शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मराठी भाषिकच भाषेबाबत उदासीन

By admin | Updated: June 28, 2017 04:27 IST

मराठी ही आपली मातृभाषा आहे; पण अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. ते पाहून मराठी भाषिकांना मराठीचे कितपत महत्त्व वाटते

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठी ही आपली मातृभाषा आहे; पण अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. ते पाहून मराठी भाषिकांना मराठीचे कितपत महत्त्व वाटते, असा प्रश्न पडतो, असे मत एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्वामीकृपा सभागृहात सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर, पंडित वसंतराव गाडगीळ, कबीरबाग मठ संस्थेच्या डॉ. सुधा पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सुनील देवधर यांना ‘आंतरभारती पुरस्कार,’ प्रतिभा शाहू मोडक यांना ‘सहधर्मचारिणी पुरस्कार,’ माधवराव साठे यांना ‘पंडित माधवराव सप्रे स्मृती लोकमान्य पुरस्कार,’ दिनेश बर्वे यांना ‘मुद्रांजली पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.गोखले म्हणाले, ‘मराठी ही बहुसंख्येने बोलली जाणारी भाषा आहे. संख्येच्या तुलनेत मराठी भाषेचा भारतात चौथा व जगात एकोणिसावा क्रमांक लागतो. देशाची, राज्याची भाषा म्हणून मराठीचा अभिमान महत्त्वाचा आहे. इथले लोक जेव्हा परदेशात एकमेकांना भेटतात, तेव्हा ते इंग्रजीत बोलतात. पण इतर देशातले लोक परदेशात एकमेकांना भेटतात, तेव्हा ते त्यांच्याच भाषेत बोलतात. आपण छोट्या कृतींतून आपल्या भाषेचा लय करत चाललो आहोत, ही खेदाची बाब आहे. अलीकडे बऱ्याच भाषांमधील साहित्याचा अनुवाद मराठीत होत आहे, ही बाब आशादायक आहे. मराठीत चांगली ज्ञानशृंखला यानिमित्ताने येत आहे; पण ती टिकविण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे.’गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या ‘कबीर आणि महाराष्ट्र’ या चर्चासत्रात सादर झालेल्या निबंधांची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. सुनील देवधर, सुधा पंडित, प्रतिभा शाहू मोडक यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदन मुक्ता कुलकर्णी-गरसोळे यांनी केले.