शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

मंगलाष्टकांची वरात शाही वेदीवर

By admin | Updated: April 17, 2017 06:36 IST

प्रत्येकाला आपला लग्नसोहळा वेगळा व्हावा, असे वाटत आहे. त्यामुळे घरापुढील लग्न मांडव... कार्यालय... लॉन्स आणि पंचतारांकित हॉटेल असा

पुणे : प्रत्येकाला आपला लग्नसोहळा वेगळा व्हावा, असे वाटत आहे. त्यामुळे घरापुढील लग्न मांडव... कार्यालय... लॉन्स आणि पंचतारांकित हॉटेल असा पोहोचला आहे. आम्हाला काही नको मात्र लग्न अमुक ठिकाणी हवे... भोजन असे हवे... अशी साधी मागणी बघता बघता लग्न सोहळ््याचे स्वरुप घेते, इतके केले... याला काय होतेय, असे म्हणत वधूपित्याकडील लगीनघाई लाखो रुपयांचा चुराडा करून जाते, याचे भानच राहत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दोन महिने लगीनघाईचे आहेत. आपली उपस्थिती हाच आहेर, असे म्हणणाऱ्या लग्नाचा थाट पाहण्यासारखाच असतो. अलीकडे हुंडाबंदी आणि त्यावर खूप बोलले जात असल्याने हुंडा आम्ही घेणार नाही आणि देणार नाही, असे सांगणारे कुटुंब आता कमी नाहीत. मात्र, हुंड्यावर पाणी सोडत असले तरी वरपित्याकडील मागण्या या आडमार्गाने वधूपित्याच्या मानगुटीवर बसत आहेत. अनेकदा आम्हाला काही नको, मुलीला दहा तोळे सोने घाला (स्त्रीधन) अशी मागणी होते. काही जण लॉन्सचा आग्रह धरतात. त्यामुळे मंडपाचे कार्यालय आणि साध्या कार्यालयाचा मोठा हॉल आणि हॉलमधून लग्नवेदिका लॉन्स अथवा पंचतारांकित उंबरठा पार करून पुढे जात आहे. वराकडील लोकांनी हुंडा म्हणून रोख मागितली नाही, की सोने मागितले नाही. याचा आनंद मानून वधूकडील मंडळी लग्नाला तयार होत असली तरी या मोठ्या लग्नापायी येणारा खर्चही वाढत जातो. मंडपाचा काही हजारांचा खर्च कार्यालयात हजारोंमध्ये जातो, तर लॉन्सचा खर्च लाखांचा आकडा पार करून सहजच जातो. कार्यालय अथवा लॉन्स जर मोठे घेतले तर त्याची सजावट आणि त्याला साजेसे भोजन ओघानेच येते. त्यामुळे बुंदी-जिलेबीची रसमलाई होते. त्यातून खर्चही त्याचपटीत वाढत जातो. त्यामुळे या थाटामाटातून येणारा खर्च थेट मागितलेल्या हुंड्यापेक्षादेखील अधिकच असतो. पुन्हा लग्न मोठे केले तर नातेवाईकांचा मान-पान, जावई सन्मान शाही हवाच. त्यामुळे हा अप्रत्यक्ष हुंडाच वधूपित्यासाठी ओझे ठरत आहे. (प्रतिनिधी)भपकेबाज सोहळ्यांविरुद्ध चळवळमराठा वधू-वर विवाह संस्था चालविणारे विराज तावरे म्हणाले, की वर पक्षाच्या अपेक्षा पाहिल्या, की त्यांच्या पूर्ततेसाठी किती खर्च येत असेल, याचा विचार करवत नाही. त्यामुळे या भपकेबाज लग्न सोहळ््यांविरोधात चळवळ उभारली जाणार आहे. माझ्या लग्नाच्या वेळीदेखील मला हा प्रश्न सतावत होता. मी माझ्या भावी पत्नीच्या केतकी मानकर हीच्याशी विचारविनिमय करून साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कुटुंबीयांना पटवून देऊन तो अमलातही आणला.सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण सातत्याने आकुंचन पावत असले तरी प्रत्येकाला अजूनही सरकारीच जावई हवा असल्याचे चित्र आहे. मुली मात्र आपल्याइतकाच बहुधा अधिक शिकलेल्या मुलालाच जीवनसाथी म्हणून पसंत करीत आहेत. मुलगी दुहेरी पदवीधर असेल आणि मुलगा एक पदवीधर असला तरी मुली असे स्थळ नाकारत आहेत. प्रत्येकालाच सुस्वरुप साथीदार हवा असतो. याशिवाय स्वत:चे घर, निर्व्यसनी, चांगली नोकरी अशा सर्वसाधारण अपेक्षा असतात. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे कार्यालय ते लॉन्स या ठिकाणी लग्न करून द्या, अशी मागणी केली जाते. हुंड्याऐवजी आता चांगले कार्यालय (शक्यतो लॉन्स) आणि चांगले भोजन अशी मागणी वाढत आहे. मुलांपेक्षा मुलींच्या नावांची नोंदणी करण्याचे प्रमाण अधिक आहे. आधी घरातील मुलीचे लग्न उरकावे, अशी भावना यामागे असते. विशेष म्हणजे व्यवसायाऐवजी चांगली नोकरी करणारा जावईच अनेक जण पसंत करतात, असे निरीक्षण अण्णाभाऊ साठे वधू-वर मंडळाचे दादासाहेब सोनवणे यांनी नोंदविले.