शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मुहूर्त संपला; आता लग्नं लावणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

दोनशे वऱ्हाडींची मर्यादा : सरकारचे वरातीमागून घोडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने ‘सेकंड अनलॉक’मध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीत ...

दोनशे वऱ्हाडींची मर्यादा : सरकारचे वरातीमागून घोडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाने ‘सेकंड अनलॉक’मध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची परवानगी दिली खरी; मात्र लग्नकार्याचा हंगाम संपल्यानंतर आता काय उपयोग? असा सवाल बँडचालकांनी उपस्थित केला आहे. ऑगस्टपासून काढीव मुहूर्त आहेत. शक्यतो वधू-वराकडची मंडळी अशा मुहूर्तावर लग्नकार्य मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करतात. मग बँड वाजवणार कुठं आणि कसा? याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.

गेल्या दीड वर्षापासून लग्नकार्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले. कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी झाल्यानंतर शासनाने पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली. मात्र, इतक्या कमी लोकांमध्ये लग्न करायचे म्हटल्यास कोणत्या नातेवाइकाला बोलावयाचे, अशा पेचात अनेक कुटुंब पडली आणि वधू-वराकडील कुटुंबांनी नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. सेकंड अनलॉकमध्ये शासनाने पुण्यातील कोरोना ‘पॉझिटिव्हिटी रेट’ कमी झाल्यानंतर मंगल कार्यालयांमध्ये शंभर आणि लॉंन्समध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्यास परवानगी दिली. यामुळे जोडप्यांसह कुटुंबांना दिलासा मिळाला असला तरी लग्नाचा हंगाम काहीसा ओसरला आहे.

काही जोडप्यांकडून काढीव मुहूर्तावर लग्नकार्य केले जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण फार कमी आहे. लग्नाचा हंगाम आता थेट नोव्हेंबरनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे शासनाने दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्यास परवानगी दिली असली तरी मंगल कार्य किंवा लॉन्स लग्नकार्यासाठी हाऊसफुल्ल होतील याची शक्यता कमी असल्याचे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थांपकांकडून सांगण्यात आले आहे.

चौकट

आता काय उपयोग?

“लग्नसराईचा हंगाम संपला आहे. हंगाम संपल्यानंतर परवानगी देऊन काय उपयोग? आम्हाला तर सगळं मुद्दाम चालल्यासारखं वाटत आहे. गेली दीड वर्षे आमच्या हाताला काम नाही. लग्नकार्यात जर शंभर-दोनशेंनाच परवानगी असेल तर बॅण्डवाल्यांना बोलवायचे का? असा विचार वधू-वराकडची मंडळी करतात. आता जेवढी लग्न झाली त्यातही कुणी बॅण्ड बोलावला नाही. काढीव महूर्त काढून लग्नं होतात; पण त्यासाठी इतक्या लोकांना कुणी बोलावत नाही.”

-झहीर, दरबार बॅण्ड

चौकट

सध्या नोंदणी नाहीच

“लग्नकार्यासाठी सभागृहाच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार उपस्थितीचा नियम आहे. आम्ही दीडशे लोक सहभागी करून घेऊ शकतो; पण शंभर लोकांनाच परवानगी देणार आहोत. आता तरी लग्नकार्याचा हंगाम नाही. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा तो सुरू होईल. सध्यातरी लग्नासाठी नोंदणी नाही.”

-प्रसाद दातार, मंगल कार्यालय चालक

चौकट

काढीव मुहूर्तावर पण...

“कोरोनामुळे जूनमधली बहुतांश लग्न पुढे ढकलली आणि ती लग्न काढीव मुहूर्तावर चातुर्मासात झाली. काढीव मुहूर्तावर लग्नकार्य होतात. परंतु थोडं पवित्र आणि अपवित्रचा मुद्दा विचारात घेतला जातो.”

-मोहन दाते, पंचागकार

चौकट

काढीव मुहूर्तांच्या तारखा

ऑगस्ट - २७, ३०, ३१

सप्टेंबर - १, ८, १६, १७,

ऑक्टोबर -८, १०, ११, १३, १४, १५, १८, १९, २०, २१, २४, ३०

नोव्हेंबर - ८, ९, १०, १२, १६