शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयटी कंपन्यांवर मेहेरनजर

By admin | Updated: August 13, 2016 05:26 IST

पालिका हद्दीतील आयटी कंपन्यांना मिळकतकरात सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठविला आहे. तो मंजूर झाला तर महापालिकेचे प्रतिवर्षी

पुणे : पालिका हद्दीतील आयटी कंपन्यांना मिळकतकरात सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठविला आहे. तो मंजूर झाला तर महापालिकेचे प्रतिवर्षी किमान ६५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.राज्य सरकारच्या धोरणानुसारच हा प्रस्ताव तयार केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, सरकारचे या संदर्भातील धोरण स्पष्ट नसून त्याचाच तोटा पालिकेला सन २००३ पासून होत आहे. २००३ मध्ये राज्य सरकारने आयटी उद्योगाला उत्तेजन मिळावे, यासाठी विविध सवलती जाहीर केल्या. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रातील आयटी उद्योगांना मिळकतकर व्यावसायिक दराने आकारला जाऊ नये, निवासी दराने आकारावा, असे नमूद केले होते. त्याची मुदत तीन वर्षे असावी, असाही त्यात उल्लेख होता. त्याप्रमाणे पुणे महापालिकेने निर्णय घेतला व त्या वेळच्या आयटी उद्योगांना त्याप्रमाणे करआकारणी केली.पालिका हद्दीत त्या वेळी सुमारे ७०० आयटी उद्योग कार्यरत होते. त्या सर्वांना पालिकेने निवासी दराने कर आकारणी केली. पहिली तीन वर्षे संपल्यानंतर ही सवलत थांबविणे गरजेचे होते. मात्र, सन २००६ नंतरही ही सवलत कायम ठेवण्यात आली. सन २००९ मध्ये या निर्णयाने पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे, हे लक्षात आल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी त्या वर्षानंतर आलेल्या सर्व आयटी उद्योगांना व्यावसायिक दराने कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सन २०१५ पर्यंत एकूण १६४ आयटी उद्योग आले. त्या सर्वांना तसेच जुन्या आयटी उद्योगांनाही (एकूण ८६४) व्यावसायिक दराने कर आकारणी करण्यात आली. मात्र, त्यावरून वाद निर्माण झाले. जुन्यांना सवलत होती ती आम्हालाही मिळावी, असे नव्यांचे म्हणणे होते, तर सुरुवातीच्या काळात त्यांना सवलत दिली ती आम्हालाही मिळावी, असे नव्यांचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)पुन्हा नव्याने धोरण१४ आॅगस्ट २०१५ ला राज्य सरकारने पुन्हा आयटी धोरण जाहीर केले. त्यात या उद्योगांना मिळकतकरात पुन्हा सवलत देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना कळविले. त्याचा आधार घेऊन प्रशासनाने आता स्थायी समितीसमोर अशी सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला आहे. सन २००९ ते सन २०१५ पर्यंत सर्व कंपन्यांना व्यावसायिक दराने कर आकारणीबाबत निर्णय घ्यावा, सन २०१५ नंतरच्या सर्व उद्योगांना निवासी दराने कर आकारणी व्हावी, असे या प्रस्तावात म्हटले आहे.