शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

मातृत्वाचा सन्मान गरजेचा

By admin | Updated: January 13, 2017 03:31 IST

समाजात स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार अशा घटना वारंवार घडत असताना मातृत्वाचा सन्मान ही अत्यंत गरजेची

पुणे : ‘समाजात स्त्रीभ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार अशा घटना वारंवार घडत असताना मातृत्वाचा सन्मान ही अत्यंत गरजेची बाब बनली आहे. बऱ्याच मराठी कादंबऱ्यांमध्ये प्रणय, चुंबनाची बटबटीत वर्णने वाचायला मिळतात. सूचक आणि सभ्य वर्णन दुर्मिळ होत चालले आहे. मराठी साहित्यामध्ये मोजक्या लेखकांनी नायकप्रधान आणि नायिकाप्रधान कादंबरी ही संकल्पना मोडून काढली आहे’, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.दिलीप बर्वे लिखित ‘विधिलिखित’ या कादंबरीचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे आणि डॉ. मधुसूदन घाणेकर उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘जीवन जगताना आलेले अनुभव, भोगलेली वेदना हे कलाकृतींच्या निर्मितीचे मूळ असते. विधिलिखित विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाही. ही संकल्पना बुद्धिप्रामाण्यवाद्यांना पटणारी नाही. मात्र, वेदना आणि विधिलिखिताचा जवळचा संबंध असतो. या अनुबंधातून लेखन उमटत जाते. यामागील कारणमीमांसा करणे शक्य नसते. ज्या क्षणी, लेखन स्फुरते, त्यामागे माणसाचे भोगलेपण लपलेले असते. इतरांचे दु:ख कळणे आणि स्वत: भोगणे यातून नवनिर्मितीची प्रतिभा जागृत होते. त्यातून कथानक साकारत जाते.’डॉ. घाणेकर म्हणाले, ‘कोणत्याही क्षेत्रातील कलावंताचा व्यासंग निर्माण होणे गरजेचे असते. त्यातूनच कला वृद्धिंगत होते. कथा, कादंबरीतील पात्रे मार्मिकपणे रंगवणे हे लेखकाचे कौशल्य असते.’ डॉ. मृणाल धोंगडे यांनी सूत्रसंचालन केले. मोहित बर्वे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)