शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मराठी भाषिकच भाषेबाबत उदासीन

By admin | Updated: June 28, 2017 04:27 IST

मराठी ही आपली मातृभाषा आहे; पण अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. ते पाहून मराठी भाषिकांना मराठीचे कितपत महत्त्व वाटते

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठी ही आपली मातृभाषा आहे; पण अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. ते पाहून मराठी भाषिकांना मराठीचे कितपत महत्त्व वाटते, असा प्रश्न पडतो, असे मत एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्वामीकृपा सभागृहात सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, पंडित वसंतराव गाडगीळ, कबीरबाग मठ संस्थेच्या डॉ. सुधा पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सुनील देवधर यांना ‘आंतरभारती पुरस्कार,’ प्रतिभा शाहू मोडक यांना ‘सहधर्मचारिणी पुरस्कार,’ माधवराव साठे यांना ‘पंडित माधवराव सप्रे स्मृती लोकमान्य पुरस्कार,’ दिनेश बर्वे यांना ‘मुद्रांजली पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.गोखले म्हणाले, ‘मराठी ही बहुसंख्येने बोलली जाणारी भाषा आहे. संख्येच्या तुलनेत मराठी भाषेचा भारतात चौथा व जगात एकोणिसावा क्रमांक लागतो. देशाची, राज्याची भाषा म्हणून मराठीचा अभिमान महत्त्वाचा आहे. इथले लोक जेव्हा परदेशात एकमेकांना भेटतात, तेव्हा ते इंग्रजीत बोलतात. पण इतर देशातले लोक परदेशात एकमेकांना भेटतात, तेव्हा ते त्यांच्याच भाषेत बोलतात. आपण छोट्या कृतींतून आपल्या भाषेचा लय करत चाललो आहोत, ही खेदाची बाब आहे. अलीकडे बऱ्याच भाषांमधील साहित्याचा अनुवाद मराठीत होत आहे, ही बाब आशादायक आहे. मराठीत चांगली ज्ञानशृंखला यानिमित्ताने येत आहे; पण ती टिकविण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे.’गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या ‘कबीर आणि महाराष्ट्र’ या चर्चासत्रात सादर झालेल्या निबंधांची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. सुनील देवधर, सुधा पंडित, प्रतिभा शाहू मोडक यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदन मुक्ता कुलकर्णी-गरसोळे यांनी केले.