शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

रक्षाबंधनाला महिलांना मिळणार शौैचालयाची भेट

By admin | Updated: August 1, 2015 04:29 IST

शौैचालय नसल्याने सर्वात जास्त कुचंबणा होते ती महिलांची. ती दूर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने रोटरीच्या सहकार्याने महिलांना रक्षाबंधनाला अनोखी शौैचालय भेट देण्याचे ठरविले आहे.

- बापू बैलकर,  पुणे

शौैचालय नसल्याने सर्वात जास्त कुचंबणा होते ती महिलांची. ती दूर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने रोटरीच्या सहकार्याने महिलांना रक्षाबंधनाला अनोखी शौैचालय भेट देण्याचे ठरविले आहे. यामुळे महिलेसह तिच्या कुटुंबाची गैरसोय दूर होणार आहे. या उपक्रमामुळे ४९३ ग्रामपंचायती निर्मलग्राम करण्याचा मानस असून, १0 हजार ९१७ कुटुंबीयांना लाभ होणार आहे. तसा प्रस्ताव तयार करून तो शासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांना पाठविला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गेल्या वर्षात जिल्हा परिषदेने १00 टक्के हगणदारीमुक्त जिल्हा करण्याचे ठरविले होते. यात फक्त मुळशी तालुका १00 टक्के करण्यात त्यांना यश आले होते. यात अनेक अडचणी आल्या होत्या. यात प्रामुख्याने या योजनेसाठी सरकारकडून मिळणाऱ्या १२ हजार अनुदानातून शौचालय होत नसल्याने ती बांधण्यास टाळटाळ होत असल्याचे समोर आले आहे. २00३ पासून हा कार्यक्रम सुरू असून, जुलै २0१५ अखेर जिल्ह्यातील १४0४ ग्रामपंचायतींपैकी १७८ ग्रामपंचायती १00 टक्के हगणदगरीमुक्त झाल्या आहेत. अजून १२२६ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त करावयाच्या आहेत. गेल्या १२ वर्षांतील हे प्रमाण पाहता ही मोहीम संथ गतीने सुरू आहे. यामुळे यंदा जिल्हा परिषदेने ही योजना रोटरीच्या सहकार्याने राबविण्याचे ठरविले आहे. शौचालय बांधकामास अनुदानप्राप्त कुटुंबीयांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. यापेक्षा येणारा जास्तीचा खर्च (अनुदानाव्यतिरिक्त) रोटरीतर्फे दिला जाणार आहे. यासाठी शौचालय बांधकाम करून देणाऱ्या संस्थेची निवड रोटरी करणार आहे. यास शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिल्यास जिल्हा परिषद रक्षाबंधन सनानिमित्त ग्रामीण भागातील भगिनींसाठी आत्मसन्मानासाठी ही शौचालय भेट देण्याचे जाहीर करणार आहे. यात १ ते ५0 कुटुंबांकडे शौचालय नसलेल्या ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार असून, अशा ४९३ ग्रामपंचायतींतील १0 हजार ९१७ कुटुंबीयांना ही भेट मिळणार आहे. यात सर्वांत मोठी अडचण आहे, ती लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान बांधकाम करणाऱ्या संस्थेकडे वर्ग कसे करावयाचे. यासाठी जिल्हा परिषदेने सदर संस्थेस हे अनुदान जिल्हास्तरावरून लाभार्थ्यांच्या व ग्रामपंचायतीच्या सहमतीने वर्ग करण्यासाठी परवानगी मिळविण्याची विनंती राज्यसरकारकडे केली आहे. लाभार्थ्यांची संमतिपत्रे ग्रामपंचायतीकडे घेऊन ग्रामपंचायती मासिक सभेच्या ठरावासह संमती घेतील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे यांनी सांगितले. आंबेगाव : ३९ (६५३)बारामती : २०(४९१)भोर : १११(२१३०)दौंड : १३(३९८)हवेली : ३३ (७७०)इंदापूर : १५ (३९४)जुन्नर : ५४ (१०३४)खेड: ६६ (१५४९)मावळ : २८ (६२९)मुळशी : ३५ (७३१)पुरंदर : २३(५९८)शिरूर : २५ (६८०)वेल्हा : ३१(८६०)एकुण ४९३ (१०९१७)प्रत्येक कटुंबाकडे शौचालय असावे ही आमची भूमिका आहे. १२ हजारांत शौचालयाचे काम होत नसल्याने रोटरीने यासाठी मदतीचा हात दिला आहे. जिल्हा निर्मलग्राम होण्यासाठी इतरही सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्यांचे जिल्हा परिषद स्वागत करेल.- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद