शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर येथे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. वीज बिल थकल्यानंतर रोहीत्र बंद ...

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. वीज बिल थकल्यानंतर रोहीत्र बंद करून वीज बंद केली जाते. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सध्या पाऊस पडत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा संकटकाळात वीज वितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारत वीज पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. कोरोनामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. हतबल झाला आहे. अशावेळी वीज वितरण कंपनी करत असलेला हा प्रकार लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर, सुरेश बागडे, सतीश पोखरकर, वनाजी बांगर, प्रवीण पडवळ, बाजीराव महाराज बांगर यांची यावेळी भाषणे झाली. प्रभाकर बांगर म्हणाले राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ केले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही. शेतीमालाला अगोदर हमीभाव द्यावा, अशी मागणी करून बांगर म्हणाले डिझेल पेट्रोलचे भाव वाढले आहेत. खताच्या किमती वाढल्या आहेत. कोरोनामुळे देखील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषिपंपाची थकीत वीज बिले राज्य सरकारने माफ करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बांगर यांनी दिला. यावेळी कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी मागील थकबाकीच्या ऐवजी चालू महिन्याचे वीज बिल भरले तरी त्या शेतकऱ्याचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी काळुराम भागडे, सचिन पवार, नवनाथ आवटे, लहू पिंगळे, गणेश पोखरकर, धनेश पोखरकर, देवराम बांगर, हरिदास बांगर आदी उपस्थित होते.

फोटोखाली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्यात आला.