात. त्या लावण्याचे पैसे त्या कंपनीकडून परस्पर एक जण वसूल करीत असतो. या भूखंडाचा एक मोठा भाग महापालिकेने उद्यानासाठी आरक्षित केला आहे. तो महापालिकेकडे हस्तांतरित केला गेला असला, तरी महापालिकेकडे नक्की किती व कोणते क्षेत्र हस्तांतरित झाले, याच्या नोंदीच नाहीत. त्यामुळे संबंधिताकडून सगळाच भूखंड वापरला जात आहे. घोरपडी पेठ येथेही एका मोठ्या भूखंडाचा असाच गैरवापर सुरू आहे. काही भूखंडावर झोपड्यांची अतिक्रमणे, तर काहींवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत.माहिती जमा करण्यात येत आहेनेमके किती भूखंड असे विनावापर किंवा कायदेशीर नाव नसलेले आहेत, त्याची माहिती जमा करण्यात येत आहे. फार पूर्वी झालेली काही प्रकरणे आहेत. आता सातबाऱ्यावर नाव लागल्याशिवाय जागा ताब्यात घेतलीच जात नाही; तसेच जागा ताब्यात घेतल्यानंतर, ती ज्यासाठी आरक्षित आहे त्या विभागाकडे हस्तांतरित केली जाते. - सतीश कुलकर्णीउपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापनसविस्तर माहितीही नाहीमहापालिकेचे किती भूखंड असे विनावापर पडून आहेत, याची सविस्तर माहितीही महापालिकेत नाही. मनुष्यबळ नाही, प्रकरण जुने आहे, कागदपत्रे पाहायला लागतील, नाव लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगितले जाते. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे अंदाज काढला, तर अब्जावधी रुपयांची मालमत्ता महापालिकने अशीच वाऱ्यावर सोडून दिली आहे. पालिका प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे. तो बऱ्याच वर्षांपासून असाच आहे. प्रत्येक अधिकारी प्रकरण जुने आहे, असेच सांगत असतो. ते मार्गी कधी लागणार, हे मात्र कोणीच सांगत नाही. हे सगळे भूखंड हातातून गेल्यानंतरच पालिकेला जाग येईल, असे दिसते.- आबा बागुलउपमहापौर