शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

मराठ्यांचा अडीचशेवा ‘दिल्ली विजय दिन’ होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठ्यांच्या दिल्ली विजयाला १० फेब्रुवारीला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. पानिपतनंतरच्या मराठ्यांच्या ‘दिल्ली विजय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठ्यांच्या दिल्ली विजयाला १० फेब्रुवारीला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. पानिपतनंतरच्या मराठ्यांच्या ‘दिल्ली विजय दिना’चा हा अडीचशेवा सोहळा रविवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा सभागृहात साजरा केला जाणार आहे. हिंदुत्ववादी, शिवप्रेमी अशा विविध ३७ संस्था-संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

मध्य प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री यशोधराराजे शिंदे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. ११) ही माहिती दिली. विक्रमसिंह मोहिते, विजय दरेकर व मोहन शेटे उपस्थित होते.

बलकवडे म्हणाले की, आजच्या पिढीला जाज्वल्य इतिहासाची आणि आपल्या शौर्याची माहिती व्हावी, म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णी व मी स्वत: या सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून बोलणार आहोत. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत, महेंद्र पेशवा, भूषण होळकर, डॉ. अतुल बिनीवाले यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

“मराठ्यांच्या फौजांनी १७७१ मध्ये पानिपताचा बदल घेत पानिपत, सोनपत, बागपत, कुंजपुरा, शामली, फत्तरगड, घोसगड आणि नजिबाबाद जिंकून घेतले. नजीबखानने पानिपतात लुटलेली तीस लाख रुपयांची लूट फत्तरगडमध्ये मराठ्यांनी पुन्हा मिळवली. शेकडो मराठा स्त्रियांना मुक्त केले. नजीबखानाची कबर उखडून गंगेत मिसळून मराठ्यांनी पानिपताचा बदला पूर्ण केला. यामुळे अब्दालीला पुन्हा हिंदुस्थानात येण्याची हिंमत झाली नाही,” असे बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

दिल्लीवर मराठ्यांच्या कब्ज्यात

“१४ जानेवारी १७६१ या दिवशी पानिपतात परकीय अब्दालीविरुद्ध झालेल्या संघर्षात एक लाख मराठ्यांनी बलिदान देऊन देशाचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. युद्धात जरी अब्दालीचा विजय झाला असला तरी ध्येयामध्ये मराठे विजयी झाले. कारण त्यानंतर अब्दाली पुन्हा कधीही दिल्लीपर्यंत येऊ शकला नाही. जनरल लेक याने आपल्या दिल्ली विजयाच्या इतिहासात लिहून ठेवले आहे की, दिल्ली आम्ही मुघलांशी नव्हे तर मराठ्यांशी लढून जिंकली,” या शब्दांत पांडुरंग बलकवडे यांनी विजयदिनासंबंधीचा इतिहास सांगितला.

चौकट

मराठ्यांनी जिंकला लाल किल्ला

“पानिपतानंतर अब्दालीचा हस्तक नजीबखान रोहिला दिल्लीवर कब्जा करुन होता. परकीय आक्रमणापासून दिल्ली आणि हिंदुस्थानचे रक्षण करणारा कोणी नव्हता. त्याचा फायदा घेत इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया देशात घातला. एवढेच नव्हे तर शाहआलम बादशहाला पाटण्यात नजरकैद केले. त्यावेळी बादशहाने माधवराव पेशवे व महादजी शिंदे यांच्याशी संधान बांधून त्याला दिल्लीच्या तख्तावर बसवण्याची विनंती केली. माधवरावांनी हे आव्हान स्विकारले, मराठ्यांच्या फौजा दिल्लीकडे रवाना झाल्या. हे समजताच घाबरलेल्या नजीबखानने मराठ्यांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. पण मराठ्यांनी तो झिडकारला. ८ फेब्रुवारी १७७१ मध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकली. १० फेब्रुवारी १७७१ रोजी मराठ्यांनी लाल किल्ला जिंकून शिवरायांचा भगवा त्यावर फडकवला,” असे पांडुरंग बलकवडे यांनी नमूद केले.