शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नदीपात्रातून एलिव्हेटेड उड्डाणपूल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

धायरी : सिंहगड रस्ता तसा आधीच गजबजलेला रस्ता असल्याने शिवाय नऱ्हे, धायरी, नांदेड गाव, किरकटवाडी, खडकवासला अन्य भागातील राहणाऱ्या ...

धायरी : सिंहगड रस्ता तसा आधीच गजबजलेला रस्ता असल्याने शिवाय नऱ्हे, धायरी, नांदेड गाव, किरकटवाडी, खडकवासला अन्य भागातील राहणाऱ्या नागरिकांना मुख्य रस्त्याने जावे लागते. तसेच पर्यायी रस्ता नसल्याने त्यांना दररोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ते वारजे पुलापर्यंत नदीपात्रातून २४ मीटरचा रस्ता एलिव्हेटेड उड्डाणपूल म्हणून विकसित करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका ज्योती गोसावी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी एका खासगी कामासाठी हिंगणे खुर्द परिसरात आले होते. यावेळी प्रभाग क्रमांक ३४ मधील नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेविका मंजूषा नागपुरे, नगरसेविका ज्योती गोसावी, नगरसेवक श्रीकांत जगताप आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व नगरसेवकांनी श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ते वारजे पुलापर्यंत नदीपात्रातून २४ मीटरचा रस्ता एलिव्हेटेड उड्डाणपूल करावा, अशी मागणी केली. सुरुवातीला नदीपात्रातील रस्ता विकसित करण्याकरिता हरित लवादाची ‘स्टे ऑर्डर’ होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने या ठिकाणी एलिव्हेटेड उड्डाणपूल करण्यास परवानगी दिली आहे. प्रभाग क्रमांक ३४ मधील राजाराम पूल ते धायरी फाटा या मुख्य रस्त्यावर सकाळी व सायंकाळी मोठी वाहतूककोंडी होते. यासाठी पर्यायी रस्ता म्हणून वारजे, सनसिटी, आनंदनगर,नांदेड सिटी, अशा विविध भागातील नागरिकांना याचा उपयोग होईल. यावेळी नवले पुलाजवळ वारंवार होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

कोट

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरात सतत होणाऱ्या अपघाताबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने ठोस उपायोजना करण्यात याव्यात, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

- प्रसन्न जगताप, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती

श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ते वारजे पुलापर्यंत नदीपात्रातून २४ मीटरचा रस्ता एलिव्हेटेड उड्डाणपूल झाल्यास सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय एलिव्हेटेड उड्डाणपूल करण्यास हरित लवादानेही मान्यता दिली आहे.

- ज्योती गोसावी, नगरसेविका

सिंहगड रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत असते. यासाठी या भागात पर्यायी रस्ते करणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर महामार्गावरील अपघातांची मालिका थांबविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- मंजूषा नागपुरे, नगरसेविका