शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर येथे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. वीज बिल थकल्यानंतर रोहीत्र बंद ...

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. वीज बिल थकल्यानंतर रोहीत्र बंद करून वीज बंद केली जाते. याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंचर येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सध्या पाऊस पडत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा संकटकाळात वीज वितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारत वीज पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. कोरोनामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. हतबल झाला आहे. अशावेळी वीज वितरण कंपनी करत असलेला हा प्रकार लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर, सुरेश बागडे, सतीश पोखरकर, वनाजी बांगर, प्रवीण पडवळ, बाजीराव महाराज बांगर यांची यावेळी भाषणे झाली. प्रभाकर बांगर म्हणाले राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज बिल माफ केले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही. शेतीमालाला अगोदर हमीभाव द्यावा, अशी मागणी करून बांगर म्हणाले डिझेल पेट्रोलचे भाव वाढले आहेत. खताच्या किमती वाढल्या आहेत. कोरोनामुळे देखील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषिपंपाची थकीत वीज बिले राज्य सरकारने माफ करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बांगर यांनी दिला. यावेळी कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी मागील थकबाकीच्या ऐवजी चालू महिन्याचे वीज बिल भरले तरी त्या शेतकऱ्याचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी काळुराम भागडे, सचिन पवार, नवनाथ आवटे, लहू पिंगळे, गणेश पोखरकर, धनेश पोखरकर, देवराम बांगर, हरिदास बांगर आदी उपस्थित होते.

फोटोखाली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्यात आला.