शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

खासदार केले... आमदार केले.. तरी विकास होईना

By admin | Updated: June 28, 2017 03:53 IST

शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकासकामांकडे दुर्लक्ष होते. या वस्त्यांमध्ये लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात विकास होत नाही.

बारामती : शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकासकामांकडे दुर्लक्ष होते. या वस्त्यांमध्ये लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात विकास होत नाही. त्यामुळे अतिक्रमणे होतात. मागील १५ ते २० वर्षांपासून विकासकामांपासून दुर्लक्षित असलेल्या कसबा भागातील अण्णा भाऊ साठेनगरमधील रहिवाशांनी फ्लेक्स बोर्ड लावून थेट ‘विठ्ठला’ला साकडे घातले आहे. ‘खासदारकीला केले... आमदारकीला केले... नगराध्यक्ष, नगरसेवकांनादेखील मतदान केले; तरीपण विठ्ठला... पांडुरंगा... २० वर्षांपासून आमचा विकास झालाच नाही,’ असा बोर्ड लावल्याने येथील नागरी समस्यांवर पुन्हा प्रकाशझोत टाकला आहे. रस्त्याच्या कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्षनगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत झोपडपट्टी पुनर्वसन होणार आहे.; त्यामुळे चांगली घरे मिळतील, असे आश्वासन दिले जाते. पुढे मात्र काहीच होत नाही. साधारणत: चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या अण्णा भाऊ साठेनगर परिसरात सर्वच सुविधांची वानवा आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. पूर्वीच्या गृहनिर्माण सोसायटीच्या जागांवर अतिक्रमण वाढले. वस्तीतून जाणारा रस्ता पूर्वी २७ फुटांचा होता. आता १० फूटच राहिला आहे. निवडणुकीपूर्वी अंतर्गत गल्लीबोळांचे क्राँक्रिटीकरण करण्याचे काम ठेकेदार डी. एस. पवार यांना दिले होते. त्यांनी अर्धवट काम सोडून दिले आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामदेखील त्यांनाच दिले आहे. कामाची वर्कआॅर्डर दिली; मात्र अगोदरच्या कामाचे बिल नगरपालिकेने दिले नाही म्हणून त्यांनी कामच केले नाही. त्यामुळे साठेनगरसारख्या भागातील नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला, तरी काम केले नसल्याची तक्रार आहे.विकासकामांसाठी ठेकेदार पुढे येत नाहीत.या परिसरात असणाऱ्या समाज मंदिराच्या परिसराला अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. समाज मंदिराचा भाग मोकळा होता तेव्हापासून आतापर्यंत ७ वेळा समाज मंदिर बांधण्यासाठी टेंडर निविदा काढल्या; परंतु ठेकेदारच आले नाहीत. हीच स्थिती या भागातील स्वच्छतागृहाची आहे. सतत स्वच्छतागृह तुंबते. त्यामुळे महिलांसह सर्वच नागरिकांची गैरसोय होते. पाण्याची सोय नाही. दरवाजे तुटले आहेत. कमालीच्या घाणीचे साम्राज्य स्वच्छतागृहांमध्ये आहे. स्वच्छतागृहासाठीदेखील ठेकेदार पुढे येत नाही. तीन वेळा यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली आहे. स्वच्छतागृहाला कधी मुहूर्त लागणार, याची कोणालाच खात्री नाही. पावसाळ्यापूर्वी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर झाले. कामाचे आदेश ठेकेदार पवार यांना दिले. त्यांनी मात्र कामच सुरू केले नाही. ‘आमचा प्रभाग स्वच्छ प्रभाग’ अशाी आरोळी सोशल मीडियावर ठोकणाऱ्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनीदेखील या कामाकडे आतापर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, अशी येथील तरुण कार्यकर्त्यांची भावना आहे. दारू, मटका, जुगाराच्या अड्ड्यांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडलेअंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, गल्लीबोळांत सांडपाणी जाण्यासाठी सुविधा नसल्याने झालेली दलदल. दलदलीमुळे कमालीचा उग्र वास येतो. त्यातच बेकायदेशीर दारू, मटक्यासह अवैध धंदे या परिसरात फोफावले आहेत. जुगाराचे अड्डेदेखील वाढलेले आहेत. दारूच्या धंद्यांमुळे महिलांना जास्त त्रास होतो. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे. यावरदेखील प्रतिबंध आणला जावा, अशी मागणी होत आहे. काही सुशिक्षित तरुणांनी याबाबत अनेकदा लेखी निवेदने दिली. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.