शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कारखाना निवडणुकीत ‘१०’च्या नोटांची कमाल

By admin | Updated: April 18, 2015 23:32 IST

निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यातूनही मार्ग न काढणारे राजकारणी ते कसले.

बारामती : निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यातूनही मार्ग न काढणारे राजकारणी ते कसले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘१० रुपयां’च्या नोटांनी कमाल केली, अशीच चर्चा होत आहे़ आर्थिक प्रलोभन दाखवून हक्काच्या मतदानाचा नवा फंडाही यानिमित्ताने पुढे आला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे कवित्व आता या चर्चांमधून पुढे येत आहे. कोणतीही निवडणूक दोन्ही बाजूच्या नेत्यांना प्रतिष्ठेची असते. त्यामुळे सर्व कायद्यांवर मार्ग काढून प्रचार केला जातो. निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बंदी आहे. मात्र, मर्यादित मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आर्थिक प्रलोभन दाखविले जाते. त्यातूनही अनेकदा अपयशच पदरी येते. अनेकदा तर विरोधकांकडून ‘पैसे त्यांचे घ्या, मतदान आम्हाला करा’ असेही सांगितले गेल्याची उदाहरणे असून त्यावर निवडणूक आयोगाने कारवाईही केली आहे. परंतु, आपल्याला शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी मतदारांना बांधून घेण्यासाठी नवी शक्कल लढविण्यात आली. मताला ठरलेल्या दरापैकी काही रक्कम रोख दिली. त्याबरोबरच एक दहा रुपयांची नोट देण्यात आली. या नोटेवरील शेवटचे तीन आकडे आणि संबंधित मतदाराचे नाव लिहून घेतले गेले. त्याला असेही सांगण्यात आले, की मतदान झाल्यावर निवडून आलो, तर ही १० रुपयांची नोट दाखविल्यावर उर्वरित रक्कम मिळेल. काल सायंकाळपासूनच निवडक मतदारांनी आपली १० रुपयांची नोट ‘कॅश’ करून घेतली. ऊसदरासाठी आंदोलन, किमान निर्धारित मूल्यासाठी (एफआरपी) आंदोलन केले जाते, त्या वेळी कारखान्याची आर्थिक स्थिती बेताची आहे; कारखानदारी अडचणीत येईल, असे सांगितले जाते. त्यामुळे शेतकरी सभासददेखील शांत बसतात. मात्र, निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर येतो. त्यामुळे सभासदांचीदेखील ‘चांदी’ होते, हेदेखील यानिमित्ताने दिसून आले. ४राजकीय नेतेमंडळी आपल्या सोयीसाठी दबावाचे राजकारण करतात. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांशी चर्चा करतात. तसेच किस्से सोमेश्वरच्या निवडणुकीत घडले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सोमेश्वरची निवडणूक होती. वजनदार नेत्यावर दबाव टाकण्यासाठी एका नेत्याने अगोदर विरोधकांशी संधान साधले. अटी, शर्ती घातल्या. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यात यश आले. जिल्हा बॅँकेला ‘बिनविरोध’चा शब्द घेतला. त्यानंतर विरोधकांशी चर्चा करण्याचेच थांबविले. मात्र, तोपर्यंत विरोधकांनी आखलेले डावपेच सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘दबाव’ तंत्रातील नेत्यांना यश आले.