शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

एमपीएससीने २०२१ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST

पुणे : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठविले नसल्याने अद्यापपर्यंत २०२१ या सालातील परीक्षांचे वेळापत्रक ...

पुणे : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) रिक्त पदांचे मागणीपत्रच पाठविले नसल्याने अद्यापपर्यंत २०२१ या सालातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले नाही. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यावर्षी परीक्षा होणार आहेत की नाहीत या प्रश्नावरुन विद्यार्थी चिंतेत पडले आहेत.

सर्वसाधारणपणे एमपीएससीने २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक डिसेंबर २०२० मध्येच जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र कोरोना, आरक्षण आदी कारणांमुळे घोषित केले नसावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने राज्य पूर्व परीक्षा तब्बल पाच वेळा पुढे ढकलून इतिहास रचला आहेच. मात्र, यंदा परीक्षा होणार आहेत की नाहीत हे या स्पष्ट केले नाही. २१ मार्चला परीक्षा घेऊन कोरोनासारख्या संकटात देखील चांगल्या प्रकारे परीक्षा घेता येते. हे एमपीएससीने दाखून दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता फार काळ विचार न करता संबंधित विभागाच्या रिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवावे. जेणेकरून वेळापत्रक जाहीर करून अधिकारी होण्याची आस लावून बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी नियोजित अभ्यास करता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

काय आहेत अडचणी

- वेळापत्रक जाहीर न केल्याने पुढील नियोजन कसे करणार

- राज्यसेवा पूर्व परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नसल्याने ११ एप्रिलला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ वर लक्ष केंद्रित

- संयुक्त गट- ‘क’ सेवा परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नाहीच

- अपेक्षित गुण मिळाले नाहीत तर पुढे काय करायाचे, हा मोठा प्रश्न

काय आहेत समस्या

- कोरोना आणि आरक्षणामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया रखडली.

- वय वाढल्याने संधी हुकली

- वय वाढवले जाणार, केवळ घोषणा झाली मात्र निर्णय नाही.

- मानसिक ताण वाढला असून भविष्य धोक्यात आल्याची भावना.

- अनिश्चित भरती प्रक्रियेमुळे आयुष्याचे गणित बिघडले.

कोट

एमपीएससीनेकडे रिक्त जागांचे मागणीपात्र पाठवावे, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. तसे लेखी पत्रही दिले आहे. किमान वेळापत्रक जाहीर झाले तर विद्यार्थ्यांना परीक्षा होणार आहेत याची खात्री मिळेल. पुढील नियोजन करणे सोपे जाईल.

- महेश बडे, एमपीएससी स्टुडंटस राईट्स

मागील सरकारच्या काळापासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. या यापूर्वी एमपीएससीने तंतोतंत वेळापत्रकाचे पालन केले होते. त्यामुळे परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली. आरक्षण आणि इतर कारणांमुळे परीक्षा प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. यावर गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.

- सतीश खेमणार, परीक्षार्थी

एमपीएससीने २१ मार्च घेतलेली परीक्षा ही २०१९ च्या मागणी पत्रकानुसार घेतलेली आहे. २०२० च्या मागणी पत्रकानुसार होणाऱ्या परीक्षांचे काय, हा मोठा प्रश्न आहे. परीक्षा पद्धतींमुळे खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. वय वाढत असून आईवडिलांना काळजी पडली आहे. वेळापत्रक जाहीर केले तर नियोजन तरी करता येईल.

- मनीषा सानप, परीक्षार्थी