शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मंगलाष्टकांची वरात शाही वेदीवर

By admin | Updated: April 17, 2017 06:36 IST

प्रत्येकाला आपला लग्नसोहळा वेगळा व्हावा, असे वाटत आहे. त्यामुळे घरापुढील लग्न मांडव... कार्यालय... लॉन्स आणि पंचतारांकित हॉटेल असा

पुणे : प्रत्येकाला आपला लग्नसोहळा वेगळा व्हावा, असे वाटत आहे. त्यामुळे घरापुढील लग्न मांडव... कार्यालय... लॉन्स आणि पंचतारांकित हॉटेल असा पोहोचला आहे. आम्हाला काही नको मात्र लग्न अमुक ठिकाणी हवे... भोजन असे हवे... अशी साधी मागणी बघता बघता लग्न सोहळ््याचे स्वरुप घेते, इतके केले... याला काय होतेय, असे म्हणत वधूपित्याकडील लगीनघाई लाखो रुपयांचा चुराडा करून जाते, याचे भानच राहत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दोन महिने लगीनघाईचे आहेत. आपली उपस्थिती हाच आहेर, असे म्हणणाऱ्या लग्नाचा थाट पाहण्यासारखाच असतो. अलीकडे हुंडाबंदी आणि त्यावर खूप बोलले जात असल्याने हुंडा आम्ही घेणार नाही आणि देणार नाही, असे सांगणारे कुटुंब आता कमी नाहीत. मात्र, हुंड्यावर पाणी सोडत असले तरी वरपित्याकडील मागण्या या आडमार्गाने वधूपित्याच्या मानगुटीवर बसत आहेत. अनेकदा आम्हाला काही नको, मुलीला दहा तोळे सोने घाला (स्त्रीधन) अशी मागणी होते. काही जण लॉन्सचा आग्रह धरतात. त्यामुळे मंडपाचे कार्यालय आणि साध्या कार्यालयाचा मोठा हॉल आणि हॉलमधून लग्नवेदिका लॉन्स अथवा पंचतारांकित उंबरठा पार करून पुढे जात आहे. वराकडील लोकांनी हुंडा म्हणून रोख मागितली नाही, की सोने मागितले नाही. याचा आनंद मानून वधूकडील मंडळी लग्नाला तयार होत असली तरी या मोठ्या लग्नापायी येणारा खर्चही वाढत जातो. मंडपाचा काही हजारांचा खर्च कार्यालयात हजारोंमध्ये जातो, तर लॉन्सचा खर्च लाखांचा आकडा पार करून सहजच जातो. कार्यालय अथवा लॉन्स जर मोठे घेतले तर त्याची सजावट आणि त्याला साजेसे भोजन ओघानेच येते. त्यामुळे बुंदी-जिलेबीची रसमलाई होते. त्यातून खर्चही त्याचपटीत वाढत जातो. त्यामुळे या थाटामाटातून येणारा खर्च थेट मागितलेल्या हुंड्यापेक्षादेखील अधिकच असतो. पुन्हा लग्न मोठे केले तर नातेवाईकांचा मान-पान, जावई सन्मान शाही हवाच. त्यामुळे हा अप्रत्यक्ष हुंडाच वधूपित्यासाठी ओझे ठरत आहे. (प्रतिनिधी)भपकेबाज सोहळ्यांविरुद्ध चळवळमराठा वधू-वर विवाह संस्था चालविणारे विराज तावरे म्हणाले, की वर पक्षाच्या अपेक्षा पाहिल्या, की त्यांच्या पूर्ततेसाठी किती खर्च येत असेल, याचा विचार करवत नाही. त्यामुळे या भपकेबाज लग्न सोहळ््यांविरोधात चळवळ उभारली जाणार आहे. माझ्या लग्नाच्या वेळीदेखील मला हा प्रश्न सतावत होता. मी माझ्या भावी पत्नीच्या केतकी मानकर हीच्याशी विचारविनिमय करून साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कुटुंबीयांना पटवून देऊन तो अमलातही आणला.सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण सातत्याने आकुंचन पावत असले तरी प्रत्येकाला अजूनही सरकारीच जावई हवा असल्याचे चित्र आहे. मुली मात्र आपल्याइतकाच बहुधा अधिक शिकलेल्या मुलालाच जीवनसाथी म्हणून पसंत करीत आहेत. मुलगी दुहेरी पदवीधर असेल आणि मुलगा एक पदवीधर असला तरी मुली असे स्थळ नाकारत आहेत. प्रत्येकालाच सुस्वरुप साथीदार हवा असतो. याशिवाय स्वत:चे घर, निर्व्यसनी, चांगली नोकरी अशा सर्वसाधारण अपेक्षा असतात. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे कार्यालय ते लॉन्स या ठिकाणी लग्न करून द्या, अशी मागणी केली जाते. हुंड्याऐवजी आता चांगले कार्यालय (शक्यतो लॉन्स) आणि चांगले भोजन अशी मागणी वाढत आहे. मुलांपेक्षा मुलींच्या नावांची नोंदणी करण्याचे प्रमाण अधिक आहे. आधी घरातील मुलीचे लग्न उरकावे, अशी भावना यामागे असते. विशेष म्हणजे व्यवसायाऐवजी चांगली नोकरी करणारा जावईच अनेक जण पसंत करतात, असे निरीक्षण अण्णाभाऊ साठे वधू-वर मंडळाचे दादासाहेब सोनवणे यांनी नोंदविले.