शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

मंचर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमुळे आघाडीत बिघाडी : आढळराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST

खेड व नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे. आढळराव पाटील यांनी आदल्या दिवशी उद्घाटन उरकून घेतले, तर दुसऱ्या ...

खेड व नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे. आढळराव पाटील यांनी आदल्या दिवशी उद्घाटन उरकून घेतले, तर दुसऱ्या दिवशी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उद्घाटनप्रसंगी आढळराव पाटील यांना यांच्यावर खरमरीत टीका केली. तसेच शरद पवार यांच्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले आहे असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना आढळराव पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, पुणे-नाशिक महामार्गावरील या पाच बायपास रस्त्याची मंजुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगून मी मिळवली आहे. तशी कागदपत्रे माझ्याकडे आहे. मात्र या रस्त्याचे उद्घाटन करताना जाहिरातीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा साधा फोटो वापरला गेला नाही. हा रस्ता मंजूर करूनसुद्धा मला साधा फोन केला नाही. आघाडीत बिघाडी तुम्ही केली आहे, असा आरोप करून ते म्हणाले, खासदार कोल्हे, आमदार मोहिते व इतर १ ते २ वगळता आघाडीत कोणीही बिघाडी करत नाही. हे रस्ते माझ्या प्रयत्नातून मंजूर झाल्याने उद्घाटन करण्याचा अधिकार आम्हाला आहे. मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची त्यांची उंची आहे का, असा सवाल करून ते म्हणाले, खासदार कोल्हे हे सध्या हवेत गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठे केले आहे. प्रकाशझोतात आणले, हे तुम्ही विसरलात. मी म्हातारा झाल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अशी टीका करणार का, तुम्ही तरुण होता मग दीड वर्षे घरात का लपून बसला होता, असा सवाल करून ते म्हणाले, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संगनमताने राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असून आमचा आघाडीला विरोध नाही. मात्र ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. खासदारकीला निवडून आल्यावर तुम्ही सर्व सोडून जनतेसाठी वेळ देणार असे म्हणाला होता. मात्र आता सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत शूटिंग करत असल्याचे वक्तव्य केले आहे. जनतेने तुम्हाला शूटिंगसाठी निवडून दिले का, असा सवाल करून आढळराव पाटील म्हणाले, खासदार असताना मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मी प्रयत्न केल्यामुळे पुणे नाशिक महामार्ग व हाई स्पीड रेल्वे ही कामे मार्गी लागली आहेत. कोल्हे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडावा. शिरूरची ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली तरी मला काही फरक पडणार नाही. कारण आताही जनता मला खासदाराप्रमाणेच प्रेम करत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार उभा करावा. मला काही हरकत नाही. माझा पक्ष मला सर्व काही देणार आहे. याची मला खात्री आहे, असे आढळराव पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. सात वर्षे झाली तरी पुरंदरला विमानतळ झाले नाही. सत्ता तुमची आहे. आता विमानतळ खेडला आणा, विमानतळ येथे होण्यासाठी माझा पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.