शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

मंचर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमुळे आघाडीत बिघाडी : आढळराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST

खेड व नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे. आढळराव पाटील यांनी आदल्या दिवशी उद्घाटन उरकून घेतले, तर दुसऱ्या ...

खेड व नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे. आढळराव पाटील यांनी आदल्या दिवशी उद्घाटन उरकून घेतले, तर दुसऱ्या दिवशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उद्घाटनप्रसंगी आढळराव पाटील यांना यांच्यावर खरमरीत टीका केली. तसेच शरद पवार यांच्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले आहे असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना आढळराव पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावरील या पाच बायपास रस्त्याची मंजुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगून मी मिळवली आहे. तशी कागदपत्रे माझ्याकडे आहे. मात्र या रस्त्याचे उद्घाटन करताना जाहिरातीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा साधा फोटो वापरला गेला नाही. हा रस्ता मंजूर करूनसुद्धा मला साधा फोन केला नाही. आघाडीत बिघाडी तुम्ही केली आहे, असा आरोप करून ते म्हणाले, खासदार कोल्हे, आमदार मोहिते व इतर १ ते २ वगळता आघाडीत कोणीही बिघाडी करत नाही. हे रस्ते माझ्या प्रयत्नातून मंजूर झाल्याने उद्घाटन करण्याचा अधिकार आम्हाला आहे. मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची त्यांची उंची आहे का, असा सवाल करून ते म्हणाले, खासदार कोल्हे हे सध्या हवेत गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठे केले आहे. प्रकाशझोतात आणले, हे तुम्ही विसरलात. मी म्हातारा झाल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अशी टीका करणार का, तुम्ही तरुण होता मग दीड वर्षे घरात का लपून बसला होता, असा सवाल करून ते म्हणाले, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संगनमताने राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असून आमचा आघाडीला विरोध नाही. मात्र ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. खासदारकीला निवडून आल्यावर तुम्ही सर्व सोडून जनतेसाठी वेळ देणार असे म्हणाला होता. मात्र आता सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत शूटिंग करत असल्याचे वक्तव्य केले आहे. जनतेने तुम्हाला शूटिंगसाठी निवडून दिले का, असा सवाल करून आढळराव पाटील म्हणाले, खासदार असताना मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मी प्रयत्न केल्यामुळे पुणे नाशिक महामार्ग व हाई स्पीड रेल्वे ही कामे मार्गी लागली आहेत. कोल्हे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडावा. शिरूरची ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली तरी मला काही फरक पडणार नाही. कारण आताही जनता मला खासदाराप्रमाणेच प्रेम करत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार उभा करावा. मला काही हरकत नाही. माझा पक्ष मला सर्व काही देणार आहे. याची मला खात्री आहे, असे आढळराव पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. सात वर्षे झाली तरी पुरंदरला विमानतळ झाले नाही. सत्ता तुमची आहे. आता विमानतळ खेडला आणा, विमानतळ येथे होण्यासाठी माझा पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.