शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांचा अडीचशेवा ‘दिल्ली विजय दिन’ होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठ्यांच्या दिल्ली विजयाला १० फेब्रुवारीला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. पानिपतनंतरच्या मराठ्यांच्या ‘दिल्ली विजय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठ्यांच्या दिल्ली विजयाला १० फेब्रुवारीला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. पानिपतनंतरच्या मराठ्यांच्या ‘दिल्ली विजय दिना’चा हा अडीचशेवा सोहळा रविवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा सभागृहात साजरा केला जाणार आहे. हिंदुत्ववादी, शिवप्रेमी अशा विविध ३७ संस्था-संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

मध्य प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री यशोधराराजे शिंदे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. ११) ही माहिती दिली. विक्रमसिंह मोहिते, विजय दरेकर व मोहन शेटे उपस्थित होते.

बलकवडे म्हणाले की, आजच्या पिढीला जाज्वल्य इतिहासाची आणि आपल्या शौर्याची माहिती व्हावी, म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णी व मी स्वत: या सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून बोलणार आहोत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत, महेंद्र पेशवा, भूषण होळकर, डॉ. अतुल बिनीवाले यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

“मराठ्यांच्या फौजांनी १७७१ मध्ये पानिपताचा बदल घेत पानिपत, सोनपत, बागपत, कुंजपुरा, शामली, फत्तरगड, घोसगड आणि नजिबाबाद जिंकून घेतले. नजीबखानने पानिपतात लुटलेली तीस लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी पुन्हा मिळवली. शेकडो मराठा स्त्रियांना मुक्त केले. नजीबखानाची कबर उखडून गंगेत मिसळून मराठ्यांनी पानिपताचा बदला पूर्ण केला. यामुळे अब्दालीला पुन्हा हिंदुस्थानात येण्याची हिंमत झाली नाही,” असे बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

दिल्लीवर मराठ्यांच्या कब्ज्यात

“१४ जानेवारी १७६१ या दिवशी पानिपतात परकीय अब्दालीविरुद्ध झालेल्या संघर्षात एक लाख मराठ्यांनी बलिदान देऊन देशाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. युद्धात जरी अब्दालीचा विजय झाला असला तरी ध्येयामध्ये मराठे विजयी झाले. कारण त्यानंतर अब्दाली पुन्हा कधीही दिल्लीपर्यंत येऊ शकला नाही. जनरल लेक याने आपल्या दिल्ली विजयाच्या इतिहासात लिहून ठेवले आहे की, दिल्ली आम्ही मुघलांशी नव्हे तर मराठ्यांशी लढून जिंकली,” या शब्दांत पांडुरंग बलकवडे यांनी विजयदिनासंबंधीचा इतिहास सांगितला.

चौकट

मराठ्यांनी जिंकला लाल किल्ला

“पानिपतानंतर अब्दालीचा हस्तक नजीबखान रोहिला दिल्लीवर कब्जा करुन होता. परकीय आक्रमणापासून दिल्ली आणि हिंदुस्थानचे रक्षण करणारा कोणी नव्हता. त्याचा फायदा घेत इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया देशात घातला. एवढेच नव्हे तर शाहआलम बादशहाला पाटण्यात नजरकैद केले. त्यावेळी बादशहाने माधवराव पेशवे व महादजी शिंदे यांच्याशी संधान बांधून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवण्याची विनंती केली. माधवरावांनी हे आव्हान स्विकारले, मराठ्यांच्या फौजा दिल्लीकडे रवाना झाल्या. हे समजताच घाबरलेल्या नजीबखानने मराठ्यांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. पण मराठ्यांनी तो झिडकारला. ८ फेब्रुवारी १७७१ मध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकली. १० फेब्रुवारी १७७१ रोजी मराठ्यांनी लाल किल्ला जिंकून शिवरायांचा भगवा त्यावर फडकवला,” असे पांडुरंग बलकवडे यांनी नमूद केले.