शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो, रिंगरोड करता आला नाही

By admin | Updated: July 25, 2015 23:52 IST

पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुण्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता नाही, त्यामुळे विकासाचे निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी गेल्या तीन रिंगरोड, मेट्रो तसेच शहराचा

पुणे : पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुण्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता नाही, त्यामुळे विकासाचे निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी गेल्या तीन रिंगरोड, मेट्रो तसेच शहराचा विकास आराखडा (डीपी) मार्गी लावणे शक्य झाली नसल्याची खंत असल्याचे सांगत पक्षाच्या अपयशाची कबुली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिली. महापालिकेत सत्तेत आल्यानंतर गेल्या तीन वर्षांत निवडणूकांमध्ये देण्यात आलेल्या आश्वासनानुसार, राष्ट्रवादीने केलेल्या कामांचा लेखाजोखा सांगणाऱ्या अहवालाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. खासदार आणि शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार अनिल भोसले, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृहनेते बंडू केमसे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह विशाल तांबे, चंचला कोद्रे, सुभाष जगताप, बाबूराव चांदेरे, बापूसाहेब कर्णेगुरूजी हे माजी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पवार यांनी एकहाती सत्ता नसल्याने पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत शहराच्या प्रमुख समस्या सोडविण्यात अडचणी येत असल्याचे सांगत शहराचा दृरदृष्टीने विचार करणाऱ्यांची संख्या पुण्यात अधिक असल्याने अनेक विकासकामांसाठी अडचणी येत असल्याचा टोलाही शहरातील स्वयंसेवी संस्थांना लगावला.मेट्रोमध्ये राजकारण नको -गेल्या तीन वर्षांत महापालिकेत सत्तेत असताना, रिंगरोड तसेच मेट्रो मार्गी लावण्यात अपयश आल्याचे सांगताना, रिंगरोडसाठी मोठ्या भूसंपादनाची आवश्यकता आहे. मात्र, त्यात अनेक विभागांची परवानगी मिळत नसल्याने उशीर होत आहे. मुंबईनंतर पुणे हे सर्वाधिक वेगाने वाढणार शहर आहे. या शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी रिंगरोडबरोबरच मेट्रोचीही आवश्यकता आहे. मात्र, तीन वर्षांत आम्हाला हा प्रकल्प मार्गी लावता आला नाही. आता भाजप केंद्रात आणि राज्यातही सत्तेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मेट्रोबाबतचे आक्षेप ऐकूण घेतले असल्याने तत्काळ नगरविकास केंद्रीयमंत्री वैंकय्या नायडू यांच्याशी चर्चा करून मेट्रोस मान्यता द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली. तर आवश्यक तेथे भुयारी, जमिनीवर तसेच गरज असेल तेथे जमिनीवरून हा प्रकल्प उभारला जावा, असेही पवार म्हणाले.डीपीला आमचा उशीर झाला या वेळी शहराचा विकास आराखड करताना, आम्हाला उशीर झाल्याने तो राज्यशासनाने ताब्यात घेतला असला, तरी आता पुढील प्रक्रियेस उशीर न लावता शहराच्या हितासाठी योग्य निर्णय घेऊन तो शासनाने तत्काळ मार्गी लावावा, असे पवार या वेळी बोलताना म्हणाले.डीपीबाबत आरोप प्रत्यारोप झाले. त्यावरून मोठमोठ्या चर्चाही झाल्या, त्यामुळे आम्हाला तो करण्यास उशीर झाला असला तरी शासनाने तो ताब्यात घेतल्याने चांगलेच झाले आहे. मात्र, आता तो मान्य करताना, कोणाचेही हितसंबध न जोपासता शहरासाठी आवश्यक असलेली शाळा, उद्याने, रुग्णालये, पार्किंग, बसस्थानके, मैदाने अशी आरक्षणे काय ठेवली जावीत, असेही पवार या वेळी बोलताना म्हणाले.