शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शेतीला पाणी मिळण्यात यंत्रणेच्या कूर्मगतीचा अडथळा

By admin | Updated: December 13, 2015 23:53 IST

मुळा, मुठा नदीचे अशुद्ध, गटारस्वरूप असलेले पाणी शुद्ध करून शेतीला देण्याचा प्रकल्प गेली अठरा वर्षे यंत्रणा राबवित असूनही, प्रत्यक्षात शेतीला पाणी मिळणे कोसो दूर आहे

मुळा, मुठा नदीचे अशुद्ध, गटारस्वरूप असलेले पाणी शुद्ध करून शेतीला देण्याचा प्रकल्प गेली अठरा वर्षे यंत्रणा राबवित असूनही, प्रत्यक्षात शेतीला पाणी मिळणे कोसो दूर आहे. पुणे महानगरपालिकेने मुंढवा येथे उभारलेल्या जॅकवेलमधून जुन्या मुठा उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची आवश्यक ती सर्व तयारी झाली. जलसंपदा विभागाकडून बेबी कॅनॉल पूर्ववत प्रवाही होण्यासाठी कार्यवाही त्वरेने होत नसल्याने मुळा-मुठा नदीसाठी चांगले दिवस अजून आलेले नाहीत. नदीची प्रदूषणातून मुक्तता झालेली नसल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना, या काळ्यापाण्याची शिक्षा संपणार तरी कधी, असा प्रश्न पडला आहे.सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचे जॅकवेल उभारण्यात आले. पाणी नदीतून उचलून जुन्या कालव्यात सोडण्यासाठी तसेच बंधारा ते साडेसतरा नळी या साडेतीन किलोमीटरच्या कालव्यादरम्यान २,७०० मि.मी. व्यासाची दाबनलिका टाकण्याचे काम आॅगस्ट २०१४ मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार होते. अद्यापही हे काम कूर्मगतीने सुरु आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते जुन्या कालव्याद्वारे शेतीला पुरविण्याबाबत १९९७ मध्ये महानगरपालिका आणि जलसंपदा विभागात करार झाला होता. परंतु १०० टक्के पाण्यावर प्रक्रिया करणे महापालिकेला शक्य झालेले नाही. नदी सुधार योजनेसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने युद्धपातळीवर मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची सूचना केली. त्यानंतर काही ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले. तरीही मुळा-मुठा नदीचा दाट लोकसंख्येच्या प्रदेशातून वाहताना असलेला काळपट रंग आणि उग्र गंध कायमच आहे. हवेली व दौंड तालुक्यातील बळीराजा आता आपल्या शेतीला यापुढे कायमस्वरूपी पाणी मिळणार, या कल्पनेने सुखावला होता. नदीकाठचे सोलापूरपर्यंतचे नागरिक मुळा-मुठा नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त होणार, तिला जुने वैभव प्राप्त होऊन मलजलातून मुक्त होऊन ती खळखळून वाहणार व काळ्यापाण्याची शिक्षा संपणार या अपेक्षेत होते. जॅकवेलचे उद्घाटन होऊन दोन महिने उलटून गेले. केवळ बेबी कॅनॉलचे काम होत नसल्याने जुन्या कालव्यातून पाणी येत नाही, हे पाहून सर्वांचा अपेक्षाभंग झाला असून, नदीतीरावरील नागरिक काळ्यापाण्याची शिक्षा संपण्याच्या आशेवरच आहेत. खडकवासला प्रकल्प व जुना मुठा उजवा कालव्याचे बांधकाम १८८०मध्ये पूर्ण झाले होते. त्याचे हवेली व दौंड या दोन तालुक्यांतील पाटसपर्यंतचे लाभक्षेत्र २०,११८ हेक्टर एवढे आहे.कालव्याची एकूण लांबी १११ किलोमीटर आहे. १९६५मध्ये कालवा किलोमीटर १२ ते १८चे नूतनीकरण करून त्याचे रूपांतर नवीन मुठा कालव्यामध्ये करण्यात आले. याच काळापासून जुना मुठा कालवा किलोमीटर १९ ते १११ वापरात नसल्याने त्याची दुरवस्था झाली. या जुन्या कालव्यात फुरसुंगी परिसरात झाडी उगवली आहे. काही भागात राडारोड्याचे भराव टाकले आहेत. पोटचाऱ्यांमध्ये घरांची, झोपड्यांची अतिक्रमणे अनेक वर्षांपासून झाली आहेत. काही बहाद्दरांनी कालव्यात मातीची भर घालून शेती केली आहे.