शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकारी - स्थानिक नागरिकांत वाद : सुमारे १०० जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST

पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी गुरूवारी (दि.२४) सकाळी महापालिकेचे अधिकारी सोबत पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. पण ...

पुणे : आंबिल ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी गुरूवारी (दि.२४) सकाळी महापालिकेचे अधिकारी सोबत पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहचले. पण तेथून पुढे अतिक्रमण विभागाच्या कारवाईला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी कारवाईत अडथळा आणणाऱ्या १०० स्थानिक नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

आंबिल ओढ्यावर दांडेकर पूल येथे सुमारे साडेसहाशे ते सातशे घरे असून, यातील ओढ्याच्या पात्रालगत असलेल्या १३० घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. महापािलकेने मार्च महिन्यात यासंदर्भात जाहीर प्रकटन दिले होते. तर या भागातील रहिवाश्यांना राजेंद्रनगर येथील एका गृह प्रकल्पात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केले जाणार होते. यासंदर्भात दोन दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठकही पार पडली होती. बुधवारी रात्रीपासून महापालिका प्रशासनाने या भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची कारवाई सुरू केली. त्यावेळी ५२ कुटुंबांनी त्याला प्रतिसाद देत येथील घरातील सामान तातडीने हलिवले.

-----------------------------------

आम्हाला महापालिकेची नव्हे बिल्डरची नोटीस

आंबिल ओढ्यातील गुरुवारची कारवाई ही बिल्डरच्या फायद्यासाठी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आम्हाला या कारवाईबाबत किंवा स्थलांतर करण्याबाबत महापालिकेची नव्हे, तर संबंधित बिल्डरची नोटीस आम्हाला मिळाली आहे. असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. ही जागा महापालिकेची आहे, मग आम्हाला बिल्डरची नोटिस कशी काय ? असा प्रश्नही यावेळी नागरिक उपस्थित करीत होते.

आम्ही १९७२ पासून येथे राहत असून, वयोवृद्ध आई व तीन भावांसह आमचे १५ जणांचे कुटुंब आहे. बिल्डरच्या नोटिसीनंतर लगेच कारवाई झाली आहे. परंतु, या कारवाई पूर्वी प्रथम आम्हाला पुनर्वसन करण्याबाबतची लेखी हमी स्टँपपेपरवर मिळायला हवी होती, अशा मागण्या नागरिकांनी लावून धरल्या होत्या.

आजच्या कारवाईत भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढले गेले असून, पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेल्याचा आरोपही यावेळी काहींनी केला. तर राजकीय नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होऊच शकत नाही, असे सांगून बाधित नागरिकांनी राजकारण्यांवरही निशाणा साधला. तर महापालिका आता कोणत्याही विरोधाला जुमानत नाही हे लक्षात आल्यावर काहींनी जमेल तसे घरातल्या महत्वाच्या वस्तू हलविण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान घरातील वस्तू बाहेर काढताना अनेकांच्या डोळ्यात अश्रूही वाहत होते. तसेच ट्रकमध्ये कामगारांकडून वस्तू नेताना आपल्या किमती वस्तू हरविणार नाही ना ? याचीही धास्ती अनेकांना लागली होती.

----------