शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

कांदा बियाण्यात लाखोंची फसवणूक

By admin | Updated: March 23, 2015 23:07 IST

कांदा बियाण्यात शेतकऱ्यांची लोखो रुपयांची फसवणूक झाली आहे. चार हजार किलो या भावाने घेतलेले कांदा बी शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले

मंचर : कांदा बियाण्यात शेतकऱ्यांची लोखो रुपयांची फसवणूक झाली आहे. चार हजार किलो या भावाने घेतलेले कांदा बी शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले असून, अनेक शेतात कांद्याऐव(वार्ताहर)णुकीची तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मागील दोन वर्षांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. पारंपरिक पद्धतीचे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. अनेक शेतकरी कांदा बी घरच्या घरी तयार करतात; मात्र हे प्रमाण कमी आहे. त्याऐवजी बी विकत घेऊन त्याची रोपे प्राधान्याने तयार केली जातात. या रोपांची लागवड शेतात करून कांदा उत्पादन घेतले जाते.कांदा बीच्या दरात वाढच होत गेली आहे. दोन वर्षांपूर्वी ५०० रुपये किलो या भावाने बी उपलब्ध होते. मागील वर्षापासूनतुटवडा भासू लागला. मात्र त्यानंतर कांदा बियाण्याच्या दरात भरमसाट वाढ झाली. सुरुवातीस पंचवीचशे रुपये तर शेवटच्या टप्प्यात तब्बल चार हजार रुपये किलो कांदा दर झाला. शेतकऱ्यांना कांदा बी मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. जळगाव, जालना, औरंगाबाद, नाशिक येथे जाऊन शेतकऱ्यांनी कांदा बी आणले. स्थानिक व चाकण बाजारातही कांदा बी मिळाले.शेतकऱ्यांनी रोपे तयार करून लागवड केली. पिकांची काळजी घेतली. महागडी खताची मात्र दिली. कांदापीक दोन महिन्यांचे झाले तेव्हा फसवणूक झाल्याचे दिसून आले. दुभाळके (ढेंगळे) मोठ्या प्रमाणावर दिसून आले व शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. दुभाळके कांदा वजनाला हलका तसे बदला म्हणून त्याची गणना होते. तो शेतात जास्त दिवस ठेवल्यास वजनाला हलका होऊन खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची अशी फसवणूक झाली आहे. जिल्हा व इतर भागातील बियाण्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार पाहिले तर लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे. (वार्ताहर)४शेतकरी कांदा बी खरेदी करताना खरेदी पावती बनवत नाहीत. त्यामुळे फसवणूक झाली तर तक्रार करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. काहींनी धाडस करून तक्रार केली; मात्र हे बी मी दिलेच नाही असा पवित्रा बी विक्रीकरणारांनी घेतला. काहींनी तर दलालीचा अवलंब केला. दूरवरून मोठ्या प्रमाणावर बी आणून त्यांनी ते शेतकऱ्यांना विकले. मध्ये मोठा नफा कमविला. आता त्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.४खरीप हंगामाची बियाणे रब्बीला वापरा, हा प्रकार झाला. जुने बियाणाची उगवणच झाली नाही. यात फसवणुकीचा आकडा मोठा असेल. अवेळी पाऊस, थंड वातावरण, नत्रयुक्त खताचा जास्त वापर, जास्त दिवसांचे रोप ही कांदापिकाला फटका बसण्याची काही कारणे असून, त्यामुळेही डेंगळे आले आहेत.चार एकर कांदा लागवड केली. त्यात तीस टक्के डेंगळे निघाली आहेत. त्याचा फटका उत्पादक व उत्पन्नास बसणार आहे. शेतकऱ्यांनी यापुढे बी घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे. जिल्ह्याच्या बाहेरून आलेले बियाणे प्रामुख्याने फसवे असून, त्या बियाण्यालाच डेंगळे आली आहेत.- गोविंद जाधवकांदा उत्पादक शेतकरी, ओझर