शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

माळीणकर पुन्हा आठवणींनी ‘खचले’

By admin | Updated: June 27, 2017 07:46 IST

माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील व्यक्तींच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पांत पहिल्याच पावसात अनेक त्रुटी समोर आल्या.

नीलेश काण्णव । लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील व्यक्तींच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पांत पहिल्याच पावसात अनेक त्रुटी समोर आल्या. पावसाचे पाणी बांधलेल्या गटारात न मावल्याने पाण्याचा लोंढा शाळेच्याजवळ आला व मातीच्या भरावावर बांधलेले रस्ते खचले, गटारे तुटली, पाइपलाइन उखडल्या, लाईटचे पोल वाकले, भिंतींना तडे गेले. पुन्हा एकदा माळीणची ती धडकी भरवणारी आठवण जागी झाली. पहिल्याच पावसात अशी दुरवस्था झाली तर पुढे मुसळधार पावसात काय होईल, या चिंतेने ग्रामस्थ भयभीत झाले असून पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जाण्याची मागणी करू लागले आहेत. काही ग्रामस्थांनी तर पत्र्याच्या घरात जाण्याची बांधाबांध देखील सुरु केली आहे. माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत माळीणवासीयांचे दु:ख काही कमी होताना दिसत नाही. माळीणकरांना पक्की घरे देऊ, असे आश्वासन शासनाने दिले. त्याप्रमाणे घरेही दिली, पण पहिल्याच पावसात या गावातही जुन्या गावासारखी जमीन खचू लागली. गाव उभारण्याचे काम करताना केलेले मोठमोठे मातीचे भराव खचले. त्यामुळे अंतर्गत रस्ते खचले, अंतर्गत गटारे तुटली, पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन फुटल्या, ड्रेनेजलाईन उघडली, लाईटचे पोल पडल्याने अंतर्गत वीजपुरवठा खंडित झाला, चेंबर फुटले यामुळे नवीन माळीणची पुरती दयनीय अवस्था झाली.