शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गटातटातील वर्चस्वातून माळेगाव झाले अशांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:09 IST

माळेगाव : ऐतिहासिक वारसा संपन्न व सुसंस्कृत असलेल्या माळेगावाला राजकीय गुन्हेगारीने बदनाम केले आहे. गटातटातील वर्चस्वातून गेल्या तीन-साडेतीन वर्षांत ...

माळेगाव : ऐतिहासिक वारसा संपन्न व सुसंस्कृत असलेल्या माळेगावाला राजकीय गुन्हेगारीने बदनाम केले आहे. गटातटातील वर्चस्वातून गेल्या तीन-साडेतीन वर्षांत गाव अशांत झाले आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खरे तर राजकीय दृष्टिकोनातून माळेगाव हे सातत्याने राजकीय पटलावर चर्चेत असणारे हे गाव आहे. खासदार शरद पवार यांची यशस्वी राजकीय कारकीर्द याच गावातील धुरंधरांनी घडवली आहे. पवार यांचे निवासस्थान याच गावात आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे व विशेषत: उपमुख्यमंत्री पवार यांचा शब्द मानणारे गाव अशी ओळख आहे. पूर्वी गावात राजकीय गटतट होते. त्यांच्यात वादविवाद होत होता. अपवादाने मारामारीदेखील झाली; पण शस्त्राचा वापर कधीच झाला नाही. त्यांचे वाद शब्दांवर मिटायचे व गावात शातंता नांदायची. मात्र, सन २०१७ ला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून गटातटातील वादाला अधिक जोर आला. दोन गट एकमेकांना पाण्यात पाहू लागले. त्यामुळे गटाचे राजकारणात अधिक व्यापक होऊ लागले. वादविवाद वाढत गेले.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीस वर्ष होताच सोशल मीडियाचा वादासाठी वापर होऊ लागला. एक गट सोशल मीडियावर जाहिरातबाजी करण्यात मग्न होता, तर दुसरा गट त्याविरोधी संदेश प्रसारित करत होता. एखाद्या राजकीय कार्यक्रमात, अथवा ग्रामसभेत खडाजंगी होऊ लागली. गेल्या तीन-चार महिन्यांत गावातील विकासकामांचे उद्घाटन, कोविड सेंटर, वाढदिवसाचे आक्षेपार्ह फ्लेक्स यांवरून मोठा वादंग झाला होता. एका गटाची भांडणे झाली तर दुसरा गट ते भांडण कसे वाढेल याकडे लक्ष देत होता. यामधून वैयक्तिक खुन्नस वाढत गेली. यातून काही समर्थकांना मार खावा लागला होता. हा वाद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात गेला होता.

—————————————————

...वाद आणखी उफाळणार

आगामी काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे. या काळात गटातटातील वाद आणखी उफाळून येणार आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी चांगल्या व निष्कलंक उमेदवारांची गरज आहे. गावातील अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी गावामध्ये वर्चस्व राखण्यासाठी गावगुंडांना हाताशी ठेवलेले पाहायला मिळतेय.