शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त संपला; आता लग्नं लावणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

दोनशे वऱ्हाडींची मर्यादा : सरकारचे वरातीमागून घोडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने ‘सेकंड अनलॉक’मध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीत ...

दोनशे वऱ्हाडींची मर्यादा : सरकारचे वरातीमागून घोडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासनाने ‘सेकंड अनलॉक’मध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याची परवानगी दिली खरी; मात्र लग्नकार्याचा हंगाम संपल्यानंतर आता काय उपयोग? असा सवाल बँडचालकांनी उपस्थित केला आहे. ऑगस्टपासून काढीव मुहूर्त आहेत. शक्यतो वधू-वराकडची मंडळी अशा मुहूर्तावर लग्नकार्य मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करतात. मग बँड वाजवणार कुठं आणि कसा? याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.

गेल्या दीड वर्षापासून लग्नकार्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले. कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी झाल्यानंतर शासनाने पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली. मात्र, इतक्या कमी लोकांमध्ये लग्न करायचे म्हटल्यास कोणत्या नातेवाइकाला बोलावयाचे, अशा पेचात अनेक कुटुंब पडली आणि वधू-वराकडील कुटुंबांनी नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. सेकंड अनलॉकमध्ये शासनाने पुण्यातील कोरोना ‘पॉझिटिव्हिटी रेट’ कमी झाल्यानंतर मंगल कार्यालयांमध्ये शंभर आणि लॉंन्समध्ये दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्यास परवानगी दिली. यामुळे जोडप्यांसह कुटुंबांना दिलासा मिळाला असला तरी लग्नाचा हंगाम काहीसा ओसरला आहे.

काही जोडप्यांकडून काढीव मुहूर्तावर लग्नकार्य केले जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण फार कमी आहे. लग्नाचा हंगाम आता थेट नोव्हेंबरनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे शासनाने दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्यास परवानगी दिली असली तरी मंगल कार्य किंवा लॉन्स लग्नकार्यासाठी हाऊसफुल्ल होतील याची शक्यता कमी असल्याचे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थांपकांकडून सांगण्यात आले आहे.

चौकट

आता काय उपयोग?

“लग्नसराईचा हंगाम संपला आहे. हंगाम संपल्यानंतर परवानगी देऊन काय उपयोग? आम्हाला तर सगळं मुद्दाम चालल्यासारखं वाटत आहे. गेली दीड वर्षे आमच्या हाताला काम नाही. लग्नकार्यात जर शंभर-दोनशेंनाच परवानगी असेल तर बॅण्डवाल्यांना बोलवायचे का? असा विचार वधू-वराकडची मंडळी करतात. आता जेवढी लग्न झाली त्यातही कुणी बॅण्ड बोलावला नाही. काढीव महूर्त काढून लग्नं होतात; पण त्यासाठी इतक्या लोकांना कुणी बोलावत नाही.”

-झहीर, दरबार बॅण्ड

चौकट

सध्या नोंदणी नाहीच

“लग्नकार्यासाठी सभागृहाच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार उपस्थितीचा नियम आहे. आम्ही दीडशे लोक सहभागी करून घेऊ शकतो; पण शंभर लोकांनाच परवानगी देणार आहोत. आता तरी लग्नकार्याचा हंगाम नाही. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा तो सुरू होईल. सध्यातरी लग्नासाठी नोंदणी नाही.”

-प्रसाद दातार, मंगल कार्यालय चालक

चौकट

काढीव मुहूर्तावर पण...

“कोरोनामुळे जूनमधली बहुतांश लग्न पुढे ढकलली आणि ती लग्न काढीव मुहूर्तावर चातुर्मासात झाली. काढीव मुहूर्तावर लग्नकार्य होतात. परंतु थोडं पवित्र आणि अपवित्रचा मुद्दा विचारात घेतला जातो.”

-मोहन दाते, पंचागकार

चौकट

काढीव मुहूर्तांच्या तारखा

ऑगस्ट - २७, ३०, ३१

सप्टेंबर - १, ८, १६, १७,

ऑक्टोबर -८, १०, ११, १३, १४, १५, १८, १९, २०, २१, २४, ३०

नोव्हेंबर - ८, ९, १०, १२, १६