शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

कारखाना निवडणुकीत ‘१०’च्या नोटांची कमाल

By admin | Updated: April 18, 2015 23:32 IST

निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यातूनही मार्ग न काढणारे राजकारणी ते कसले.

बारामती : निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखविण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, त्यातूनही मार्ग न काढणारे राजकारणी ते कसले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘१० रुपयां’च्या नोटांनी कमाल केली, अशीच चर्चा होत आहे़ आर्थिक प्रलोभन दाखवून हक्काच्या मतदानाचा नवा फंडाही यानिमित्ताने पुढे आला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे कवित्व आता या चर्चांमधून पुढे येत आहे. कोणतीही निवडणूक दोन्ही बाजूच्या नेत्यांना प्रतिष्ठेची असते. त्यामुळे सर्व कायद्यांवर मार्ग काढून प्रचार केला जातो. निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बंदी आहे. मात्र, मर्यादित मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आर्थिक प्रलोभन दाखविले जाते. त्यातूनही अनेकदा अपयशच पदरी येते. अनेकदा तर विरोधकांकडून ‘पैसे त्यांचे घ्या, मतदान आम्हाला करा’ असेही सांगितले गेल्याची उदाहरणे असून त्यावर निवडणूक आयोगाने कारवाईही केली आहे. परंतु, आपल्याला शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी मतदारांना बांधून घेण्यासाठी नवी शक्कल लढविण्यात आली. मताला ठरलेल्या दरापैकी काही रक्कम रोख दिली. त्याबरोबरच एक दहा रुपयांची नोट देण्यात आली. या नोटेवरील शेवटचे तीन आकडे आणि संबंधित मतदाराचे नाव लिहून घेतले गेले. त्याला असेही सांगण्यात आले, की मतदान झाल्यावर निवडून आलो, तर ही १० रुपयांची नोट दाखविल्यावर उर्वरित रक्कम मिळेल. काल सायंकाळपासूनच निवडक मतदारांनी आपली १० रुपयांची नोट ‘कॅश’ करून घेतली. ऊसदरासाठी आंदोलन, किमान निर्धारित मूल्यासाठी (एफआरपी) आंदोलन केले जाते, त्या वेळी कारखान्याची आर्थिक स्थिती बेताची आहे; कारखानदारी अडचणीत येईल, असे सांगितले जाते. त्यामुळे शेतकरी सभासददेखील शांत बसतात. मात्र, निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर येतो. त्यामुळे सभासदांचीदेखील ‘चांदी’ होते, हेदेखील यानिमित्ताने दिसून आले. ४राजकीय नेतेमंडळी आपल्या सोयीसाठी दबावाचे राजकारण करतात. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांशी चर्चा करतात. तसेच किस्से सोमेश्वरच्या निवडणुकीत घडले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सोमेश्वरची निवडणूक होती. वजनदार नेत्यावर दबाव टाकण्यासाठी एका नेत्याने अगोदर विरोधकांशी संधान साधले. अटी, शर्ती घातल्या. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यात यश आले. जिल्हा बॅँकेला ‘बिनविरोध’चा शब्द घेतला. त्यानंतर विरोधकांशी चर्चा करण्याचेच थांबविले. मात्र, तोपर्यंत विरोधकांनी आखलेले डावपेच सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘दबाव’ तंत्रातील नेत्यांना यश आले.