शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातून एलिव्हेटेड उड्डाणपूल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

धायरी : सिंहगड रस्ता तसा आधीच गजबजलेला रस्ता असल्याने शिवाय नऱ्हे, धायरी, नांदेड गाव, किरकटवाडी, खडकवासला अन्य भागातील राहणाऱ्या ...

धायरी : सिंहगड रस्ता तसा आधीच गजबजलेला रस्ता असल्याने शिवाय नऱ्हे, धायरी, नांदेड गाव, किरकटवाडी, खडकवासला अन्य भागातील राहणाऱ्या नागरिकांना मुख्य रस्त्याने जावे लागते. तसेच पर्यायी रस्ता नसल्याने त्यांना दररोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ते वारजे पुलापर्यंत नदीपात्रातून २४ मीटरचा रस्ता एलिव्हेटेड उड्डाणपूल म्हणून विकसित करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका ज्योती गोसावी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी एका खासगी कामासाठी हिंगणे खुर्द परिसरात आले होते. यावेळी प्रभाग क्रमांक ३४ मधील नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेविका मंजूषा नागपुरे, नगरसेविका ज्योती गोसावी, नगरसेवक श्रीकांत जगताप आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व नगरसेवकांनी श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ते वारजे पुलापर्यंत नदीपात्रातून २४ मीटरचा रस्ता एलिव्हेटेड उड्डाणपूल करावा, अशी मागणी केली. सुरुवातीला नदीपात्रातील रस्ता विकसित करण्याकरिता हरित लवादाची ‘स्टे ऑर्डर’ होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने या ठिकाणी एलिव्हेटेड उड्डाणपूल करण्यास परवानगी दिली आहे. प्रभाग क्रमांक ३४ मधील राजाराम पूल ते धायरी फाटा या मुख्य रस्त्यावर सकाळी व सायंकाळी मोठी वाहतूककोंडी होते. यासाठी पर्यायी रस्ता म्हणून वारजे, सनसिटी, आनंदनगर,नांदेड सिटी, अशा विविध भागातील नागरिकांना याचा उपयोग होईल. यावेळी नवले पुलाजवळ वारंवार होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.

कोट

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरात सतत होणाऱ्या अपघाताबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने ठोस उपायोजना करण्यात याव्यात, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

- प्रसन्न जगताप, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती

श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ते वारजे पुलापर्यंत नदीपात्रातून २४ मीटरचा रस्ता एलिव्हेटेड उड्डाणपूल झाल्यास सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय एलिव्हेटेड उड्डाणपूल करण्यास हरित लवादानेही मान्यता दिली आहे.

- ज्योती गोसावी, नगरसेविका

सिंहगड रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत असते. यासाठी या भागात पर्यायी रस्ते करणे आवश्यक आहेत. त्याचबरोबर महामार्गावरील अपघातांची मालिका थांबविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- मंजूषा नागपुरे, नगरसेविका