शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर येथे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. वीज बिल थकल्यानंतर रोहीत्र बंद ...

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. वीज बिल थकल्यानंतर रोहीत्र बंद करून वीज बंद केली जाते. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सध्या पाऊस पडत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा संकटकाळात वीज वितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारत वीज पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. कोरोनामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. हतबल झाला आहे. अशावेळी वीज वितरण कंपनी करत असलेला हा प्रकार लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर, सुरेश बागडे, सतीश पोखरकर, वनाजी बांगर, प्रवीण पडवळ, बाजीराव महाराज बांगर यांची यावेळी भाषणे झाली. प्रभाकर बांगर म्हणाले राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ केले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही. शेतीमालाला अगोदर हमीभाव द्यावा, अशी मागणी करून बांगर म्हणाले डिझेल पेट्रोलचे भाव वाढले आहेत. खताच्या किमती वाढल्या आहेत. कोरोनामुळे देखील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषिपंपाची थकीत वीज बिले राज्य सरकारने माफ करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बांगर यांनी दिला. यावेळी कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी मागील थकबाकीच्या ऐवजी चालू महिन्याचे वीज बिल भरले तरी त्या शेतकऱ्याचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी काळुराम भागडे, सचिन पवार, नवनाथ आवटे, लहू पिंगळे, गणेश पोखरकर, धनेश पोखरकर, देवराम बांगर, हरिदास बांगर आदी उपस्थित होते.

फोटोखाली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्यात आला.