शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

शेतीला पाणी मिळण्यात यंत्रणेच्या कूर्मगतीचा अडथळा

By admin | Updated: December 13, 2015 23:53 IST

मुळा, मुठा नदीचे अशुद्ध, गटारस्वरूप असलेले पाणी शुद्ध करून शेतीला देण्याचा प्रकल्प गेली अठरा वर्षे यंत्रणा राबवित असूनही, प्रत्यक्षात शेतीला पाणी मिळणे कोसो दूर आहे

मुळा, मुठा नदीचे अशुद्ध, गटारस्वरूप असलेले पाणी शुद्ध करून शेतीला देण्याचा प्रकल्प गेली अठरा वर्षे यंत्रणा राबवित असूनही, प्रत्यक्षात शेतीला पाणी मिळणे कोसो दूर आहे. पुणे महानगरपालिकेने मुंढवा येथे उभारलेल्या जॅकवेलमधून जुन्या मुठा उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची आवश्यक ती सर्व तयारी झाली. जलसंपदा विभागाकडून बेबी कॅनॉल पूर्ववत प्रवाही होण्यासाठी कार्यवाही त्वरेने होत नसल्याने मुळा-मुठा नदीसाठी चांगले दिवस अजून आलेले नाहीत. नदीची प्रदूषणातून मुक्तता झालेली नसल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना, या काळ्यापाण्याची शिक्षा संपणार तरी कधी, असा प्रश्न पडला आहे.सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचे जॅकवेल उभारण्यात आले. पाणी नदीतून उचलून जुन्या कालव्यात सोडण्यासाठी तसेच बंधारा ते साडेसतरा नळी या साडेतीन किलोमीटरच्या कालव्यादरम्यान २,७०० मि.मी. व्यासाची दाबनलिका टाकण्याचे काम आॅगस्ट २०१४ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार होते. अद्यापही हे काम कूर्मगतीने सुरु आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते जुन्या कालव्याद्वारे शेतीला पुरविण्याबाबत १९९७ मध्ये महानगरपालिका आणि जलसंपदा विभागात करार झाला होता. परंतु १०० टक्के पाण्यावर प्रक्रिया करणे महापालिकेला शक्य झालेले नाही. नदी सुधार योजनेसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने युद्धपातळीवर मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची सूचना केली. त्यानंतर काही ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले. तरीही मुळा-मुठा नदीचा दाट लोकसंख्येच्या प्रदेशातून वाहताना असलेला काळपट रंग आणि उग्र गंध कायमच आहे. हवेली व दौंड तालुक्यातील बळीराजा आता आपल्या शेतीला यापुढे कायमस्वरूपी पाणी मिळणार, या कल्पनेने सुखावला होता. नदीकाठचे सोलापूरपर्यंतचे नागरिक मुळा-मुठा नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त होणार, तिला जुने वैभव प्राप्त होऊन मलजलातून मुक्त होऊन ती खळखळून वाहणार व काळ्यापाण्याची शिक्षा संपणार या अपेक्षेत होते. जॅकवेलचे उद्घाटन होऊन दोन महिने उलटून गेले. केवळ बेबी कॅनॉलचे काम होत नसल्याने जुन्या कालव्यातून पाणी येत नाही, हे पाहून सर्वांचा अपेक्षाभंग झाला असून, नदीतीरावरील नागरिक काळ्यापाण्याची शिक्षा संपण्याच्या आशेवरच आहेत. खडकवासला प्रकल्प व जुना मुठा उजवा कालव्याचे बांधकाम १८८०मध्ये पूर्ण झाले होते. त्याचे हवेली व दौंड या दोन तालुक्यांतील पाटसपर्यंतचे लाभक्षेत्र २०,११८ हेक्टर एवढे आहे.कालव्याची एकूण लांबी १११ किलोमीटर आहे. १९६५मध्ये कालवा किलोमीटर १२ ते १८चे नूतनीकरण करून त्याचे रूपांतर नवीन मुठा कालव्यामध्ये करण्यात आले. याच काळापासून जुना मुठा कालवा किलोमीटर १९ ते १११ वापरात नसल्याने त्याची दुरवस्था झाली. या जुन्या कालव्यात फुरसुंगी परिसरात झाडी उगवली आहे. काही भागात राडारोड्याचे भराव टाकले आहेत. पोटचाऱ्यांमध्ये घरांची, झोपड्यांची अतिक्रमणे अनेक वर्षांपासून झाली आहेत. काही बहाद्दरांनी कालव्यात मातीची भर घालून शेती केली आहे.