शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

वीज बंद केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देऊळगावराजे : देऊळगावराजे येथे ऐन संकटात महावितरणने मागील दोन दिवस पूर्व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

देऊळगावराजे : देऊळगावराजे येथे ऐन संकटात महावितरणने मागील दोन दिवस पूर्व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित केली होती. याविरोधात शुक्रवारी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर व शिरापूरचे माजी सरपंच केशव काळे, हरीभाऊ ठोंबरे, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली देऊळगाव राजे येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता महावितरण अधिकाऱ्यांनी वीज पूर्ववत करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले. गेल्या तीन दिवसांपासून महावितरणच्या शेतकऱ्यांची वीजबिल भरलेली नाही हे कारण दाखवून वीज बंद केली होती. पण गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोनामुळे त्रस्त आहेत. त्यात शेतीमालाला योग्य भाव नाही. अशातच आता मार्च महिन्यात शक्य असेल तेवढी बाकी शेतकऱ्यांनी वीजबिले भरली आहेत. पण शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिल भरण्याची राहिली नाही. त्यात वीजबिल भरण्यासाठी महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मागे लागली आहे. त्यामुळे महावितरणच्या या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

या वेळी केशव काळे, अभिमन्यू गिरमकर, हरिभाऊ ठोंबरे, राजेंद्र बुऱ्हाडे, बाळकृष्ण पाचपुते, शिवाजी काळे, नंदकिशोर पाचपुते, सचिन कदम, शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम आदी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या सर्वांच्या मागण्यांचा विचार करून लाईट पूर्ववत करण्याचे आदेश दिले.

चौकट-

शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाणार आहे. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे सादर केल्या जातील. पुढील काळात अशी एकाकी वीज बंद केली जाणार नाही. जर वीज बंद करण्याची वेळ आली तर संबधित गावच्या शेतकरी वर्गाला आणि ग्रामस्थांना पूर्वकल्पना देऊन ग्रामसभेत शेतकऱ्यांना तशा सूचना केल्या जातील.

- जीवन ठोंबरे, सहायक अभियंता दौंड ग्रामीण महावितरण

चौकट :-

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणुकीच्या वेळी भर सभेत म्हणाले होते की सत्ता आल्यावर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यात येईल. परंतु तसे झाले नाही. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. यामुळे राज्य शासनाने वीजबिल माफ करावे आणि पुरवठा खंडित करू नये.

-केशव काळे, भाजप नेते

चौकट :

आज सर्व शेतकऱ्यांनी मिळून केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. पुढील काळात शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहणार आहोत.

- अभिमन्यू गिरमकर, अध्यक्ष, किसान मोर्चा दौंड तालुका