शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

मुख्यमंत्री महोदय...कोरोना फक्त रात्रीच फिरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रात्री अकरा ते पहाटे सहा दरम्यान संचारबंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रात्री अकरा ते पहाटे सहा दरम्यान संचारबंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले आहेत. कोरोना टाळेबंदीनंतर आता कुठे सुरळीत होत असताना पुन्हा सरकारने आमच्या व्यवसायावर संक्रात आणली अशीच सर्वांची भावना असून कोरोना विषाणू काय रात्रीचाच फिरतो का असा त्रस्त सवाल हॉटेल व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुण्यात हॉटेल असोसिएशनचे ३ हजार सदस्य आहेत. त्याशिवाय लहानमोठे असे १० हजार खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. सरकारच्या निर्णयाने या सर्वांमध्ये तीव्र नाराजी आहे. संघटनांच्यावतीने ही नाराजी सरकारपर्यंत पोहचवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ऐन नाताळाच्या काळातच ही बंदी आल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत. सलग ६ महिन्यांच्या बंदीनंतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर मागील महिनाभरात व्यवसाय सुरळीत होत होता. नाताळात चांगला व्यवसाय होईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र आता सरकारच्या निर्णयाने त्यावरही पाणी पडले असल्याचे हॉटेलचालक बोलून दाखवत आहेत.

सध्या त्यांना रात्री साडेअकरा पर्यंत परवानगी असली तरी साडेदहा वाजल्यापासूनच त्यांना आवराआवर करावी लागत होती. हीच वेळ रात्री १२ पर्य़ंत वाढवण्याची हॉटेल व्यावसायिकांची मागणी होती. ते तर झालेच नाही उलट ११ नंतर संचारबंदी आणली गेली. त्यामुळे आता दहा वाजल्यापासूनच आवरते घ्यावे लागणार आहे.

चौकट

“सरकारचा निर्णय अनाकलनीय आहे. त्या विरोधात आम्ही दाद मागत आहोत. रात्री १२ पर्यंतच्या परवानगीची आमची मागणी सोडून सरकारने हा असा निर्णय घेतल्याने पुन्हा आमच्यावर आर्थिक संकट येणार आहे.”

-गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे हॉटेल असोसिएशन

चौकट

“सरकारचे धोरणच लक्षात यायला तयार नाही. कोरोनाचे संकट मोठेच आहे, मात्र त्यावर अशी बंदी वगैरे घालून मार्ग निघणार नाही.”

-किशोर सरपोतदार, अध्यक्ष, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन

चौकट

“काहीतरी कारण असल्यामुळेच सरकारने असा निर्णय घेतला असावा असे आम्ही समजतो. यावर चर्चा करून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

-विक्रमराज शेट्टी, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया हॉटेल अँन्ड रेस्टॉरंट असोसिएशन.