शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

‘पीएसआय’ पदासाठी मैदानी चाचणी पात्रता हटवण्याच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

अमोल अवचिते पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गट ब या पदासाठी मैदानी चाचणीचे ...

अमोल अवचिते

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गट ब या पदासाठी मैदानी चाचणीचे गुण यापुढे केवळ अहर्ताकारी (पात्र) करण्यात आले आहेत. एकूण शंभर गुणांपैकी ६० गुण मिळविलेल्या उमेदवारांना मुलाखत देता येणार आहे. अंतिम निवड करताना मैदानी चाचणीचे गुण विचारात घेतले जाणार नसून केवळ मुख्यपरीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारेच अंतिम निवड करण्यात येणार आहे, अशी घोषणा एमपीएसीने केली आहे. या निर्णयावर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

एकतर्फी निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांचे नुकसान होणार आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांना अधिकारी होऊ द्यायचे नाही, हे मुख्य कारस्थान आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी संतापजनक प्रतिक्रिया काही उमेदवारांनी व्यक्त केली. तर या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना नव्याने संधी मिळू शकते. सर्व समान पातळीवर आले असल्याने केवळ बैद्धिक अथवा मैदानी चाचणीत प्रवीण असलेल्यांचीच निवड न होता, समान संधी मिळू शकेल, असे काहींचे म्हणणे आहे.

कोट---

एमपीएससीने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयातून मैदानी चाचणीला दुर्लक्षित करण्यात आलेले नाही. शारीरिक आणि बैद्धिकदृष्ट्या सक्षम उमेदवार पोलीस खात्याला मिळतील. गुन्ह्यांची उकल करताना बैद्धिक क्षमतेचा कस लागतो. या निर्णयाने कोणत्याही उमेदवारांचे नुकसान होणार नसून समान संधी मिळेल.

- मीरा बोरवणकर, माजी पोलीस आयुक्त, पुणे शहर.

या निर्णयाचा फायदा फक्त गुणवंतांना होईल. तर शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांना तोटा होणार आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना प्रशिक्षण देऊ शकतो. असे एमपीएसीचे म्हणणे असेल, तर प्रशिक्षण केंद्रामध्ये कायद्याचे प्रशिक्षण देऊन परीक्षा घेतली जाते. त्यामुळे कायद्याचा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेमधून वगळून उमेदवारांना पात्र करावे आणि अंतिम निवड यादीत गुण ग्राह्य धरू नयेत.

- प्रताप शिंदे, / संदीप जाधव परीक्षार्थी.

निर्णय चुकीचा आहे. पीएसआय हे पद प्रत्यक्ष फिल्डचे आहे. १२ तास ड्यूटी बजावताना दमछाक होते. पूर्व आणि मुख्य परीक्षेतून बैद्धिक चाचणी होऊन शारीरिक चाचणीतून योग्य उमेदवार निवडलॆ जात होते. अन्यायकारक आणि नुकसान करणारा हा निर्णय आहे.

- प्रा. कुमठाळे एम. एम. , शारीरिक मैदानी चाचणी, प्रशिक्षक.

चौकट----

समान संधी मिळणार

मैदानी चाचणी ज्या टप्प्यांवर घेतली जाते, त्यापैकी एका टप्प्यात उमेदवार अपात्र ठरला तर गुण कमी मिळाल्याने तो केवळ एका टप्प्यामुळे अंतिम निवडीतून बाहेर पडत होता. आता त्याला संधी मिळणार आहे. मैदानी चाचणी तर होणारच आहे. सर्वांना समान संधी असलेला फायदेशीर निर्णय आहे. असे एका माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.