शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

खतांची दरवाढ न थांबवल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:09 IST

ऐन खरीप हंगाम सुरू होत असताना रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर व बी-बियाणे ...

ऐन खरीप हंगाम सुरू होत असताना रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर व बी-बियाणे पेरणीची वेळ असताना काही खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे दर प्रतिबॅग १०० ते ९०० रुपयांनी वाढवले आहेत. एकीकडे कोरोनामुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असताना त्यातच खतांची झालेली भरमसाठ दरवाढ म्हणजे बळीराजासाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल. खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमतीमध्ये अचानक दरवाढ केली आहे.

कोरोनासारख्या महामारीचा सामना करत शेतकरी रान दुरुस्त करून पेरणीची तयारी करत असताना खतांच्या किमतीमध्ये झालेली वाढ शेतकऱ्याला परवडणारी नाही.

आगोदरच कोरोना व अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जे शेतकरी फळ आणि भाजीपाल्याची लागवड करतात कोरोनामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. वातावरणातील बदल व अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे सद्य परिस्थितीमध्ये उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असून पिकवलेला माल कमी वेळेत बाजारात आणून कसा विकायचा असा प्रश्न आहे. अशा संकटात शेतकरी असताना खत कंपन्यांनी खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत.

जगाचा पोशिंदा बळीराजाला मदतीचा हात पुढे करून केंद्र सरकारने खतांची दरवाढ थांबवण्यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी बंधूच्या वतीने व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ लि. मंचरचे अध्यक्ष भगवानराव वाघ यांनी दिला आहे. यावेळी संघाचे उपाध्यक्ष रामनाथ बांगर, संचालक मधुकर बो-हाडे,रमेश खिलारी, अनिल वाळूंज, नाथा घेवडे पा., संजय गोरे आदी उपस्थित होते.