शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील गावांसाठी माळीणचे पुनर्वसन पथदर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून जीवित आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

घोडेगाव : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळून जीवित आणि वित्तहानी होत असल्याच्या घटना घडत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे पुनर्वसनाची मागणी करत आहेत. तळीये दुर्घटनेनंतर ही मागणी तीव्र झाली आहे. माळीण दुर्घटनेनंतर प्रशासनाने वेगाने निर्णय घेत एक आदर्श गाव वसवले. माळीणच्या धर्तीवरच जिल्ह्यासह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराच्या तळाला वसलेल्या गावांचे पुनर्वसन झाल्यास भविष्यकाळीत जीवतहानी टळू शकते.

तळीये ग्रामस्थांचे शासनाला माळीणप्रमाणेच पुनर्वसन करावे लागणार आहे. तळीयेचे पुनर्वसन करताना माळीणमध्ये केलेल्या कामाचा निश्चित उपयोग होणार आहे. माळीण पुनर्वसनात ६७ घरे व १८ मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या. या नवीन जागेवर पुन्हा माळीणसारखी घटना घडू नये यासाठी जागा सपाटीकरण करणे व संरक्षण भिंती बांधणे हे काम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले. घरेदेखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भूकंपरोधक, कमी खर्चात उपयोगी अशी बांधण्यात आली. तसेच शाळा, जनावरांचा गोठा, समाजमंदिर, ग्रामपंचायत अशा सर्व आवश्यक इमारती येथे बांधण्यात आल्या. यातून अतिशय टुमदार, हिल स्टेशनसारखे नवीन माळीण उभे राहिले.

चौकट

माळीण दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी दि. ३१ जुलै २०१४ रोजी शरद पवार आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अनेक गावे डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत. माळीण दुर्घटनेप्रमाणे येथेही अशा घटना घडू शकतात. माळीणमधून आपण बोध घेऊन बाकी ठिकाणच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गावांचे पुनर्वसन अथवा येथे बचावात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने याबाबत विचार करावा. याला विरोध होईल. मात्र, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेणे आवश्यक आहे. आज त्यांचे म्हणणे खरे ठरत आहे. धोकादायक गावे निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे.

29072021-ॅँङ्म-ि02 - नवीन माळीणचे पुनर्वसन

29072021-ॅँङ्म-ि03 - नवीन माळीण पुनर्वसनात बांधून देण्यात आलेली घरे.