शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

मंथन... लेख जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST

यशवंतराव चव्हाण सांगत, “मतभेद असणं लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आहे. पण मतभेदानं मनभेदाचं आणि मनभेदानं विद्वेषाचं रूप घेतलं की ...

यशवंतराव चव्हाण सांगत, “मतभेद असणं लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आहे. पण मतभेदानं मनभेदाचं आणि मनभेदानं विद्वेषाचं रूप घेतलं की लोकशाहीतलं मांगल्य हरवून बसतं.” महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीतला एक प्रसंग आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका बड्या कॉंग्रेस नेत्याने जाहीर भाषणात ‘शेठजी-भटजी’ असा शब्दप्रयोग करून काही कोट्या केल्या. याबद्दल पुढचे कित्येक महिने नाईकसाहेब पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात या शब्दप्रयोगाबद्दल दिलगिरी व्यक्त करत राहिले.

ज्या बाबासाहेब भोसले यांच्या उदाहरणाने सुरुवात केली त्यांचीच आणखी एक आठवण. मुख्यमंत्री राहिलेल्या भोसले यांना तीन मुलं. पण यातलं कोणीच राजकारणात कसं नाही, अशी विचारणा ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले यांनी त्यांना केली. भोसले यांनी उत्तर दिलं, “राजकारणात जाण्यासाठी तीन गुण अंगी लागतात. ते म्हणजे ‘लठ्ठ’, ‘मठ्ठ’ आणि ‘निगरगट्ट’. माझ्या तिन्ही मुलांमध्ये हे तिन्ही गुण नसल्यानं राजकारणात कोणीच नाही.” यात तथ्य किती हे ज्यानं-त्यानं ठरवावं. बॅॅरिस्टर भोसलेंचे शब्द भलेही टोचणारे असतील. पण सर्वसामान्यांवर दादागिरी करणारे, हिंसा करणारे ‘गुंड’ लोकप्रतिनिधी आजुबाजूला नाहीत काय? स्वार्थासाठी, लोकहिताचा बळी देणारे ‘षंढ’ लोकप्रतिनिधी जिथंतिथं दिसतातच ना? ज्ञान, भान, भाषा, समज, वर्तन, गुणवत्ता, तारतम्य आणि यातून उभ्या राहणाऱ्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत किती राजकारणात?