शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांशी संवाद मंत्र्यांनी केला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST

पुणे : परीक्षा वेळेत होत नसल्याच्या तणावातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्र ढवळून निघाले आहे. ...

पुणे : परीक्षा वेळेत होत नसल्याच्या तणावातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्र ढवळून निघाले आहे. निवड होऊन नियुक्ती न मिळल्याने उमेदवारांना रस्त्यावर उतरून हक्काच्या नोकरीवर नियुक्ती देण्यासाठी आंदोलन करावे लागले. याची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री रविवारी (दि. ११) पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार होते. मात्र काही कारणांमुळे संवादाचा कार्यक्रम रद्द केल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकाला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सुद्धा वेळ नाही का असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. सरकार या बाबत जाणुनबुजून चालढकल करीत नाही ना अशी चर्चा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे.

राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही स्वरूपाची भरती केली नाही. ज्या पदांच्या भरतीसाठी परीक्षा झाली त्यातही गोंधळ झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे निकाल, नियुक्त्या तसेच वेळापत्रक रखडलेले आहे. सन २०२१ या वर्षातील एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने तसेच संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख आली नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून मागणी पत्र नसल्याने एमपीएससीला वेळापत्रक जाहीर करता येत नाही. तसेच रिक्त पदांचा तपशील, विविध विभागातील रिक्त पदांची भरती करायची असेल तर यात सामान्य प्रशासन विभागाची मुख्य भूमिका आहे.

चौकट

उत्साहावर पाणी

या पार्श्वभूमीवर या विभागाच्या मंत्र्यांशी संवाद साधला जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र कोणतेही ठोस कारण न देता संवाद रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. सरकारला कोणत्याही स्वरूपाचे गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येते. केवळ अश्वासन देऊन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

चौकट

...तर पुन्हा उद्रेक

उपमुख्यमंत्र्यांनी एमपीएससीचे सदस्य तसेच विविध पदे भरण्याची घोषणा विधीमंडळात केली. त्यामुळे गावी असलेले विद्यार्थी पुन्हा पुण्यात अभ्यासासाठी येऊ लागले आहेत. कोणत्याही क्षणी संयुक्त पूर्व परीक्षेची तसेच राज्य सेवा मुख्य परीक्षेची तारीख जाहीर होऊ शकते अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये आहे. या वेळी जर सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.