शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

राज्यातील गावांसाठी माळीणचे पुनर्वसन पथदर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून जीवित आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

घोडेगाव : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून जीवित आणि वित्तहानी होत असल्याच्या घटना घडत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे पुनर्वसनाची मागणी करत आहेत. तळीये दुर्घटनेनंतर ही मागणी तीव्र झाली आहे. माळीण दुर्घटनेनंतर प्रशासनाने वेगाने निर्णय घेत एक आदर्श गाव वसवले. माळीणच्या धर्तीवरच जिल्ह्यासह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराच्या तळाला वसलेल्या गावांचे पुनर्वसन झाल्यास भविष्यकाळीत जीवतहानी टळू शकते.

तळीये ग्रामस्थांचे शासनाला माळीणप्रमाणेच पुनर्वसन करावे लागणार आहे. तळीयेचे पुनर्वसन करताना माळीणमध्ये केलेल्या कामाचा निश्चित उपयोग होणार आहे. माळीण पुनर्वसनात ६७ घरे व १८ मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या. या नवीन जागेवर पुन्हा माळीणसारखी घटना घडू नये यासाठी जागा सपाटीकरण करणे व संरक्षण भिंती बांधणे हे काम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले. घरेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भूकंपरोधक, कमी खर्चात उपयोगी अशी बांधण्यात आली. तसेच शाळा, जनावरांचा गोठा, समाजमंदिर, ग्रामपंचायत अशा सर्व आवश्यक इमारती येथे बांधण्यात आल्या. यातून अतिशय टुमदार, हिल स्टेशनसारखे नवीन माळीण उभे राहिले.

चौकट

माळीण दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी दि. ३१ जुलै २०१४ रोजी शरद पवार आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत. माळीण दुर्घटनेप्रमाणे येथेही अशा घटना घडू शकतात. माळीणमधून आपण बोध घेऊन बाकी ठिकाणच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गावांचे पुनर्वसन अथवा येथे बचावात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने याबाबत विचार करावा. याला विरोध होईल. मात्र, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेणे आवश्यक आहे. आज त्यांचे म्हणणे खरे ठरत आहे. धोकादायक गावे निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे.

29072021-ॅँङ्म-ि02 - नवीन माळीणचे पुनर्वसन

29072021-ॅँङ्म-ि03 - नवीन माळीण पुनर्वसनात बांधून देण्यात आलेली घरे.