शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

मराठ्यांचा अडीचशेवा ‘दिल्ली विजय दिन’ होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठ्यांच्या दिल्ली विजयाला १० फेब्रुवारीला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. पानिपतनंतरच्या मराठ्यांच्या ‘दिल्ली विजय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठ्यांच्या दिल्ली विजयाला १० फेब्रुवारीला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. पानिपतनंतरच्या मराठ्यांच्या ‘दिल्ली विजय दिना’चा हा अडीचशेवा सोहळा रविवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा सभागृहात साजरा केला जाणार आहे. हिंदुत्ववादी, शिवप्रेमी अशा विविध ३७ संस्था-संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

मध्य प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री यशोधराराजे शिंदे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. ११) ही माहिती दिली. विक्रमसिंह मोहिते, विजय दरेकर व मोहन शेटे उपस्थित होते.

बलकवडे म्हणाले की, आजच्या पिढीला जाज्वल्य इतिहासाची आणि आपल्या शौर्याची माहिती व्हावी, म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णी व मी स्वत: या सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून बोलणार आहोत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत, महेंद्र पेशवा, भूषण होळकर, डॉ. अतुल बिनीवाले यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

“मराठ्यांच्या फौजांनी १७७१ मध्ये पानिपताचा बदल घेत पानिपत, सोनपत, बागपत, कुंजपुरा, शामली, फत्तरगड, घोसगड आणि नजिबाबाद जिंकून घेतले. नजीबखानने पानिपतात लुटलेली तीस लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी पुन्हा मिळवली. शेकडो मराठा स्त्रियांना मुक्त केले. नजीबखानाची कबर उखडून गंगेत मिसळून मराठ्यांनी पानिपताचा बदला पूर्ण केला. यामुळे अब्दालीला पुन्हा हिंदुस्थानात येण्याची हिंमत झाली नाही,” असे बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

दिल्लीवर मराठ्यांच्या कब्ज्यात

“१४ जानेवारी १७६१ या दिवशी पानिपतात परकीय अब्दालीविरुद्ध झालेल्या संघर्षात एक लाख मराठ्यांनी बलिदान देऊन देशाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. युद्धात जरी अब्दालीचा विजय झाला असला तरी ध्येयामध्ये मराठे विजयी झाले. कारण त्यानंतर अब्दाली पुन्हा कधीही दिल्लीपर्यंत येऊ शकला नाही. जनरल लेक याने आपल्या दिल्ली विजयाच्या इतिहासात लिहून ठेवले आहे की, दिल्ली आम्ही मुघलांशी नव्हे तर मराठ्यांशी लढून जिंकली,” या शब्दांत पांडुरंग बलकवडे यांनी विजयदिनासंबंधीचा इतिहास सांगितला.

चौकट

मराठ्यांनी जिंकला लाल किल्ला

“पानिपतानंतर अब्दालीचा हस्तक नजीबखान रोहिला दिल्लीवर कब्जा करुन होता. परकीय आक्रमणापासून दिल्ली आणि हिंदुस्थानचे रक्षण करणारा कोणी नव्हता. त्याचा फायदा घेत इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया देशात घातला. एवढेच नव्हे तर शाहआलम बादशहाला पाटण्यात नजरकैद केले. त्यावेळी बादशहाने माधवराव पेशवे व महादजी शिंदे यांच्याशी संधान बांधून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवण्याची विनंती केली. माधवरावांनी हे आव्हान स्विकारले, मराठ्यांच्या फौजा दिल्लीकडे रवाना झाल्या. हे समजताच घाबरलेल्या नजीबखानने मराठ्यांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. पण मराठ्यांनी तो झिडकारला. ८ फेब्रुवारी १७७१ मध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकली. १० फेब्रुवारी १७७१ रोजी मराठ्यांनी लाल किल्ला जिंकून शिवरायांचा भगवा त्यावर फडकवला,” असे पांडुरंग बलकवडे यांनी नमूद केले.