शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकारी - स्थानिक नागरिकांत वाद : सुमारे १०० जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST

पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी गुरूवारी (दि.२४) सकाळी महापालिकेचे अधिकारी सोबत पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. पण ...

पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी गुरूवारी (दि.२४) सकाळी महापालिकेचे अधिकारी सोबत पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. पण तेथून पुढे अतिक्रमण विभागाच्या कारवाईला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी कारवाईत अडथळा आणणाऱ्या १०० स्थानिक नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

आंबिल ओढ्यावर दांडेकर पूल येथे सुमारे साडेसहाशे ते सातशे घरे असून, यातील ओढ्याच्या पात्रालगत असलेल्या १३० घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. महापािलकेने मार्च महिन्यात यासंदर्भात जाहीर प्रकटन दिले होते. तर या भागातील रहिवाश्यांना राजेंद्रनगर येथील एका गृह प्रकल्पात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केले जाणार होते. यासंदर्भात दोन दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठकही पार पडली होती. बुधवारी रात्रीपासून महापालिका प्रशासनाने या भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची कारवाई सुरू केली. त्यावेळी ५२ कुटुंबांनी त्याला प्रतिसाद देत येथील घरातील सामान तातडीने हलिवले.

-----------------------------------

आम्हाला महापालिकेची नव्हे बिल्डरची नोटीस

आंबिल ओढ्यातील गुरुवारची कारवाई ही बिल्डरच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आम्हाला या कारवाईबाबत किंवा स्थलांतर करण्याबाबत महापालिकेची नव्हे, तर संबंधित बिल्डरची नोटीस आम्हाला मिळाली आहे. असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. ही जागा महापालिकेची आहे, मग आम्हाला बिल्डरची नोटिस कशी काय ? असा प्रश्नही यावेळी नागरिक उपस्थित करीत होते.

आम्ही १९७२ पासून येथे राहत असून, वयोवृद्ध आई व तीन भावांसह आमचे १५ जणांचे कुटुंब आहे. बिल्डरच्या नोटिसीनंतर लगेच कारवाई झाली आहे. परंतु, या कारवाई पूर्वी प्रथम आम्हाला पुनर्वसन करण्याबाबतची लेखी हमी स्टँपपेपरवर मिळायला हवी होती, अशा मागण्या नागरिकांनी लावून धरल्या होत्या.

आजच्या कारवाईत भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढले गेले असून, पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेल्याचा आरोपही यावेळी काहींनी केला. तर राजकीय नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होऊच शकत नाही, असे सांगून बाधित नागरिकांनी राजकारण्यांवरही निशाणा साधला. तर महापालिका आता कोणत्याही विरोधाला जुमानत नाही हे लक्षात आल्यावर काहींनी जमेल तसे घरातल्या महत्वाच्या वस्तू हलविण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान घरातील वस्तू बाहेर काढताना अनेकांच्या डोळ्यात अश्रूही वाहत होते. तसेच ट्रकमध्ये कामगारांकडून वस्तू नेताना आपल्या किमती वस्तू हरविणार नाही ना ? याचीही धास्ती अनेकांना लागली होती.

----------