शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

खतांची दरवाढ न थांबवल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:09 IST

ऐन खरीप हंगाम सुरू होत असताना रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर व बी-बियाणे ...

ऐन खरीप हंगाम सुरू होत असताना रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर व बी-बियाणे पेरणीची वेळ असताना काही खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे दर प्रतिबॅग १०० ते ९०० रुपयांनी वाढवले आहेत. एकीकडे कोरोनामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना त्यातच खतांची झालेली भरमसाठ दरवाढ म्हणजे बळीराजासाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल. खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीमध्ये अचानक दरवाढ केली आहे.

कोरोनासारख्या महामारीचा सामना करत शेतकरी रान दुरुस्त करून पेरणीची तयारी करत असताना खतांच्या किमतीमध्ये झालेली वाढ शेतकऱ्याला परवडणारी नाही.

आगोदरच कोरोना व अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जे शेतकरी फळ आणि भाजीपाल्याची लागवड करतात कोरोनामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. वातावरणातील बदल व अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे सद्य परिस्थितीमध्ये उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असून पिकवलेला माल कमी वेळेत बाजारात आणून कसा विकायचा असा प्रश्न आहे. अशा संकटात शेतकरी असताना खत कंपन्यांनी खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत.

जगाचा पोशिंदा बळीराजाला मदतीचा हात पुढे करून केंद्र सरकारने खतांची दरवाढ थांबवण्यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी बंधूच्या वतीने व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ लि. मंचरचे अध्यक्ष भगवानराव वाघ यांनी दिला आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष रामनाथ बांगर, संचालक मधुकर बो-हाडे,रमेश खिलारी, अनिल वाळूंज, नाथा घेवडे पा., संजय गोरे आदी उपस्थित होते.