शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील गावांसाठी माळीणचे पुनर्वसन पथदर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून जीवित आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

घोडेगाव : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून जीवित आणि वित्तहानी होत असल्याच्या घटना घडत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे पुनर्वसनाची मागणी करत आहेत. तळीये दुर्घटनेनंतर ही मागणी तीव्र झाली आहे. माळीण दुर्घटनेनंतर प्रशासनाने वेगाने निर्णय घेत एक आदर्श गाव वसवले. माळीणच्या धर्तीवरच जिल्ह्यासह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराच्या तळाला वसलेल्या गावांचे पुनर्वसन झाल्यास भविष्यकाळीत जीवतहानी टळू शकते.

तळीये ग्रामस्थांचे शासनाला माळीणप्रमाणेच पुनर्वसन करावे लागणार आहे. तळीयेचे पुनर्वसन करताना माळीणमध्ये केलेल्या कामाचा निश्चित उपयोग होणार आहे. माळीण पुनर्वसनात ६७ घरे व १८ मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या. या नवीन जागेवर पुन्हा माळीणसारखी घटना घडू नये यासाठी जागा सपाटीकरण करणे व संरक्षण भिंती बांधणे हे काम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले. घरेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भूकंपरोधक, कमी खर्चात उपयोगी अशी बांधण्यात आली. तसेच शाळा, जनावरांचा गोठा, समाजमंदिर, ग्रामपंचायत अशा सर्व आवश्यक इमारती येथे बांधण्यात आल्या. यातून अतिशय टुमदार, हिल स्टेशनसारखे नवीन माळीण उभे राहिले.

चौकट

माळीण दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी दि. ३१ जुलै २०१४ रोजी शरद पवार आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत. माळीण दुर्घटनेप्रमाणे येथेही अशा घटना घडू शकतात. माळीणमधून आपण बोध घेऊन बाकी ठिकाणच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गावांचे पुनर्वसन अथवा येथे बचावात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने याबाबत विचार करावा. याला विरोध होईल. मात्र, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेणे आवश्यक आहे. आज त्यांचे म्हणणे खरे ठरत आहे. धोकादायक गावे निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे.

29072021-ॅँङ्म-ि02 - नवीन माळीणचे पुनर्वसन

29072021-ॅँङ्म-ि03 - नवीन माळीण पुनर्वसनात बांधून देण्यात आलेली घरे.