शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

महापालिका अधिकारी - स्थानिक नागरिकांत वाद : सुमारे १०० जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST

पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी गुरूवारी (दि.२४) सकाळी महापालिकेचे अधिकारी सोबत पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. पण ...

पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी गुरूवारी (दि.२४) सकाळी महापालिकेचे अधिकारी सोबत पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. पण तेथून पुढे अतिक्रमण विभागाच्या कारवाईला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी कारवाईत अडथळा आणणाऱ्या १०० स्थानिक नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

आंबिल ओढ्यावर दांडेकर पूल येथे सुमारे साडेसहाशे ते सातशे घरे असून, यातील ओढ्याच्या पात्रालगत असलेल्या १३० घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. महापािलकेने मार्च महिन्यात यासंदर्भात जाहीर प्रकटन दिले होते. तर या भागातील रहिवाश्यांना राजेंद्रनगर येथील एका गृह प्रकल्पात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केले जाणार होते. यासंदर्भात दोन दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठकही पार पडली होती. बुधवारी रात्रीपासून महापालिका प्रशासनाने या भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची कारवाई सुरू केली. त्यावेळी ५२ कुटुंबांनी त्याला प्रतिसाद देत येथील घरातील सामान तातडीने हलिवले.

-----------------------------------

आम्हाला महापालिकेची नव्हे बिल्डरची नोटीस

आंबिल ओढ्यातील गुरुवारची कारवाई ही बिल्डरच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आम्हाला या कारवाईबाबत किंवा स्थलांतर करण्याबाबत महापालिकेची नव्हे, तर संबंधित बिल्डरची नोटीस आम्हाला मिळाली आहे. असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. ही जागा महापालिकेची आहे, मग आम्हाला बिल्डरची नोटिस कशी काय ? असा प्रश्नही यावेळी नागरिक उपस्थित करीत होते.

आम्ही १९७२ पासून येथे राहत असून, वयोवृद्ध आई व तीन भावांसह आमचे १५ जणांचे कुटुंब आहे. बिल्डरच्या नोटिसीनंतर लगेच कारवाई झाली आहे. परंतु, या कारवाई पूर्वी प्रथम आम्हाला पुनर्वसन करण्याबाबतची लेखी हमी स्टँपपेपरवर मिळायला हवी होती, अशा मागण्या नागरिकांनी लावून धरल्या होत्या.

आजच्या कारवाईत भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढले गेले असून, पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेल्याचा आरोपही यावेळी काहींनी केला. तर राजकीय नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होऊच शकत नाही, असे सांगून बाधित नागरिकांनी राजकारण्यांवरही निशाणा साधला. तर महापालिका आता कोणत्याही विरोधाला जुमानत नाही हे लक्षात आल्यावर काहींनी जमेल तसे घरातल्या महत्वाच्या वस्तू हलविण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान घरातील वस्तू बाहेर काढताना अनेकांच्या डोळ्यात अश्रूही वाहत होते. तसेच ट्रकमध्ये कामगारांकडून वस्तू नेताना आपल्या किमती वस्तू हरविणार नाही ना ? याचीही धास्ती अनेकांना लागली होती.

----------