शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:12 IST

काढणीला आलेला कांदा, गव्हू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग खोडद : सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे जुन्नर ...

काढणीला आलेला कांदा, गव्हू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

खोडद : सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले. यात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा व गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वातावरणात सतत होणारे बदल, अस्मानी संकट यामुळे बळीराजा अधिकच आर्थिक संकटात सापडला गेला आहे.

आजच्या अवकाळी पावसापासून गहू व कांदा वाचविण्यासाठी गहू व कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक झाली.

रब्बी पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मार्च महिना अंतिम टप्प्यात आला असतानाही अवकाळी पाऊस सुरुच असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, द्राक्षे यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कांदा, टोमॅटो, मिरची यासारख्या नगदी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा, कलिंगड तसेच द्राक्षाच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याचबरोबर घरगुती आंब्याच्या झाडांचे मोहोर गळून देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

जुन्नर तालुक्यातील सुमारे ८० टक्के द्राक्षांची तोडणी झली असून राहिलेल्या २० टक्के द्राक्षांना या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे ही द्राक्ष स्थानिक बाजार पेठांमध्ये कमी भावाने विक्री करावी लागली.अवकाळी पावसामुळे आधीच झालेले द्राक्षांचे नुकसान व कोरोनामुळे बाहेरील देशांमधून द्राक्षांना मागणी न झाल्याने ५० ते ६० रुपये प्रति किलो बाजार भावाप्रमाणे द्राक्ष विक्री करावी लागली.

जुन्नर तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी १ हजार ५०० हेक्टर मध्ये द्राक्षांचे , ४ हजार ५०० हेक्टर मध्ये गव्हाचे तर ९ हजार हेक्टर मध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे.काढणीला आलेला गव्हू आणि कांदा यांना मोठा फटका बसणार आहे.

२०२० मध्ये निसर्गाचा ,वातावरणाचा व पावसाचा समतोल न राहिल्याने द्राक्षांच्या बागांमधील घड निर्मितीचे प्रमाण घटल्याने दरवर्षी पेक्षा यावर्षी द्राक्षांचे केवळ ५० टक्केच उत्पादन घेण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे,यामुळे आधीच अडचणीत सापडलेले द्राक्ष उत्पादक शेतकरी आता अधिक संकटात सापडले आहेत. ================================ "आज अचानक आलेल्या अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. काढणीला आलेला गहू, कांदा,हरभरा, द्राक्ष, टोमॅटो व मिरची यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.मागच्या वर्षी देखील कोरोना आणि अस्मानी संकटामुळे शेतकरी अक्षरशः झोपला गेला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे." -.योगेश जालिंदर डोंगरे,

शेतकरी, खोडद,

खोडद येथे अवकाळी पावसामुळे कांदा भिजू नये म्हणून शेतकऱ्याने ताडपत्री टाकून झाकलेला हा कांदा.