शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

मोहन भागवत हे हिटलर

By admin | Updated: September 22, 2016 02:02 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक फॅसिस्ट संघटना आहे.

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक फॅसिस्ट संघटना आहे. केंद्र सरकार हे नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे नसून हे सरकार संघच चालवत आहे. तर, सरसंघचालक मोहन भागवत हे देशाचे हिटलर आहेत, अशी टीका ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली.विविध परिवर्तनवादी संघटनांतर्फे बुधवारी आयोजित ‘लोकशाहीसाठी संघर्ष यात्रे’च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्र सेवा दल येथे झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भालचंद्र कांगो, राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम, लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) कॉ. भीमराव बनसोड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव, लोकायतचे नीरज जैन आदी उपस्थित होते.वैद्य म्हणाले, ‘‘संघ ही हिंसेवर विश्वास ठेवणारी संघटना असून त्यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही. निवडणुकीतील पराभव टाळण्यासाठी ते भविष्यात लष्कराचाही वापर करू शकतात. त्यांच्या विरोधात परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.’’ अलका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.>सध्या देशात अर्थनीतीचा प्रभाव असल्याने लोकशाहीचा पाया कमकुवत होऊ लागला आहे. लोकशाहीला वाचविण्यासाठी तरुण पुढे येऊ लागल्याचे सकारात्मक चित्र आहे. यातून नवा इतिहास घडणार आहे. महाराष्ट्रामध्ये जगाला प्रगतिशील विचार देण्याची शक्ती आहे.- डॉ. गणेश देवी