शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

भीमा खोऱ्यातील १८ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रातून मान्सून परतून सुमारे दीड महिन्या उलटून गेला तरीही भीमा खोऱ्यातील २५ पैकी १८ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्रातून मान्सून परतून सुमारे दीड महिन्या उलटून गेला तरीही भीमा खोऱ्यातील २५ पैकी १८ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातही नाझरे व उजनी धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असून खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठा अधिक आहे.

पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. काही भागात ओला दुष्काळ जाहिर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. मराठवाडा व विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांची हाती आलेली पिके वाहुन गेली. यंदा भीमा व कृष्णा खो-यातील बहुतांश सर्व धरणे शंभर टक्के भरली. राज्यातून मान्सून २८ ऑक्टोबर रोजी परतला. त्यामुळे दीड महिन्यानंतरही बहुतांश धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.

भीमा खोऱ्यातील येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा, पवना कासरसाई, वसगाव, पानशेत, गुंजवणी, भाटघर, चिंल्हेवाडी या धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर पिंपळगाव जोगे धरणात ४७.४५ टक्के, माणिकडोह धरणात ४६.२८ ,वीर धरणात ८४.टक्के, वडिवळे ७५.१९, पवना ८९.२९ आणि खडकवासला धरणात ७५.९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

---

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा

खडकवासला १.६२ टीएमसी (८२.१३ टक्के)

पानशेत १०.४६ टीएमसी (९८.२३टक्के)

वरसगाव १२.२५ टीएमसी (९५.५१ टक्के )

टेमघर २.७० टीएमसी (७२.७९ टक्के)